शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पंतप्रधानांच्या सभास्थळी आढळले पाच सर्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 11:52 IST

दक्षता म्हणून ४० सर्पमित्र

जळगाव : विमानतळासमोरील प्रांगणात आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या ठिकाणी दक्षता म्हणून वन्यजीव संरक्षण संस्थेचे ४० सर्पमित्र तैनात करण्यात आले होते. या वेळी तेथे विविध जातीचे पाच सर्प आढळून आले. ते संस्थेच्या सर्पमित्रांनी पकडून सुरक्षित स्थळी सोडले.मोकळ््या मैदानात ही सभा ठेवण्यात आली होती. या परिसरात सर्प, वन्यजीवांचा वावर असल्याने सदर प्राणी आणि उपस्थित नागरिकांना हानी पोहचू नये म्हणून जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनाने वन्यजीव संरक्षण संस्थेला रेस्क्यू आणि जनजागृतीची जबाबदारी सोपवली होती.वन्यजीव संरक्षण संस्थेच्या ४० सर्पमित्रांनी सकाळी ८ वाजेपासून सभा संपेपर्यंत कर्तव्य बजावले. या दरम्यान २ तस्कर, २ धामण, १ डुरक्या घोणस असे वेगवेगळे ५ सर्प पार्किंग आणि मोकळ््या जागेतून पकडून त्याच परिसरात सुरक्षित ठिकाणी मुक्त केले. या विषयी उपस्थित पोलीस कर्मचारी, नागरिकांना सुरक्षितता कशी बाळगावी या बद्दल मार्गदर्शनही केले.या वेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सर्पमित्रांची भेट घेऊन करत असलेल्या कार्याबद्दल कौतुक केले आणि सर्प किंवा कोणतेही सरीसृप प्राणी आढळून आल्यास गोंधळ न होऊ देता सुरक्षित रेस्क्यू करा असा सल्ला दिला.वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सभासदांना अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, बापूसाहेब रोहोम, पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ, गोपनीय शाखेचे तुकाराम निंबाळकर यांचे मार्गदर्शन लाभले. वन्यजीव संरक्षण संस्थेचे बाळकृष्ण देवरे, रवींद्र फालक, योगेश गालफाडे, राहुल सोनवणे, जगदीश बैरागी, सतीश कांबळे, नीलेश ढाके, अमन गुजर, अमोल देशमुख, वासुदेव वाढे, सुरेंद्र नारखेडे, प्रसाद सोनवणे, भूषण चौधरी, बबलू शिंदे, राजेश सोनवणे, अभिषेक ठाकूर, स्कायलेब डिसुझा, ऋषी राजपूत, दिनेश सपकाळे, रितेश सपकाळे, लिनत जंगले, तेजस मोरे, शशिकांत सपकाळे, शुभम पवार, जयेश पाटील, रवी तायडे, पंकज अटकले, गणेश सपकाळे, पंकज बाविस्कर, योगेश सपकाळे यांच्यासह ४० सर्पमित्रांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Jalgaonजळगाव