शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

अखेर आरोग्य यंत्रणेत सुधारणांना सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 00:05 IST

कोरोनामुळे आरोग्य यंत्रणेतील त्रुटी, कमतरता झाल्या उघड, राजकीय पक्षांच्या दबावासोबत परिस्थिती ठरली कारणीभूत, यंत्रणा बळकटीकरण मोहिमेत सातत्य हवे

मिलिंद कुलकर्णीखान्देशात कोरोना रुग्णांचा आकडा ५०० पार करुन गेला. ६० लोकांचे बळी गेले. अद्याप परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. जनभावना क्रोधित आहे. प्रशासकीय यंत्रणा संभ्रमित आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने काही पावले उचलल्याचे या आठवड्यात दिसून आले. जळगावातील मृत्यूदर सर्वाधिक आहे. आकडेवारी तशी आहे. या रुग्णांना इतरही आजार होते, असा बचाव आरोग्य यंत्रणा करीत असली तरी ते केवळ जळगावातील रुग्णांबाबत असेल काय, ती परिस्थिती राज्य आणि देशातील सगळ्याच ठिकाणी असेल. परंतु, मूळ विषयाला बगल देण्याचा प्रकार सुरु आहे. दुसरा विषय तपासणी प्रयोगशाळेचा आहे. जळगाव आणि धुळे या दोन्ही ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आहेत. नंदुरबारसह तिन्ही जिल्ह्यातील नमुने तपासणीसाठी पूर्वी पुण्याला पाठविले जात असत. मालेगावात उद्रेक झाल्यानंतर राज्य शासनाने तातडीने धुळ्यात प्रयोगशाळा सुरु केली. मालेगाव सोबत अमळनेरात विस्फोट झाला आणि रुग्णसंख्या वाढू लागली. तालुका पातळीवर नमुने घेण्याची सुविधा केल्यानंतर नमुन्यांचे प्रमाण वाढले. धुळ्याच्या प्रयोगशाळेवर ताण येऊ लागला. अकोल्यात नमुने पाठविले असता तेथे बुलढाण्याचा भार अधिक होता. परिणाम असा होऊ लागला की, नमुन्यांचा अहवाल येण्याआधी काही रुग्णांचे निधन होऊ लागले. बाधित आणि संशयित असे दोन्ही रुग्ण एकाच ठिकाणी ठेवल्याने संसर्गाचा धोका वाढला. अहवाल येण्यापूर्वीच मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याने आणि बाधित नसल्याचे समजून विधिवत अंत्यसंस्कार झाल्याने संसर्ग अधिक झाल्याचे अमळनेरसारखे उदाहरण समोर आले. अखेर जळगावात प्रयोगशाळेसाठी दबाव वाढला. मंजुरी मिळाली, यंत्रसामुग्री आली. आता लवकरच ही प्रयोगशाळा कार्यान्वित होईल. भुसावळला ट्रॉमा सेंटर, चाळीसगावला रुग्णालय आणि उप जिल्हारुग्णालयाचे सक्षमीकरणाचा निर्णय प्रशासनाने घेतला. योग्य दिशेने आता पावले पडत आहे. जळगावातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता याठिकाणी समूह संसर्गाची चाचपणी करण्यासाठी केंद्रीय संस्था, आयसीएमआरचे वैद्यकीय अधिकारी आणि त्यांचे १५ तज्ज्ञांचे पथक एक दिवसासाठी जळगावात येऊन गेले. १० गावांमध्ये जाऊन प्रत्येकी ४० लोकांचे रक्तनमुने त्यांनी घेतले. चेन्नईच्या प्रयोगशाळेत त्याची तपासणी होईल आणि निष्कर्ष काही दिवसात येतील. हा निष्कर्ष कोरोनाच्या लढाईत उपयोगात येईल. आरोग्य यंत्रणेत कार्यरत असलेल्या आमदार गिरीश महाजन यांनी पुढाकार घेऊन जळगाव महापालिकेच्या नानीबाई रुग्णालयात अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्याचा संकल्प सोडला आहे. जी.एम.फाऊंडेशन, साई ग्रामीण फाउंडेशन आणि महापालिका यांच्या संयुक्त प्रयत्नाने अल्पदरात रक्त तपासणीसह इतर तपासण्या करुन मिळणार आहेत. खाजगी संस्थांनी पुढाकार घेण्याचा हा स्वागतार्ह प्रयत्न आहे. महाजन यांच्या या कृतीचे अनुकरण इतर राजकीय नेते करतात, हे देखील बघायला हवे.जळगाव व धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठात्यांची उचलबांगडी ही सार्वजनिक आरोग्य यंत्रणेतील सुधारणांची सुरुवात आहे. कोरोनामुळे या यंत्रणेतील कमतरता, त्रुटी आणि मर्यादा ठळकपणे समोर आल्या.कोरोनाचे संकट टळले की, पुन्हा यायंत्रणेकडे दुर्लक्ष व्हायला नको. शासकीय सेवेतील २३५ वैद्यकीय अधिकारी संकट काळात कामावर हजर होत नसतील, तर त्यांच्यावरदेखील अधिष्ठात्यांप्रमाणे कारवाई व्हायला हवी. नियुक्ती होऊनही रुजू न होणारे, बंधपत्र करुनही सेवा न देणाऱ्या डॉक्टरांविषयी कठोर निर्णय सरकारने घ्यायला हवे. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सक्षमीकरणासाठी प्रयत्न व्हावे.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव