शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

जामनेर येथे पहिले राज्यस्तरीय तावडी बोली मराठी साहित्य संमेलन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 01:47 IST

पहिल्या राज्यस्तरीय तावडी बोली साहित्य संमेलनास रविवारी सकाळी ग्रंथ दिंडीने सुरुवात झाली. पालिका कार्यालयापासून निघालेल्या ग्रंथदिंडीत शालेय विद्यार्थी, शिक्षक, साहित्यिक उपस्थित होते.

ठळक मुद्देसंमेलनातील ग्रंथ दिंडीने वेधले जामनेरकरांचे लक्ष‘तावडी रत्न’ पुरस्कार मिळालेल्या आठ जणांचा सन्मानविविध साहित्यिकांच्या पुस्तकांचे झाले थाटात प्रकाशन

जामनेर, जि.जळगाव : पहिल्या राज्यस्तरीय तावडी बोली साहित्य संमेलनास रविवारी सकाळी ग्रंथ दिंडीने सुरुवात झाली. पालिका कार्यालयापासून निघालेल्या ग्रंथदिंडीत शालेय विद्यार्थी, शिक्षक, साहित्यिक उपस्थित होते.ग्रंथदिंडीत अग्रभागी संत गाडगेबाबांच्या वेशातील कार्यकर्ता रस्ता सफाई करीत होता. बैलगाडीवर बसलेली अस्मिता चौधरी ही बहिणाबाईच्या वेषात जात्यावर दळण दळत होती. दिंडीतील पालखीत ठेवलेल्या ग्रंथाचे व संविधानाचे पूजन नगरसेविका संध्या पाटील व जितेंद्र पाटील यांनी केले. दिंडीत न्यूू इंग्लिश स्कूल, बोहरा सेंट्रल, एकलव्य प्राथमिक, ज्ञानगंगा, खादगाव जि.प. शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. दिंडीत दीपक पाटील, नाना लामखेडे, सुधाकर माळी, डॉ. प्रशांत भोंडे, जितू गोरे, चंद्ररकांत मोरे यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते. स्वातंत्र सेनानींच्या वेशभूषेतील विद्यार्थी लक्ष वेधून घेत होते. ग्रंथ दिंडीच्या सुरुवातीला संमेलनाध्यक्ष गो.तु.पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. दिंडीत घोड्यावर बसलेल्या पारंपपरिक पोषाख घातलेल्या मुली लक्ष वेधून घेत होत्या.लोकजागर व गोंधळतावडी बोली साहित्य संमेलनात उद्घाटन सत्रानंतर लोकजागर व गोंधळ हा पारंपरिक कार्यक्रम सादर करण्यात आला. तळेगाव, ता.जामनेर येथील जय वाल्मीकी जनजागरण कलापथक मंडळाचे सदस्य अर्जुन कोळी, राहुल मगरे, नितीन कोळी, पंकज चौधरी, किरण कोळी, देवानंद कोळी यांनी लोकगीत सादर केले.सोयगाव, जिल्हा औरंगाबाद येथील जय वाल्मीकी पचरंग कलापथक मंडळातील योगेश साळवे, दिनेश निकम, शिवाजी अस्वार, गणेश इंगळे, प्रभाकर राऊत व प्रभाकर धनगर यांनी लावणी सादर केली.‘तावडी रत्नां’चा सत्कारतावडी बोली साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सत्रात पद्ममश्री ना.धों.महानोर व संमेलनाध्यक्ष गो.तु.पाटील यांच्या हस्ते ‘तावडी रत्न’ जाहीर झालेल्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात एकनाथ देशमुख, मधुकर पांढरे, दिलीप देशपांडे, रवींद्र पांढरे, बद्रीप्रसाद शर्मा, शिवदास पाटील, विठ्ठल काळे, रमेश महाजन यांना स्मृतीचिन्ह, शाल देऊन सन्मानित करण्यात आले.या पुस्तकांचे झाले प्रकाशनसाहित्य संमेलनात डॉ.अशोक कौतिक कोळी यांचे तावडी बोली, डॉ.प्रकाश सपकाळे यांचे तावडी माटी, प्रमोद पिवटे यांचे पंचायत व गजानन कुलकर्णी यांचे गंधवेड्या लहरी या पुस्तकांचे प्रकाशन महानोर यांच्यासह व्यासपीठावरील मान्यवरांनी केले.परिसंवादात आली रंगतसाहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात ‘तावडी बोली : महाराष्ट्रातील प्रमुख बोलीभाषा’ या विषयावर झालेल्या वक्त्यांनी रंगत आणली.परिसंवादात डॉ.शशिकांत पाटील (जालना), प्रा.डॉ.नितीन दांडेकर (एरंडोल), प्रा.डॉ.संदीप माळी (जामनेर), प्रा.समाधान पाटील (भुसावळ), प्रा.गणेश सूर्यवंशी (जळगाव), प्रा.किरण पाटील (जामनेर) यांनी सहभाग घेतला. अध्यक्षस्थानी नाहाटा महाविद्यालयातील प्रा.डॉ. प्रकाश सपकाळ होते. प्रा.पुरुषोत्ततम महाजन यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ. अक्षय घोरपडे यांनी आभार मानले.

टॅग्स :literatureसाहित्यJamnerजामनेर