शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

नशिराबादला हाणामारी, विळा,काठीचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:17 IST

नशिराबाद : दोन गटात विळा व काठीचा वापर करीत हाणामारी झाली. त्यात तीन जण जखमी झाले आहे. ही घटना ...

नशिराबाद : दोन गटात विळा व काठीचा वापर करीत हाणामारी झाली. त्यात तीन जण जखमी झाले आहे. ही घटना नशिराबाद पेठ भागात सोमवारी रात्री घडली. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंदन एकनाथ धनगर (३०)यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मागील भांडणाच्या कारणावरून गोपाळ गोविंदा धनगर याने शिवीगाळ करून विळ्याने चंदन धनगर याच्या डोक्यात गंभीर दुखापत करीत जमिनीवर फेकले. त्यासोबत खुशाल गोविंदा धनगर, भगवान गोविंदा धनगर, गोविंदा भोजू धनगर, (सर्व रा. पेठभाग, नशिराबाद ) या सर्वांनी चंदन धनगर यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली व ठार मारण्याची धमकी दिली. या वरून या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या फिर्यादीत सुनिता भगवान धनगर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की , १४ मार्च रोजी कमलेश विष्णू धनगर याच्या हळदी च्या कार्यक्रमात नाचण्यावरून दीर गोपाळ व लोकेश प्रल्हाद धनगर यांच्यात वाद झाले होते. १५ मार्च रोजी लोकेश प्रल्‍हाद धनगर, चेतन संतोष धनगर, कुंदन एकनाथ धनगर (सर्व रा.पेठ, नशिराबाद) भूषण ज्ञानेश्वर बाविस्कर (रा. डोंगर कठोरा, यावल) हळदीच्या दिवशी झालेल्या वादावरुन गोपाळ धनगर यास लाकडी काठीने मारहाण केली. भांडण सोडवण्याकरिता गेले असता आम्हालादेखील मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सुनिता धनगर यांच्या पायाला दुखापत केली असल्याचे ही फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रवीण ढाके तपास करीत आहे.