शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

पहिले हजार रुग्ण ७६ दिवसात, ३२ दिवसात वाढले ४ हजार रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 12:02 IST

चिंताजनक : लॉकडाऊननंतर दररोज वाढताहेत सरासरी ४६ रुग्ण

अजय पाटील ।जळगाव : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या आता ५ हजारांपर्यंत पोहचली आहे. २४ मार्च रोजी लॉकडाऊन झाल्यानंतर ३१ मे पर्यंत जिल्ह्यातील रुग्णसंख्येचा वेग काही प्रमाणात मर्यादित होता. मात्र, १ जून रोजी जाहीर झालेल्या पाचव्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यात १ हजार रुग्ण व्हायला ७६ दिवस लागले होते. मात्र, १ हजार ते ५ हजार रुग्णसंख्या व्हायला केवळ ३२ दिवस लागले आहेत. शेवटच्या ३२ दिवसात जिल्ह्यात तब्बल ४ हजार नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे शेवटच्या पाच दिवसात जिल्ह्यात २०० च्या सरासरीने रुग्ण वाढले आहेत.कोरोनाची संख्या वाढत असल्याने जळगाव, भुसावळ व अमळनेर या तीन शहरांमध्ये सात दिवसांसाठी कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. मात्र, आतापर्यंत रुग्णवाढीचा संख्येवर कोणताही परिणाम झालेला नाही.छत्तीसगढ, उत्तराखंड, झारखंड या राज्यापेक्षाही जिल्हा पुढेजळगाव जिल्ह्यात सध्यस्थितीत (९ रोजी सायंकाळपर्यंत) ५ हजार १० इतके रुग्ण आहेत. जळगाव जिल्ह्यापेक्षा देशातील झारखंड,त्रिपुरा, गोवा, छत्तीसगढ व उत्तराखंड सारखे राज्यही मागे आहेत. राज्यात कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत जळगाव जिल्हा आठव्या स्थानावर आहे. रुग्णवाढीचा दर याचवेगाने कायम राहिल्यास केरळ व पंजाब या राज्यांनाही जळगाव जिल्हा मागे टाकण्याची भीती आहे. जिल्ह्यातील वाढत जाणारी कोरोना रुग्णांची संख्या आता प्रशासनासाठी व जिल्ह्यातील नागरिकांसाठीही चिंतेचा होत जात आहे.मृत्यूंची संख्याही तीनशे पारजिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीसोबतच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्याही वाढत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३०१ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ९८३ जणांनी कोरोनावर मात केली असून, सध्यस्थितीत १ हजार ७२६ जणांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये सर्वाधिक उपचार हे जळगाव शहरात सुरू आहेत. भुसावळ, जळगाव, अमळनेर या शहरांसह जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढत जाणारा संसर्ग प्रशासनाची डोकेदुखी वाढवत आहे. तसेच नागरिक अजूनही सोशल डिस्टन्सिंगच नियम पाळताना दिसून येत नाहीत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव