खापर : अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील ग्रामस्थांना आपल्या मर्कटलीलांनी हैराण करून सोडणा:या माकडांना सिल्लोड येथील प्राणीमित्र समाधान गिरी व त्यांच्या सहका:यांनी शिताफीने पिंज:यात कोंडून औरंगाबाद येथील कन्नड घाटातील गौेताळा अभयारण्यात शुक्रवारी सोडले. खापर गावात गेल्या चार ते पाच वर्षापासून तीन माकडं गावात आली. त्यांच्या मर्कटलीला पाहून ग्रामस्थांना बरे वाटत असे. माकडांच्या नवलाईमुळे कोणी शेंगा, केळी, पोळी आदी पदार्थ त्यांना खाऊ घालत. त्यामुळे ते येथेच वस्ती करून राहू लागले. पुढे त्यांची संख्या 10 ते 12 वर पोहोचल्यावर मात्र त्यांनी चांगलाच उच्छाद मांडला होता. बाजारपेठेतील लॉरीधारकांचा माल सांडणे, खाद्यपदार्थ बळजबरीने घेणे यासह मोकाट गायी, बैल यांच्या अंगावर थाप मारून किंवा शेपटी धरून त्यांना डिवचणे असे प्रकारी करीत असल्यामुळे मोकाट गुरे सैरावैरा धावत. त्यातून अनेक जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. तसेच कौलारू घरांचे नुकसान, मोबाइल हिसकावून नेणे, कपडे काढून नेणे आदी प्रकारांमुळे नागरिक त्रस्त झाले होते. याबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासन, पोलीस अधिकारी व वनअधिका:यांकडे वारंवार तक्रारी केल्या. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. परंतु नव्याने आलेले वनअधिकारी यांना येथील ग्रामपंचायतचे उपसरपंच ललित जाट यांनी घटनेची परिस्थिती सांगून माकडं पकडण्याविषयी विनंती केली असता त्यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथील प्राणीमित्र समाधान गिरी यांच्याशी संपर्क साधून माकडं पकडण्यासाठी सांगितले. गिरी आपल्या वाहनासह आले. त्यांनी रात्री सापळा लावून पहाटे आठपैकी पाच माकडं पकडून नेली. उर्वरित माकडांनी मात्र गावातून पोबारा केला असून, गावात कुठेही आढळून येत नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या कामाविषयी समाधान व्यक्त केले आहे. याप्रसंगी ग्रामपंचायतचे सुरेश जैन, सरपंच रामसिंग पाडवी, माजी उपसरपंच लक्ष्मण वाडिले आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
अखेर खापरमध्ये 5 माकडं जेरबंद
By admin | Updated: December 5, 2015 09:07 IST