शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

अखेर मनपातर्फे अंबरझरा पाटचारीची सफाई पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:12 IST

प्रभाव ''लोकमत''चा : पाटचारीतून काढला ५० टन गाळ जळगाव : मेहरुण तलावाचा मुख्य जलस्त्रोत असलेल्या अंबरझरा तलावाच्या पाटचारीत मोठ्या ...

प्रभाव ''लोकमत''चा : पाटचारीतून काढला ५० टन गाळ

जळगाव : मेहरुण तलावाचा मुख्य जलस्त्रोत असलेल्या अंबरझरा तलावाच्या पाटचारीत मोठ्या प्रमाणावर कचरा आणि गाळ साचल्याने ही पाटचारी तुडुंब भरल्याबाबतचे वृत्त 'लोकमत'ने गेल्या आठवड्यात प्रकाशित केले होते. तसेच पर्यावरणप्रेमींच्या मागणीनुसार पावसाळ्यापूर्वी मनपाने या पाटचारीची स्वच्छता करण्याबाबतही लक्ष वेधले होते. या वृत्ताची व मागणीची दखल घेत मनपा प्रशासनातर्फे नुकतीच जेसीबीच्या साहाय्याने अंबरझरा पाटचारीची पूर्ण स्वच्छता करण्यात आली आहे. या पाटचारीतून जेसीबीने ५० टनहून अधिक गाळ काढण्यात आला आहे.

जळगाव शहराचे वैभव असलेल्या मेहरुण तलावात गेल्या अनेक वर्षांपासून अंबरझरा या तलावातूनच पाणीपुरवठा होतो. मेहरुण तलावाचा हा एकच मुख्य जलस्त्रोत आहे. हा तलाव भरल्यानंतर पाटचारीद्वारे हे पाणी अंबरझरा तलावात येते. गेल्यावर्षी या पाटचारीची मराठी प्रतिष्ठानमार्फत सफाई करून, पाटचारीतील संपूर्ण गाळ काढण्यात आला होता. तसेच पाटचारी खोलही करण्यात आली होती. मात्र, या पाटचारीला लागून असलेल्या नागरीवस्तीमुळे मोठ्या प्रमाणावर काडी-कचरा या पाटचारीत जमा होतो. गेल्यावर्षी या पाटचारीची सफाई केल्यानंतर, आता पुन्हा या ठिकाणी काडी-कचरा व गाळ साचला आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी तातडीने पाटचारीची स्वच्छता करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींमधून करण्यात येत होती. तसेच याबाबत मराठी प्रतिष्ठानच्या वतीने विजय वाणी यांनीही महापौरांना भेटून पाटचारी साफसफाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर महापौर जयश्री महाजन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन या पाटचारीची सफाई नुकतीच पूर्ण केली आहे.

इन्फो :

..तर तलावही लवकर पूर्ण भरणार

मेहरुण तलावात अंबरझरा तलावाच्या पाटचारीद्वारेच पाणी येते. सध्या हा एकच तलावाचा मुख्य जलस्त्रोत आहे. जर पाटचारीची पावसाळ्यापूर्वी स्वच्छता केली नाही तर तलावाकडे येणारा पाण्याचा स्रोत मंदावत असतो. त्यामुळे तलाव अपूर्ण भरण्याची शक्यता राहते. मात्र, यंदाही पावसाळ्यापूर्वी मनपाने पाटचारीची पूर्ण स्वच्छता केल्यामुळे हा तलाव यंदा पूर्ण भरणार असल्याचे पर्यावरणप्रेमींनी सांगितले.