शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

अखेर मनपातर्फे अंबरझरा पाटचारीची सफाई पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:12 IST

प्रभाव ''लोकमत''चा : पाटचारीतून काढला ५० टन गाळ जळगाव : मेहरुण तलावाचा मुख्य जलस्त्रोत असलेल्या अंबरझरा तलावाच्या पाटचारीत मोठ्या ...

प्रभाव ''लोकमत''चा : पाटचारीतून काढला ५० टन गाळ

जळगाव : मेहरुण तलावाचा मुख्य जलस्त्रोत असलेल्या अंबरझरा तलावाच्या पाटचारीत मोठ्या प्रमाणावर कचरा आणि गाळ साचल्याने ही पाटचारी तुडुंब भरल्याबाबतचे वृत्त 'लोकमत'ने गेल्या आठवड्यात प्रकाशित केले होते. तसेच पर्यावरणप्रेमींच्या मागणीनुसार पावसाळ्यापूर्वी मनपाने या पाटचारीची स्वच्छता करण्याबाबतही लक्ष वेधले होते. या वृत्ताची व मागणीची दखल घेत मनपा प्रशासनातर्फे नुकतीच जेसीबीच्या साहाय्याने अंबरझरा पाटचारीची पूर्ण स्वच्छता करण्यात आली आहे. या पाटचारीतून जेसीबीने ५० टनहून अधिक गाळ काढण्यात आला आहे.

जळगाव शहराचे वैभव असलेल्या मेहरुण तलावात गेल्या अनेक वर्षांपासून अंबरझरा या तलावातूनच पाणीपुरवठा होतो. मेहरुण तलावाचा हा एकच मुख्य जलस्त्रोत आहे. हा तलाव भरल्यानंतर पाटचारीद्वारे हे पाणी अंबरझरा तलावात येते. गेल्यावर्षी या पाटचारीची मराठी प्रतिष्ठानमार्फत सफाई करून, पाटचारीतील संपूर्ण गाळ काढण्यात आला होता. तसेच पाटचारी खोलही करण्यात आली होती. मात्र, या पाटचारीला लागून असलेल्या नागरीवस्तीमुळे मोठ्या प्रमाणावर काडी-कचरा या पाटचारीत जमा होतो. गेल्यावर्षी या पाटचारीची सफाई केल्यानंतर, आता पुन्हा या ठिकाणी काडी-कचरा व गाळ साचला आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी तातडीने पाटचारीची स्वच्छता करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींमधून करण्यात येत होती. तसेच याबाबत मराठी प्रतिष्ठानच्या वतीने विजय वाणी यांनीही महापौरांना भेटून पाटचारी साफसफाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर महापौर जयश्री महाजन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन या पाटचारीची सफाई नुकतीच पूर्ण केली आहे.

इन्फो :

..तर तलावही लवकर पूर्ण भरणार

मेहरुण तलावात अंबरझरा तलावाच्या पाटचारीद्वारेच पाणी येते. सध्या हा एकच तलावाचा मुख्य जलस्त्रोत आहे. जर पाटचारीची पावसाळ्यापूर्वी स्वच्छता केली नाही तर तलावाकडे येणारा पाण्याचा स्रोत मंदावत असतो. त्यामुळे तलाव अपूर्ण भरण्याची शक्यता राहते. मात्र, यंदाही पावसाळ्यापूर्वी मनपाने पाटचारीची पूर्ण स्वच्छता केल्यामुळे हा तलाव यंदा पूर्ण भरणार असल्याचे पर्यावरणप्रेमींनी सांगितले.