शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

साडेपाच हजारावर करदात्या शेतकऱ्यांनी भरले साडेपाच कोटी रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:13 IST

स्टार ७५७ जळगाव : पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील लाभ घेतलेल्या १३ हजारावर आयकर दाते शेतकऱ्यांपैकी पाच हजार ७०२ ...

स्टार ७५७

जळगाव : पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील लाभ घेतलेल्या १३ हजारावर आयकर दाते शेतकऱ्यांपैकी पाच हजार ७०२ जणांनी पाच कोटी ४२ लाख ३४ हजार रुपयांची रक्कम परत केली आहे. अजून सात हजार ४७० शेतकर्‍यांकडून ही रक्कम येणे बाकी आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील लाभ देण्यात आलेले १३ हजार १७२ शेतकरी हे आयकर दाते असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे ते लाभार्थी या योजनेंतर्गत पुढील हप्ता मिळण्यास अपात्र ठरले व त्यांना आतापर्यंत देण्यात आलेली १२ कोटी ४८ लाख ५२ हजार रुपयांवरील लाभाची रक्कम वसूल करुन केंद्र शासनाला परत करण्यात येणार आहे. यासाठी या शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आली होती.

या योजनेच्या लाभार्थ्यांची माहिती शासनाला पाठवताना सरसकट शेतकऱ्यांची नावे शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. त्यामुळे अपात्र लाभार्थ्यांनाही लाभ देण्यात आला. जिल्ह्यात या योजनेंतर्गत ४ लाख ९७ हजारावर लाभार्थी शेतकरी दरवर्षी ६ हजार रुपयांचा किसान सन्मान निधी मिळण्यास पात्र आहेत. शासनाने किसान सन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी आयकर विभागाकडे पाठविली होती. त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील १३ हजार १७२ लाभार्थी हे आयकर दाते असल्याचे आढळून आले होते. त्या लाभार्थ्यांची यादी शासनाने जिल्हा प्रशासनाला पाठविली होती.

आतापर्यंत पाच कोटी ४२ लाख ३४ हजार वसूल

आयकरदात्या लाभार्थ्यांकडून किसान सन्मान निधीचे हप्त्याची रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरु झाली. जिल्ह्यातील १३ हजार १७२ लाभार्थ्यांकडून १२ कोटी ४८ लाख ५२ हजार रुपयांचा सन्मान निधी वसूल करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयाचे स्वतंत्र खाते उघडण्यात आलेले आहे. ती रक्कम योजनेच्या जिल्हास्तरीय खात्यात जमा करुन राज्य शासनामार्फत केंद्र शासनाला पाठवण्यात येणार आहे. आयकर दात्या शेतकऱ्यांनी रक्कम भरण्यास सुरुवात केली असून यामध्ये आता पर्यंत पाच हजार ७०२ करदात्या शेतकऱ्यांनी पाच कोटी ४२ लाख ३४ हजार रुपयांची रक्कम जमा केली आहे.

पीएम किसान पेन्शन योजनेचा आढावा

पीएम किसान पेन्शन योजनेचे लाभार्थी - ४,४७०००

आतापर्यंत पैसे परत केलेले शेतकरी - ५७०२

पैसे परत करा म्हणून नोटीस पाठवलेले शेतकरी- १३,१७२

पैसे परत करणे बाकी असलेले शेतकरी - ७४७०

काय म्हणतात शेतकरी

पीएम किसान योजनेचा लाभ मिळावा म्हणून अनेक वेळा प्रयत्न केले. मात्र याचा लाभ अद्यापपर्यंत मिळालेला नाही. हा लाभ मिळाल्यास मोठा आधार होईल. कोरोनाच्या संकटात शेतीमाल विकणे कठीण होत असल्याने या योजनेचा लाभ मिळाल्यास शेतकऱ्यास दिलासा मिळू शकतो.

- शरद चौधरी, शेतकरी

एकीकडे करदात्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो. मात्र जे खरे गरजू शेतकरी आहे ते यापासून वंचित राहत आहे. गरजू शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाल्यास निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल.

- शेषराव महाजन, शेतकरी.

वेळ मर्यादा नाही

करदात्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा लाभ घेतला असला तरी त्यांच्याकडून वसूल करण्यात येणाऱ्या रकमेसाठी वेळ मर्यादा ठरवून दिलेली नाही. या शेतकऱ्यांना नोटीस बजावली आहे, मात्र सर्वजण लगेच ही रक्कम भरत नसल्याने काही जण पुढे येत आहे. हळूहळू ही रक्कम वसुली होत असल्याचे सांगण्यात येत आहे.