शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

किराणा दुकानांच्या वेळेच्या मर्यादेमुळे कृत्रिम टंचाईची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ब्रेक द चेन दरम्यान किराणा दुकानाच्या वेळा आता सकाळी सात ते ११ वाजेपर्यंत मर्यादित ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : ब्रेक द चेन दरम्यान किराणा दुकानाच्या वेळा आता सकाळी सात ते ११ वाजेपर्यंत मर्यादित केल्यास मालाच्या आवक-जावकवर परिणाम होऊन कृत्रिम टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे व भाववाढदेखील होऊ शकते. त्यामुळे याचा पुनर्विचार करावा, अशी मागणी जिल्हा व्यापारी महामंडळाच्यावतीने करण्यात आली आहे.

ब्रेक द चेनमध्ये किराणा दुकान सुरू असल्याने त्या नावाखाली अनेक जण बाहेर फिरत आहे, असे सांगत सोमवारी राज्य सरकारने किराणा दुकानांच्या वेळांवर देखील मर्यादा आणली. यामध्ये किराणा दुकाने सकाळी सात ते ११ या वेळेत सुरू राहणार असल्याचे म्हटले आहे. याविषयी जिल्हा व्यापारी महामंडळाने आक्षेप घेत किराणा दुकानांच्या वेळेला निर्बंध लावल्यास मालाच्या आवक-जावकवर परिणाम होऊन त्याची कृत्रिम टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे, असे म्हटले आहे. यासोबतच मालाची भाववाढ होऊन त्याचा भार ग्राहकांवर येऊ शकतो. इतकेच नव्हे दुकाने कमी वेळ सुरू राहिल्याने या ठिकाणी अधिक गर्दी होईल व संसर्गाची भीतीदेखील वाढू शकते. त्यामुळे राज्य सरकारने या निर्णयाचा विचार करावा, अशी मागणी जिल्हा व्यापारी महामंडळाच्यावतीने सचिव ललित बरडिया यांनी केली आहे.