शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचा धाक संपला; की चोरट्यांची दहशत वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:55 IST

सुनील पाटील पोलिसांचा धाक संपला; की चोरट्यांची दहशत वाढली शहरात आठवडाभरात भरदिवसा घरफोड्या, रोकड असलेल्या बॅगा लांबविणे, रस्त्याने जाणाऱ्या ...

सुनील पाटील

पोलिसांचा धाक संपला; की चोरट्यांची दहशत वाढली

शहरात आठवडाभरात भरदिवसा घरफोड्या, रोकड असलेल्या बॅगा लांबविणे, रस्त्याने जाणाऱ्या लोकांचे मोबाइल लांबविणे, दुचाकी चोरी अशा घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या. कहर म्हणून की काय तीन वर्षाची चिमुरडी व तिच्या आई, वडिलांच्या गळ्याला चाकूसारखे धारदार शस्त्र लावून २३ लाखांची लूट करण्यात आली. व्यापाऱ्याच्या डिक्कीतून १ लाख ६० हजार लांबविल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा वकिलाच्या दुचाकीला लावलेली अडीच लाख रुपये असलेली बॅग लांबविण्यात आली. दोन दिवसांपूर्वी तर भरदिवसा तीन घरफोड्या झाल्या. आठवड्यातील एकही दिवस असा गेला नाही की त्या दिवशी चोरी व घरफोडीची घटना घडली नाही. घटना घडत असल्या तरी त्यातील आरोपींचा शोध मात्र लागलेला नाही, उलट घटना वाढतच चालल्या आहेत. त्यामुळे पोलिसांचा धाक संपला आहे? की चोरट्यांची दहशत वाढली आहे? घरफोडी, चोरी, लुटीची घटना घडली की, पोलीस घटनास्थळावर जातात, पंचनामा होतो, श्वान पथक येते. यासह पांढरा कागद काळा होतो, हा सोपस्कार पार पडतो. परंतु, पुढे काहीही होत नाही. पोलीस ठाण्यांकडे इतर कामे असली तरी स्थानिक गुन्हे शाखेचे कामच गुन्हे उघडकीस आणण्याचे आहे, मात्र या आठवडाभरात घडलेली एकही घटना या शाखेकडून उघडकीस आलेली नाही. पोलीस ठाण्यांचे गुन्हे शोध पथकेही निष्क्रिय झाल्याचे दिसून येत आहे. पोलीस यंत्रणेचे हे अपयश मानले जात असून ना गुंडावर वचक बसवू शकले ना चोरट्या रोखू शकले. मूळ पोलिसिंगपेक्षा इतर कामांमध्येच काही पोलिसांना रस असल्याचे दिसून येत आहे, त्यास क्षणिक स्वार्थ, सुखासाठी अधिकाऱ्यांचे पाठबळ असणे हेच घातक ठरत आहे. चोरी, घरफोड्या, दरोडा, लूट व महिला, मुलांची छेडखानी या घटनांवर नियंत्रण असणे अत्यंत गरजेचे आहे, तसे झाले तर पोलिसांविषयी जनतेत आदर वाढेल.