शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

जामनेर येथे पहिले राज्यस्तरीय तावडी बोली मराठी साहित्य संमेलन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 01:47 IST

पहिल्या राज्यस्तरीय तावडी बोली साहित्य संमेलनास रविवारी सकाळी ग्रंथ दिंडीने सुरुवात झाली. पालिका कार्यालयापासून निघालेल्या ग्रंथदिंडीत शालेय विद्यार्थी, शिक्षक, साहित्यिक उपस्थित होते.

ठळक मुद्देसंमेलनातील ग्रंथ दिंडीने वेधले जामनेरकरांचे लक्ष‘तावडी रत्न’ पुरस्कार मिळालेल्या आठ जणांचा सन्मानविविध साहित्यिकांच्या पुस्तकांचे झाले थाटात प्रकाशन

जामनेर, जि.जळगाव : पहिल्या राज्यस्तरीय तावडी बोली साहित्य संमेलनास रविवारी सकाळी ग्रंथ दिंडीने सुरुवात झाली. पालिका कार्यालयापासून निघालेल्या ग्रंथदिंडीत शालेय विद्यार्थी, शिक्षक, साहित्यिक उपस्थित होते.ग्रंथदिंडीत अग्रभागी संत गाडगेबाबांच्या वेशातील कार्यकर्ता रस्ता सफाई करीत होता. बैलगाडीवर बसलेली अस्मिता चौधरी ही बहिणाबाईच्या वेषात जात्यावर दळण दळत होती. दिंडीतील पालखीत ठेवलेल्या ग्रंथाचे व संविधानाचे पूजन नगरसेविका संध्या पाटील व जितेंद्र पाटील यांनी केले. दिंडीत न्यूू इंग्लिश स्कूल, बोहरा सेंट्रल, एकलव्य प्राथमिक, ज्ञानगंगा, खादगाव जि.प. शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. दिंडीत दीपक पाटील, नाना लामखेडे, सुधाकर माळी, डॉ. प्रशांत भोंडे, जितू गोरे, चंद्ररकांत मोरे यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते. स्वातंत्र सेनानींच्या वेशभूषेतील विद्यार्थी लक्ष वेधून घेत होते. ग्रंथ दिंडीच्या सुरुवातीला संमेलनाध्यक्ष गो.तु.पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. दिंडीत घोड्यावर बसलेल्या पारंपपरिक पोषाख घातलेल्या मुली लक्ष वेधून घेत होत्या.लोकजागर व गोंधळतावडी बोली साहित्य संमेलनात उद्घाटन सत्रानंतर लोकजागर व गोंधळ हा पारंपरिक कार्यक्रम सादर करण्यात आला. तळेगाव, ता.जामनेर येथील जय वाल्मीकी जनजागरण कलापथक मंडळाचे सदस्य अर्जुन कोळी, राहुल मगरे, नितीन कोळी, पंकज चौधरी, किरण कोळी, देवानंद कोळी यांनी लोकगीत सादर केले.सोयगाव, जिल्हा औरंगाबाद येथील जय वाल्मीकी पचरंग कलापथक मंडळातील योगेश साळवे, दिनेश निकम, शिवाजी अस्वार, गणेश इंगळे, प्रभाकर राऊत व प्रभाकर धनगर यांनी लावणी सादर केली.‘तावडी रत्नां’चा सत्कारतावडी बोली साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सत्रात पद्ममश्री ना.धों.महानोर व संमेलनाध्यक्ष गो.तु.पाटील यांच्या हस्ते ‘तावडी रत्न’ जाहीर झालेल्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात एकनाथ देशमुख, मधुकर पांढरे, दिलीप देशपांडे, रवींद्र पांढरे, बद्रीप्रसाद शर्मा, शिवदास पाटील, विठ्ठल काळे, रमेश महाजन यांना स्मृतीचिन्ह, शाल देऊन सन्मानित करण्यात आले.या पुस्तकांचे झाले प्रकाशनसाहित्य संमेलनात डॉ.अशोक कौतिक कोळी यांचे तावडी बोली, डॉ.प्रकाश सपकाळे यांचे तावडी माटी, प्रमोद पिवटे यांचे पंचायत व गजानन कुलकर्णी यांचे गंधवेड्या लहरी या पुस्तकांचे प्रकाशन महानोर यांच्यासह व्यासपीठावरील मान्यवरांनी केले.परिसंवादात आली रंगतसाहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात ‘तावडी बोली : महाराष्ट्रातील प्रमुख बोलीभाषा’ या विषयावर झालेल्या वक्त्यांनी रंगत आणली.परिसंवादात डॉ.शशिकांत पाटील (जालना), प्रा.डॉ.नितीन दांडेकर (एरंडोल), प्रा.डॉ.संदीप माळी (जामनेर), प्रा.समाधान पाटील (भुसावळ), प्रा.गणेश सूर्यवंशी (जळगाव), प्रा.किरण पाटील (जामनेर) यांनी सहभाग घेतला. अध्यक्षस्थानी नाहाटा महाविद्यालयातील प्रा.डॉ. प्रकाश सपकाळ होते. प्रा.पुरुषोत्ततम महाजन यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ. अक्षय घोरपडे यांनी आभार मानले.

टॅग्स :literatureसाहित्यJamnerजामनेर