शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
2
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
3
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
4
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
5
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
6
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
7
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
8
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
9
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
10
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
11
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
12
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
13
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
14
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
15
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
16
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
17
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
18
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
19
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
20
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास

आयत्या वेळी घुसविले आर्थिक विषय

By admin | Updated: June 6, 2014 13:58 IST

आयत्या वेळच्या विषय सूचित आर्थिक स्वरुप असलेले विषय घेऊन ते मंजूर करण्यासाठी ठेवू नये, असा संकेत जि.प. सर्वसाधारण सभेत झुगारण्यात आला.

जळगाव : आयत्या वेळच्या विषय सूचित आर्थिक स्वरुप असलेले विषय घेऊन ते मंजूर करण्यासाठी ठेवू नये, असा संकेत जि.प. सर्वसाधारण सभेत झुगारण्यात आला. काही विषयांवर स्वत: अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण पुढे केले. 

आयत्या वेळच्या विषयांमध्ये ७५ लाख रुपयांची तरतूद असलेल्या ई-लर्निंग कार्यक्रमासाठी आलेल्या कमी दराच्या निविदेवर विचार करून ती स्वीकृत करण्याचा विषय आणला. ही निविदा स्वीकारा, पण फक्त आमदारांच्या शिफारसी न घेता जि.प.सदस्यांची मागणी असलेल्या गावांमध्ये ई-लर्निंगचा कार्यक्रम राबविण्याचे ठरले. जि.प. ग्रामनिधीतून ग्रा.पं.कडून आलेली कर्ज प्रकरणे मंजूर करण्याचा आयत्या वेळचा विषयही मार्गी लागला. वर्षभर रखडलेला ५0 लाख रुपयांवरील तरतुदीचा शेळी गट वाटपाचा विषयही मांडण्यात आला, पण सदस्यांनी त्याला आक्षेप घेतला.
तसेच ८0 गाव योजनेसाठी ९५ पदांना मंजुरी देण्याचा आयत्या वेळचा विषयही मंजूर झाला. 
अर्थसंकल्पाबाबत अनेक सूचना
लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे या वेळेस सीईओंनी जि.प.चा अर्थसंकल्प (स्वनिधी) मंजूर केला होता. तो अवलोकनार्थ सभेत ठेवण्यात आला. त्यात कृषी योजनांसाठीची तरतूद वाढवा, विद्यार्थिनींसाठी एसटी पास व इतर सवलती द्या, पीव्हीसी पाईप वितरण योजनेत उत्कृष्ट दर्जाचे पाईप द्या आदी सूचना करण्यात आल्या. तसेच विद्यानिकेतन विद्यालयात शिक्षणसेवकांच्या मानधनासाठी अर्थसंकल्पात केलेली पाच लाख रुपयांची तरतूद चुकीची असल्याचे सभागृहाने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. 
हा विषय अर्थसंकल्पीय तरतुदीसाठी परस्पर आल्याचा खुलासा शिक्षणाधिकारी शिवाजी पाटील यांनी करून वेळ मारून नेली. मुख्य लेखा व वित्त अधिकार्‍यांनी मार्च एंडसंबंधी धरणगाव पं.स.चे अकाउंट क्लोज करण्याच्या कार्यवाहीबाबत पं.स.सभापती राजेंद्रपाटील यांनी जोरदार आक्षेप घेतला.
पटसंख्या कमी असली तरी चालेल..
कमी पटसंख्या असलेल्या ५९ शाळा बंद करण्याचा आयत्या वेळचा विषय मंजुरीसाठी सभेत आला असता हा विषय फक्त अवलोकनासाठी ठेवला असेल तर कायदा व शिक्षण हक्क कायद्याच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करा आणि मंजूर करण्यासाठी ठेवला असेल तर चार विद्यार्थी असलेल्या शाळेतही एक शिक्षक जायला हवा, असे सदस्य म्हणाले. शेवटी सीईओंनी यासंदर्भात व्यक्त केलेल्या मतानुसार म्हणजेच जेथे विद्यार्थ्यांना इतर शाळा जवळ नाहीत. विद्यार्थ्यांची गैरसोय होईल व पर्यायच नाही, अशा ठिकाणच्या शाळा सुरू राहतील. अर्थातच कमी पटसंख्या असलेल्या सर्वच ५९ शाळा बंद होणार नाहीत. यानुसार कार्यवाही करण्याचा निर्णय झाला.