शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

तब्बल सात वर्षानंतर पहिल्यांदाच जळगाव शहराचा पारा ६ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 12:42 IST

थंडीच्या लाटेने जळगावकर गारठले

जळगाव : गेल्या आठवडाभरापासून शहरात थंडीची लाट पसरली आहे. सलग पाचव्या दिवशी शहराचे किमान तापमान ८ अंशापेक्षा कमी असून, शनिवारी किमान तापमानाने यंदाचा सर्वात निच्चांक गाठला होता. किमान पारा ६ अंशापर्यंत खाली घसरल्याने तब्बल सात वर्षांनंतर जळगावचा पारा ६ अंशावर आला असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.याआधी २०११ मध्ये जळगावचे किमान तापमान ३ अंशावर गेले होते. २०११ मध्ये सलग आठवडाभर जळगावचा पारा ३ ते ७ अंशादरम्यान कायम होता. मात्र, त्यानंतर याच वर्षी किमान पारा ६ अंशावर आला आहे. २०१२ मध्ये जानेवारी महिन्यात ७, २०१३ डिसेंबर महिन्यात ७.४ अंशापर्यंत किमान पारा घसरला होता.मात्र, यावर्षी तापमापीतील पारा सात वर्षानंतर पहिल्यांदाच ६ अंशावर आला आहे. दोन दिवसांपासून तापमान ६ अंशावर कायम असल्याने जनजीवनावर मोठा परिणाम झालेला दिसून येत आहे. पहाटे फिरायला जाणाºयांची संख्याही रोडावल्याचे दिसते. तर रात्रीही रस्ते लवकर सुनसान होतात.थंडीचा जोर कायम राहणारथंडीची लाट अजून तीन दिवस कायम राहणार असून किमान तापमान १० अंशाच्याच खाली राहण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. सध्या सरासरी तापमानापेक्षा तब्बल ५ अंशांनी तापमानाचा पारा खाली आला आहे. किमान तापमानासह कमाल तापमानात देखील लक्षणीय घट झाली आहे. शनिवारी शहराचे कमाल तापमान २५ अंश इतके होते. त्यामुळे दिवसा देखील गारवा जाणवत होता. सायंकाळी ७ वाजेनंतर कडाक्याचा थंडीमुळे नागरिक घराबाहेर निघणे टाळत असल्याने मुख्य रस्ते ८ वाजेनंतर ओस पडत आहेत. तसेच रुग्णांच्या संख्येत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, अतीथंडीमुळे वृध्दांना अधिक त्रास होत आहे.शेकोट्या पेटल्या...थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे शहरात देखील ग्रामीण भागाप्रमाणेच नागरिक थंडीचा बचाव करण्यासाठी शेकोट्या पेटवत आहेत. घरांमध्ये अनेकजण विस्तव ठेवून थंडीपासून संरक्षणाचे उपाय करत आहेत. तसेच अनेकजण दिवसादेखील अंगात गरम कपडे परिधान क रूनच ठेवत आहे. थंडीचा जोर वाढल्याने मॉर्निंग वॉकला येणाºया नागरिकांनी आपल्या वेळेत देखील बदल करून घेतला असून, ऊन पडल्यानंतरच नागरिक बाहेर येत आहेत. चहाच्या मागणीत देखील मोठी वाढ झाली असून, सकाळच्या वेळेस चहाच्या स्टॉलवर नागरिकांची गर्दी वाढलेली दिसून येत आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव