शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा पितृपक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 15:56 IST

दिवंगत व्यक्ती तथा पूर्वजांविषयी स्मरण व त्या व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या पितृपक्षास आज २५ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे.

ठळक मुद्देपितृपंधरवडा आजपासून सुरुहिंदू संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्वहिंदू संस्कृतीमध्ये पितृपक्ष पंधरवाड्याला भावनिक महत्त्व

प्रसाद धर्माधिकारीनशिराबाद, जि.जळगाव : दिवंगत व्यक्ती तथा पूर्वजांविषयी स्मरण व त्या व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या पितृपक्षास आज २५ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. हिंदू संस्कृतीमध्ये पितृपक्ष पंधरवड्याला भावनिक महत्त्व असून, सर्वपित्री अमावस्येला पितृपक्षाची सांगता होणार आहे.ग्रामीण भाग असो वा शहरी, पितृपक्ष पंधरवडा सर्वत्र पाळला जातो. भाद्रपद महिन्यातील वद्यपक्ष पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. दिवंगत व्यक्ती, वाडवडिलांच्या, पूर्वजांच्या मृत्यूतिथीला या पंधरवड्यात त्या-त्या तिथीला श्राद्ध (तर्पण) केले जाते. तर्पण केल्याने मृत पितरांना सुख लाभते ते संतुष्ट होतात अशी भावना आहे.स्नेहवृद्धीसाठी यांचा वापरगोपीचंदन, काळी तीळ, जव, जानवे, पुष्प, तुळशी पाने, दर्भ, पवित्री, फुले, हार, भात श्राद्ध कर्मात वापरत असतात. काळी तीळ स्नेहाचे तर जव हे समृद्धीचे प्रतीक आहे. पिंडदानासाठी भातात मध, तुळशीपत्र, तूप, तीळ, जव यांचा वापर करतात.तिथींचे महत्त्वपितृपक्षात तिथींना अनन्य महत्त्व आहे. शस्त्राने मृत झालेले, संन्यास घेऊन मृत झालेले, माहेरपणी मृत्यू झालेल्या सवाष्णी वगैरेंसाठी ठरावीक तिथीला श्राद्ध केले जाते. त्यात सर्वपित्री अमावस्या साºया पितरांसाठी आहे.श्राद्धाचे प्रकारश्राद्ध क्रियेत तत श्राद्धम म्हणजेच श्रद्धेने केलेले कार्य किंवा यालाच श्राद्ध असे म्हणतात. और्ध्ददेहिक श्राद्ध, संवत्सारिक, पार्वणी, तीर्थ, त्रिपिंडी, हिरण्यश्राद्ध, महालय श्राद्ध आदी श्राद्धाचे प्रकार आहेत.तिथीनुसार श्राद्धश्राद्ध हे तिथीनुसार करावे असे शास्त्रवचन आहे. आज २५ रोजी महालय श्राद्धारंभ असून प्रतिपदा श्राद्ध, २६ रोजी द्धितीया श्राद्ध, २७ रोजी तृतीया श्राद्ध, २८ रोजी चतुर्थी श्राद्ध, भरणी श्राद्ध, २९ रोजी पंचमी श्राद्ध, ३० रोजी पष्ठी श्राद्ध, १ आॅक्टोबरला सप्तमी श्राद्ध, २ रोजी अष्टमी श्राद्ध, ३ रोजी अविधवा नवमी श्राद्ध, ४ रोजी दशमी श्राद्ध, ५ रोजी एकादशी श्राद्ध, ६ रोजी द्वादशी श्राद्ध, ७ रोजी त्रयोदशी-चतुर्दशी श्राद्ध, ८ रोजी सर्वपित्री अमावस्या श्राद्ध, ९ रोजी मातामह श्राद्ध आहे.पितृपक्ष म्हटला की मनात एक अनामिक भीती निर्माण होते. शरीर आणि मनाला जडत्व येते. तसे पाहिले तर पूर्वजांच्या स्मरणाचा हा काळ आहे. पुढच्या पिढीला संस्कारित करण्याचे कार्य पूर्वीच्या पिढीने केले आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त करण्याचा कालखंड आहे. तेव्हा मनात भीती न बाळगता पूर्वजांचे स्मरण व्हायला हवे. बदलत्या काळाची ती मागणी आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव