शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

साडेपाच हजारावर करदात्या शेतकऱ्यांनी भरले साडेपाच कोटी रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:13 IST

स्टार ७५७ जळगाव : पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील लाभ घेतलेल्या १३ हजारावर आयकर दाते शेतकऱ्यांपैकी पाच हजार ७०२ ...

स्टार ७५७

जळगाव : पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील लाभ घेतलेल्या १३ हजारावर आयकर दाते शेतकऱ्यांपैकी पाच हजार ७०२ जणांनी पाच कोटी ४२ लाख ३४ हजार रुपयांची रक्कम परत केली आहे. अजून सात हजार ४७० शेतकर्‍यांकडून ही रक्कम येणे बाकी आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील लाभ देण्यात आलेले १३ हजार १७२ शेतकरी हे आयकर दाते असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे ते लाभार्थी या योजनेंतर्गत पुढील हप्ता मिळण्यास अपात्र ठरले व त्यांना आतापर्यंत देण्यात आलेली १२ कोटी ४८ लाख ५२ हजार रुपयांवरील लाभाची रक्कम वसूल करुन केंद्र शासनाला परत करण्यात येणार आहे. यासाठी या शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आली होती.

या योजनेच्या लाभार्थ्यांची माहिती शासनाला पाठवताना सरसकट शेतकऱ्यांची नावे शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. त्यामुळे अपात्र लाभार्थ्यांनाही लाभ देण्यात आला. जिल्ह्यात या योजनेंतर्गत ४ लाख ९७ हजारावर लाभार्थी शेतकरी दरवर्षी ६ हजार रुपयांचा किसान सन्मान निधी मिळण्यास पात्र आहेत. शासनाने किसान सन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी आयकर विभागाकडे पाठविली होती. त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील १३ हजार १७२ लाभार्थी हे आयकर दाते असल्याचे आढळून आले होते. त्या लाभार्थ्यांची यादी शासनाने जिल्हा प्रशासनाला पाठविली होती.

आतापर्यंत पाच कोटी ४२ लाख ३४ हजार वसूल

आयकरदात्या लाभार्थ्यांकडून किसान सन्मान निधीचे हप्त्याची रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरु झाली. जिल्ह्यातील १३ हजार १७२ लाभार्थ्यांकडून १२ कोटी ४८ लाख ५२ हजार रुपयांचा सन्मान निधी वसूल करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयाचे स्वतंत्र खाते उघडण्यात आलेले आहे. ती रक्कम योजनेच्या जिल्हास्तरीय खात्यात जमा करुन राज्य शासनामार्फत केंद्र शासनाला पाठवण्यात येणार आहे. आयकर दात्या शेतकऱ्यांनी रक्कम भरण्यास सुरुवात केली असून यामध्ये आता पर्यंत पाच हजार ७०२ करदात्या शेतकऱ्यांनी पाच कोटी ४२ लाख ३४ हजार रुपयांची रक्कम जमा केली आहे.

पीएम किसान पेन्शन योजनेचा आढावा

पीएम किसान पेन्शन योजनेचे लाभार्थी - ४,४७०००

आतापर्यंत पैसे परत केलेले शेतकरी - ५७०२

पैसे परत करा म्हणून नोटीस पाठवलेले शेतकरी- १३,१७२

पैसे परत करणे बाकी असलेले शेतकरी - ७४७०

काय म्हणतात शेतकरी

पीएम किसान योजनेचा लाभ मिळावा म्हणून अनेक वेळा प्रयत्न केले. मात्र याचा लाभ अद्यापपर्यंत मिळालेला नाही. हा लाभ मिळाल्यास मोठा आधार होईल. कोरोनाच्या संकटात शेतीमाल विकणे कठीण होत असल्याने या योजनेचा लाभ मिळाल्यास शेतकऱ्यास दिलासा मिळू शकतो.

- शरद चौधरी, शेतकरी

एकीकडे करदात्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो. मात्र जे खरे गरजू शेतकरी आहे ते यापासून वंचित राहत आहे. गरजू शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाल्यास निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल.

- शेषराव महाजन, शेतकरी.

वेळ मर्यादा नाही

करदात्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा लाभ घेतला असला तरी त्यांच्याकडून वसूल करण्यात येणाऱ्या रकमेसाठी वेळ मर्यादा ठरवून दिलेली नाही. या शेतकऱ्यांना नोटीस बजावली आहे, मात्र सर्वजण लगेच ही रक्कम भरत नसल्याने काही जण पुढे येत आहे. हळूहळू ही रक्कम वसुली होत असल्याचे सांगण्यात येत आहे.