शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

जळगावात राष्ट्रवादीच्या नेत्यांना पाचशे रूपयांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 11:52 IST

जमाव बंदीचे केले होते उल्लंघन

जळगाव : अजिंठा चौफुली, आकाशवाणी चौक आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत असताना जमाव बंदी आदेशांचे उल्लंघन केल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांवर जिल्हापेठ, एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात न्यायालयात हजर न राहिल्याने काढण्यात आलेले वॉरंट रद्द करण्यासाठी आठ जणांना प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड मंगळवारी न्यायालयाने ठोठावला. यात माजी खासदार ईश्वरलाल जैन, अ‍ॅड. रवींद्र पाटील, गफ्फार मलीक यांच्यासह अन्य राष्टÑवादी कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.सन २०१३, २०१५ आणि २०१६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अजिंठा चौफुली, आकाशवाणी चौक, जिल्हाधिकारी कार्यालय येथे शासनाच्या विविध धोरणांविरोधात आंदोलन करण्यात आले होते. या प्रकरणी जिल्हापेठ व एमआयडीसी पोलीस स्टेशनला राष्ट्रवादीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांविरूध्द जमाव बंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.खटला पोहोचला न्यायालयातदाखल गुन्ह्याचा हा खटला न्यायालयात सुरू झाला़ मात्र, गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून न्यायालयीन कामकाजासाठी दिलेल्या तारखांना राष्टÑवादी कॉँग्रेसचे पदाधिकारी वारंवार गैरहजर राहिल्यामुळे या आंदोलकांविरुद्ध न्यायालयाने अजामिनपात्र वॉरंट बजावले होते.२१ आणि ३० मे रोजी पुढील कामकाजआता भगत बालाणी, नीलेश सुधाकर पाटील, मनोज दयाराम चौधरी, सलीम इनामदार, गणेश बुधो सोनवणे, इब्राहीम मुसा पटेल, आमदार सतीश पाटील, अयाज अली नियाज अली यांच्या वरील खटल्यात २१ व ३० मे रोजी कामकाज होणार आहे.सरकारपक्षातर्फे अ‍ॅड.निखील कुळकर्णी यांनी तर संशयितांतर्फे अ‍ॅड.कुणाल पाटील, अ‍ॅड़ अजीम शेख व अ‍ॅड़ इम्रान हुसेन यांनी काम पाहिले.न्यायालयात गर्दीखटल्यात न्यायालयाने राष्टÑवादी कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना वॉरंट बजावल्याने हे नेते दुपारसत्रात न्यायालयात आले होते. त्यामुळे या पक्षाचे अनेक कार्यकर्तेही येथे हजर होते.त्यामुळे न्यायालय आवारात मोठी गर्दी झाली होती. तर ही नेते मंडळी नेमकी आली कशासाठी याबाबतही चर्चा रंगल्या होत्या.यांच्या नावे निघाले वॉरंटन्यायालयीन तारखांना वारंवार गैरहजर राहिल्यामुळे माजी खासदार ईश्वरलाल जैन, पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष गफ्फार मलीक, वाल्मीक विक्रम पाटील, मीर नाजीम अली, मंगला भरत पाटील, परेश दिलीप कोल्हे, विशाल गुलाबराव देवकर हे मंगळवारी न्यायालयात हजर झाले. न्यायालयात कामकाज होऊन न्यायाधीश ए़एस़ शेख यांनी त्यांना प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड ठोठावला़ तर यातील फक्त मीर नाजीम अली यास तीनशे रूपयांचा दंड केला आहे़

टॅग्स :Jalgaonजळगाव