शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

अखेर महादेव तांड्याचे टँकर पाणी भरण्यासाठी भुसावळ येथे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 14:48 IST

भुसावळ तालुक्यातील वॉटर टँकरच्या स्टिंग आॅपरेशनसंदर्भात ‘लोकमत’ने दणका देताच पंचायत समितीकडून महादेव तांडा येथे पुरवण्यात येणाऱ्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे, तर शुक्रवारपासून पुन्हा तो टँकर भुसावळ येथे पालिकेच्या विहिरीवर पाणी भरण्यासाठी पाठवण्यात येत आहे,

ठळक मुद्देपाण्याचे नमुनेही तपासणीसाठी प्रयोगशाळेतबिलांची चौकशी करणार - गटविकास अधिकारीलोकमत स्टिंग आॅपरेशनचा दणका

भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील वॉटर टँकरच्या स्टिंग आॅपरेशनसंदर्भात ‘लोकमत’ने दणका देताच पंचायत समितीकडून महादेव तांडा येथे पुरवण्यात येणाऱ्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे, तर शुक्रवारपासून पुन्हा तो टँकर भुसावळ येथे पालिकेच्या विहिरीवर पाणी भरण्यासाठी पाठवण्यात येत आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी विलास भटकर यांनी दिली.बिलासंदर्भात जीपीएस रेकॉर्ड मागणारदरम्यान, वॉटर टँकर कुठे भरण्यात आला व बिले कुठली काढण्यात आली, यासंदर्भात जी.पी.एस. मशीनचा आधार घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयातून त्यासंदर्भात जीपीएस मशीनचे रेकॉर्ड मागविण्यात येईल व चौकशी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.वॉटर टँकरसंदर्भात ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन केले. यात महादेव ताडा येथे पाणीपुरवठ्यासाठी वापरण्यात येणारा टँकर अतिशय गळका असून, ट्रॅकर भुसावळ पालिकेच्या विहिरीवरून भरण्याचे आदेश होते. मात्र संबंधित अधिकाऱ्यांच्या छुप्या आशीर्वादाने हा टँकर कधी कुºहे (पानाचे) येथील गावातून, तर कधी धरणाच्या बॅकवॉटरजवळील एका नर्सरीमधील बोअरवेलमधून भरण्यात येत होता. यासंदर्भात ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन करून वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्ताची दखल घेऊन पंचायत समितीने एका विहिरीच्या पाण्याचे नमुने घेतले व हे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे समोर आले आहे, तर शुक्रवारपासून पुन्हा हे टँकर भुसावळ येथून पाणी भरण्यासाठी जात असल्याचे सांगण्यात आले.दरम्यान, या टँकरमध्ये जीपीएस मशीन बसविण्यात आली आहे. मात्र तरीही हा टँकर दिलेले ठिकाण सोडून वेगळ्याच जागेवरून पाणी भरत होता, हे स्टिंग आॅपरेशनमधून उघडकीस आले आहे. संबंधित अधिकाºयांनी याकडे दुर्लक्ष का केले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कुºहे (पानाचे) येथून टँकर भरण्यात येत असला, तरी पाण्याची विहीर हस्तांतरित का करण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. हस्तांतरण नगरपालिकेची विहीर करण्यात आली नाही. पाणी मात्र अवघ्या पाच किलोमीटरवरून भरण्यात येत असल्यामुळे या प्रकरणात गैरव्यवहार झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.विहिरीसाठी दहा लाख खर्च, तरीही करावा लागत आहे टँकरने पाणीपुरवठादरम्यान, महादेव तांडा येथे पाणीपुरवठा करण्यात यावा यासाठी गेल्या वर्षी जवाहर रोजगार योजनेअंतर्गत विहिरीसाठी तब्बल दहा लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. शेतकºयांसाठी केवळ दोन लाख रुपये मिळत असताना शासनाच्या विहिरीसाठी मात्र तब्बल दहा लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. येथे विहिरीचे खोदकाम व बांधकामही पूर्ण झाले आहे. बांधकामाचे पैसे मात्र अद्याप देण्यात आले नाही. विहीर व बांधकाम पूर्ण झाले असतानाही पाईपलाईन का करण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.प्रशासनाची बंजारा वस्तीच्या नागरिकांना पाण्यासाठी का ठेकेदाराच्या हितासाठी धडपड?कुºहे (पानाचे) ग्रामपंचायतीच्या तब्बल दोन विहिरी अद्यापही पडून आहे. वराडसीम रस्त्यावरील गुंडाइत पाझर तलावाजवळ ग्रामपंचायतीची एक विहीर आहे. या विहिरीवरून कुºहे (पानाचे) येथे पाणीपुरवठा योजनाही राबविण्यात आली आहे, तर सूर नदीच्या जवळ गेल्यावर्षी जवाहर योजनेंतर्गत विहीर खोदण्यात आली आहे. या दोनपैकी एका विहिरीवरून पाण्याचे टँकर भरणे सोयीचे आहे. मात्र तरीही शासनाने तब्बल १५ ते १७ किलोमीटर अंतरावरील पालिकेची विहीर का अधिग्रहित केली, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यावरून प्रशासन महादेवतांडावासीयांच्या पाण्यासाठी धडपडते का, की ठेकेदाराचे हित जोपासते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईBhusawalभुसावळ