शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

हुश्श ! अखेर मुहूर्त गवसला, कचऱ्यावर प्रक्रिया सुरु !

By सुनील पाटील | Updated: August 22, 2023 18:53 IST

नागरिकांची दुर्गंधीपासून मुक्तता : मनपाच्या उद्यानात वापरणार खत

जळगाव : गेल्या दीड वर्षापासून लालफितीत अडकलेल्या कचरा प्रकल्पाचा मंगळवारी मुहूर्त गवसला. कचऱ्यावर प्रकिया करण्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. कचऱ्यापासून तयार होणारे खत महापालिकेचे उद्यान, ऑक्सिजन पार्क आदी ठिकाणी वापरले जाणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या भागातील रहिवाशांची धूर व दुर्गंधीपासून मुक्तता झाली आहे.

महानगरपालिकेच्या आव्हाणे शिवारातील जागेत खत प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. संपूर्ण शहरातून संकलित होणारा कचरा या याठिकाणी आणला जातो. आजच्या घडीला तीन लाख क्युबिक मीटर कचरा साचलेला आहे. कोर इंजिनिअर अँड कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड अमरावती या कंपनीला काम देण्यात आले असून मंगळवारी कचऱ्यापासून खत प्रक्रिया करण्याच्या कामाला सुरुवात झाली. महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते नारळ वाढवून त्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील, विद्या गायकवाड, उपायुक्त अश्विनी गायकवाड, शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे, प्रकल्प अधिकारी योगेश बोरोले व पाणीपुरवठा उपअभियंता संजय नेमाडे आदी उपस्थित होते.

दरम्यान, जमा असलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या कामास मागील महासभेत मान्यता देऊन कार्यादेश निर्गमित करण्यात आले होते. त्यानुसार या कामाचे मक्तेदार कोर इंजिनिअर अँड कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड अमरावती यांच्याकडून काम सुरुवात करण्यात आलेली आहे. या कामी त्रयस्त यंत्रणा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्याकडून देखील प्राथमिक सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आलेले आहे. कामाचे क्षेत्रफळ निश्चित करण्यात आले आहे.

तीन लाख क्युबिक मीटर कचराप्रकल्याच्या ठिकाणी आज तीन लाख क्युबिक मीटर कचरा असून पहिल्या टप्प्यात १ लाख ६७ हजार क्युबिक मीटर कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे कार्यादेश मक्तेदाराला देण्यात आले आहे. सहा महिन्यात संपूर्ण कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे उद्दीष्ट देण्यात आलेले आहे. यातून तयार होणारे खत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जाणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव