शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

प्रधानमंत्री आवास योजनेत साडेपाच हजार लाभार्थी वगळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:21 IST

अमळनेर : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तालुक्यात साडेपाच हजार लाभार्थी वगळण्यात आले असून त्याची कारणे मात्र अधिकाऱ्यांना माहीत नसून सर्वाधिक ...

अमळनेर : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तालुक्यात साडेपाच हजार लाभार्थी वगळण्यात आले असून त्याची कारणे मात्र अधिकाऱ्यांना माहीत नसून सर्वाधिक प्रमाण इंदापिंप्री येथील असल्याने भाजपच्या माजी आमदार स्मिता वाघ यांनी वृद्ध, विधवा लाभार्थ्यांचे शिष्टमंडळ घेऊन गटविकास अधिकाऱ्यांना या संदर्भात जाब विचारला.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अमळनेर तालुक्यात २६ हजार ४४४ लाभार्थ्यांचा सर्व्हे करण्यात आला. त्यानंतर लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली. मात्र पुढील वर्षी काही नावे वगळण्यात आली तर काही नव्याने नावे वाढवण्यात आली. त्यात वगळण्याची कारणे स्थानिक पातळीवर ग्रामसेवक, गटविकास अधिकारी यांनादेखील माहीत नसल्याने नागरिक संभ्रमात पडले आहेत. निकष डावलून इन्कम टॅक्स भरणारे, नोकरीला असणाऱ्यांचे माता-पिता, भरपूर शेती असणारे, स्वतःचे घर असणारे, बागायती शेती असणाऱ्या लोकांची नावे लाभार्थी यादीत असून विधवा, भूमिहीन, निराधार, अल्पभूधारक असणारे खरे पात्र लाभार्थी वगळण्यात आल्याची ओरड इंदापिंप्री येथील ग्रामस्थांनी केली. या प्रश्नी लाभार्थी महिलांनी गटविकास अधिकारी एस.बी. सोनवणे यांना जाब विचारला. या वेळी भैरवी पलांडे, माजी पं.स. सभापती श्याम अहिरे, भाजपचे जिजाबराव पाटील, सदाबापू पाटील उपस्थित होते.

गटविकास अधिकारी एस.बी. सोनवणे यांनी दोन महिन्यांपूर्वी ५ हजार ४३५ लाभार्थी वगळण्याबाबत माहिती मिळाल्याचे सांगितले. मात्र आधी यादीत असलेली नावे का वगळण्यात आली याची कारणे माहीत नसल्याचे सांगितले.

इंदापिंप्री येथील यादीतील १८० पैकी ११७ लाभार्थी वगळण्यात आले आहेत. त्यात प्रामुख्याने विजूबाई पोपट पाटील, मंगलबाई रघुनाथ पाटील, कमलाबाई माणिक बोरसे, देविदास साहेबराव पाटील, रजूबाई रावण पाटील, अनिल ताराचंद पाटील, प्रकाश वेडुमल पाटील, दगूबाई भाईदास पाटील, नीलाबाई जगन्नाथ पाटील, निर्मलाबाई नवल भिल या कोणी विधवा, अल्पभूधारक, भूमिहीन, बेघर, आर्थिक दुर्बल असणाऱ्या पात्र लाभार्थींचा समावेश आहे.