शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा पितृपक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 15:56 IST

दिवंगत व्यक्ती तथा पूर्वजांविषयी स्मरण व त्या व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या पितृपक्षास आज २५ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे.

ठळक मुद्देपितृपंधरवडा आजपासून सुरुहिंदू संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्वहिंदू संस्कृतीमध्ये पितृपक्ष पंधरवाड्याला भावनिक महत्त्व

प्रसाद धर्माधिकारीनशिराबाद, जि.जळगाव : दिवंगत व्यक्ती तथा पूर्वजांविषयी स्मरण व त्या व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या पितृपक्षास आज २५ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. हिंदू संस्कृतीमध्ये पितृपक्ष पंधरवड्याला भावनिक महत्त्व असून, सर्वपित्री अमावस्येला पितृपक्षाची सांगता होणार आहे.ग्रामीण भाग असो वा शहरी, पितृपक्ष पंधरवडा सर्वत्र पाळला जातो. भाद्रपद महिन्यातील वद्यपक्ष पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. दिवंगत व्यक्ती, वाडवडिलांच्या, पूर्वजांच्या मृत्यूतिथीला या पंधरवड्यात त्या-त्या तिथीला श्राद्ध (तर्पण) केले जाते. तर्पण केल्याने मृत पितरांना सुख लाभते ते संतुष्ट होतात अशी भावना आहे.स्नेहवृद्धीसाठी यांचा वापरगोपीचंदन, काळी तीळ, जव, जानवे, पुष्प, तुळशी पाने, दर्भ, पवित्री, फुले, हार, भात श्राद्ध कर्मात वापरत असतात. काळी तीळ स्नेहाचे तर जव हे समृद्धीचे प्रतीक आहे. पिंडदानासाठी भातात मध, तुळशीपत्र, तूप, तीळ, जव यांचा वापर करतात.तिथींचे महत्त्वपितृपक्षात तिथींना अनन्य महत्त्व आहे. शस्त्राने मृत झालेले, संन्यास घेऊन मृत झालेले, माहेरपणी मृत्यू झालेल्या सवाष्णी वगैरेंसाठी ठरावीक तिथीला श्राद्ध केले जाते. त्यात सर्वपित्री अमावस्या साºया पितरांसाठी आहे.श्राद्धाचे प्रकारश्राद्ध क्रियेत तत श्राद्धम म्हणजेच श्रद्धेने केलेले कार्य किंवा यालाच श्राद्ध असे म्हणतात. और्ध्ददेहिक श्राद्ध, संवत्सारिक, पार्वणी, तीर्थ, त्रिपिंडी, हिरण्यश्राद्ध, महालय श्राद्ध आदी श्राद्धाचे प्रकार आहेत.तिथीनुसार श्राद्धश्राद्ध हे तिथीनुसार करावे असे शास्त्रवचन आहे. आज २५ रोजी महालय श्राद्धारंभ असून प्रतिपदा श्राद्ध, २६ रोजी द्धितीया श्राद्ध, २७ रोजी तृतीया श्राद्ध, २८ रोजी चतुर्थी श्राद्ध, भरणी श्राद्ध, २९ रोजी पंचमी श्राद्ध, ३० रोजी पष्ठी श्राद्ध, १ आॅक्टोबरला सप्तमी श्राद्ध, २ रोजी अष्टमी श्राद्ध, ३ रोजी अविधवा नवमी श्राद्ध, ४ रोजी दशमी श्राद्ध, ५ रोजी एकादशी श्राद्ध, ६ रोजी द्वादशी श्राद्ध, ७ रोजी त्रयोदशी-चतुर्दशी श्राद्ध, ८ रोजी सर्वपित्री अमावस्या श्राद्ध, ९ रोजी मातामह श्राद्ध आहे.पितृपक्ष म्हटला की मनात एक अनामिक भीती निर्माण होते. शरीर आणि मनाला जडत्व येते. तसे पाहिले तर पूर्वजांच्या स्मरणाचा हा काळ आहे. पुढच्या पिढीला संस्कारित करण्याचे कार्य पूर्वीच्या पिढीने केले आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त करण्याचा कालखंड आहे. तेव्हा मनात भीती न बाळगता पूर्वजांचे स्मरण व्हायला हवे. बदलत्या काळाची ती मागणी आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव