शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

पोलिसांचा धाक संपला; की चोरट्यांची दहशत वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:55 IST

सुनील पाटील पोलिसांचा धाक संपला; की चोरट्यांची दहशत वाढली शहरात आठवडाभरात भरदिवसा घरफोड्या, रोकड असलेल्या बॅगा लांबविणे, रस्त्याने जाणाऱ्या ...

सुनील पाटील

पोलिसांचा धाक संपला; की चोरट्यांची दहशत वाढली

शहरात आठवडाभरात भरदिवसा घरफोड्या, रोकड असलेल्या बॅगा लांबविणे, रस्त्याने जाणाऱ्या लोकांचे मोबाइल लांबविणे, दुचाकी चोरी अशा घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या. कहर म्हणून की काय तीन वर्षाची चिमुरडी व तिच्या आई, वडिलांच्या गळ्याला चाकूसारखे धारदार शस्त्र लावून २३ लाखांची लूट करण्यात आली. व्यापाऱ्याच्या डिक्कीतून १ लाख ६० हजार लांबविल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा वकिलाच्या दुचाकीला लावलेली अडीच लाख रुपये असलेली बॅग लांबविण्यात आली. दोन दिवसांपूर्वी तर भरदिवसा तीन घरफोड्या झाल्या. आठवड्यातील एकही दिवस असा गेला नाही की त्या दिवशी चोरी व घरफोडीची घटना घडली नाही. घटना घडत असल्या तरी त्यातील आरोपींचा शोध मात्र लागलेला नाही, उलट घटना वाढतच चालल्या आहेत. त्यामुळे पोलिसांचा धाक संपला आहे? की चोरट्यांची दहशत वाढली आहे? घरफोडी, चोरी, लुटीची घटना घडली की, पोलीस घटनास्थळावर जातात, पंचनामा होतो, श्वान पथक येते. यासह पांढरा कागद काळा होतो, हा सोपस्कार पार पडतो. परंतु, पुढे काहीही होत नाही. पोलीस ठाण्यांकडे इतर कामे असली तरी स्थानिक गुन्हे शाखेचे कामच गुन्हे उघडकीस आणण्याचे आहे, मात्र या आठवडाभरात घडलेली एकही घटना या शाखेकडून उघडकीस आलेली नाही. पोलीस ठाण्यांचे गुन्हे शोध पथकेही निष्क्रिय झाल्याचे दिसून येत आहे. पोलीस यंत्रणेचे हे अपयश मानले जात असून ना गुंडावर वचक बसवू शकले ना चोरट्या रोखू शकले. मूळ पोलिसिंगपेक्षा इतर कामांमध्येच काही पोलिसांना रस असल्याचे दिसून येत आहे, त्यास क्षणिक स्वार्थ, सुखासाठी अधिकाऱ्यांचे पाठबळ असणे हेच घातक ठरत आहे. चोरी, घरफोड्या, दरोडा, लूट व महिला, मुलांची छेडखानी या घटनांवर नियंत्रण असणे अत्यंत गरजेचे आहे, तसे झाले तर पोलिसांविषयी जनतेत आदर वाढेल.