शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

प्रथम भगति संतन कर संगा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 22:26 IST

आजकाल जो तो धावपळीच जीवन जगतोय, प्रत्येकाची एकमेकासोबत स्पर्धा सुरु आहे. ती स्पर्धा पदाच्या हव्यासाची असो किंवा पैसा कमावण्याची ...

आजकाल जो तो धावपळीच जीवन जगतोय, प्रत्येकाची एकमेकासोबत स्पर्धा सुरु आहे. ती स्पर्धा पदाच्या हव्यासाची असो किंवा पैसा कमावण्याची असो प्रत्येक जण गोष्टीतून सुख शोधत आहे आणि ते सुख जर कलियुगात प्राप्त करायचे असेल तर एकच साधन ते म्हणजे भक्ती. चार युगे झाली त्यातील सतयुगात सगळीकडे आनंदी आनंद होता त्यानंतर त्रेतायुगात प्रभुश्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने सगळीकडे सुख समाधानाने लोक जीवन जगत होते त्यानंतर द्वापारयुगामध्ये युगामध्ये श्रीकृष्णाचा वास असल्याने सगळीकडे प्रेमाचा भरणा होता. सगळीकडे लोक आयुष्य प्रेमाने जगत होते.आपल्याला जर सुख मिळवायचे असेल तर सर्वात सोपे साधन म्हणजे ईश्वरभक्ती. ईश्वराची भक्ती करायची तर कशी करायची तर नवविधा भक्ती सांगितली आहे. त्यात सर्वात प्रथम भक्ती म्हणजे श्रवणभक्ती. भागवत श्रवण करून राजा परीक्षितीच मरण माघारी गेलं इतकी ताकद श्रवण भक्तीत आहे. पण ही भक्ती करण्यास आपल्याला अवघड जाईल म्हणून सर्वात सोपी भक्ती सांगितलेली आहे नामभक्ती. भूतलावर जन्म घेतल्यावर भगवंताला प्राप्त करायचे असेल तर सर्वात सोपे साधन म्हणजे नामभक्ती.जेव्हा सीतामातेचे रावणाने हरण केले होते तेव्हा सीतामतेला आणण्यासाठी सेतु पुल तयार करावा लागला तेव्हा नुसत्या प्रभुश्रीरामचंद्रांच्या नावाने दगडे तरली होती निर्जीव वस्तूला तारण्याची ताकद नामात आहे. आपल्यालाही हा संसाररूपी भवसागर तरून जायचा असेल तर नाम भक्ती करायला पाहिजे.राम आणि कृष्ण ही दोन्ही नावे घेऊन ईश्वराचे नामस्मरण करायला हवे या दोन्ही नामाने निश्चित मानव भवसागर तरुन जाईल. वाल्या कोळीने नाम भक्ती केली तर त्यांची वाल्मिकऋषी म्हणून ख्याती मिळवली, हे फक्त नामामुळेच शक्य झाले. नामभक्ती करून आपल्या जीवनात आनंदप्राप्ती करायला पाहिजे यापैकी कोणत्याही प्रकारची भक्ती करून आपण जीवन सार्थकी लावू या...- गजानन महाराज वरसाडेकर (जळगाव)

टॅग्स :Jalgaonजळगाव