शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
3
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यंवशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
4
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
5
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
6
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
7
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
8
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
9
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
10
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
11
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
12
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
13
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
14
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
15
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
16
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
17
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
18
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
19
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
20
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला

पिता-पुत्र गोविंद आणि तोताराम महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 12:37 IST

प्रकाशा येथील प्रा. मंगला सखाराम चौधरी यांनी या विषयाचा शोध जागर पीएच.डी.साठी सुरू ठेवला आहे.

ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 20 - खानदेशच्या आध्यात्मिक आकाशातले हे पिता-पुत्र म्हणजे देदिप्यमान तारकदळ होत. खानदेशच्या या संत परंपरेत अठरा पगड समाजातील संत सत्पुरुष आढळतात, हे एक विशेष होय. आपल्या भक्ती आणि सदाचाराने सामाजिक जीवन ढवळून काढणारे आणि ईश्वरसानिध्य पोहोचविण्यासाठी सातत्याने धडपड करणारे पिता-पुत्र म्हणून खानदेशच्या संतांच्या मांदियाळीचा विचार करताना यांचे कृतज्ञ स्मरण राखावे लागते. प्रकाशा येथील प्रा. मंगला सखाराम चौधरी यांनी या विषयाचा शोध जागर पीएच.डी.साठी सुरू ठेवला आहे. त्यांचे अभिनंदन. खानदेशच्या संत परंपरेचा विचार करू जाता पिता-पुत्र म्हणून ज्या जोडीचे स्मरण अनिवार्य आहे, असे आहेत श्री गोविंद महाराज आणि श्री तोताराम महाराज. श्री गोविंद महाराज यांचा जन्म पिंपळगाव हरेश्वर येथे 1782 साली झाला असावा. वडील ङोंडुला पाटील आणि आई काशीबाई. संशोधनाअंती महाराजांचा जन्म उत्राण येथे झाला असल्याचे प्रमाण मानन्यात येते. गोविंद महाराज हे विठ्ठलोपासक वारकरी होते. गोविंद महाराजांचा जन्म गुजर्र समाजात झाला. महाराजांच्या जन्मानंतर तत्कालीन अंधाधुंदीच्या राजकीय परिस्थितीमुळे आपल्या कुटुंबातील मुला-माणसांना गावोगावी घेऊन जावे लागले. ती संपूर्ण हकिकत समर्थ गोविंद महाराज चरित्रातून सविस्तरपणे आली आहे. गोविंद बुवा 1816 साली धाता नाम संवत्सरात भाद्रपद शुद्ध चतुर्दशीस जामनेरहून पिंपळगावी आल्याचा उल्लेख आढळतो. आयुष्यभर महाराज तिथेच राहिले आणि पुढे तेथेच समाधी घेतली.भाविक जनांच्या मते गोविंद महाराज हे संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अवतार मानले जातात. अवलिया आणि निरीच्छ वृत्तीने राहणा:या गोविंद महाराजांना वडील वेडा म्हणून हाक मारायचे. महाराजांनी आपल्या नाममुद्रेत ‘गोविंद म्हणे’ याऐवजी ‘वेडा म्हणे’ असा बदल करून घेतला. तुकाराम महाराजांप्रमाणेच आपणही स्वप्नोपदिष्ट असल्याचे महाराज सांगत. गोविंद महाराजांच्या गुरूंचे नाव पांडुरंगाने रायाजी असल्याचे सांगितले होते. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षीच महाराजांना गुरुपदेश लाभला होता आणि त्या वेळेपासूनच त्यांनी अभंग रचनेला सुरुवात केली होती. प्रपंचात राहूनही ते विरागी होते. श्री क्षेत्र उत्राण येथे श्री रायाजी बुवा नावाचे दखनी मराठा समाजाचे एक सद्गृहस्थ होते. त्यांच्याकडे ज्ञानेश्वरीचे नित्य पारायण सुरू असायचे. त्यांना गुरुस्थानी मानत असल्यामुळे गोविंद महाराज तेथे जाऊन बसत असत. महाराजांचे ‘उडीचे अभंग’ प्रसिद्ध आहेत. श्री विठ्ठलाच्या दर्शनार्थ पंढरपूर येथे गेल्यावर उंचच उंच उडी मारून भक्तजन विठोबाला नमन करतात. या कारणासाठी हे उडीचे अभंग गोविंद महाराजांनी रचले आहेत. यातून भक्त आणि वारकरी जनांसाठी भक्तीचा एक उमाळा जागत राहिला होता. त्यांच्या प्रकाशित साहित्यात प्रामुख्याने नवविधा भक्तियोग, अभंगवाणी, गोविंद महाराज रचित शेज आरती आणि काकडा आरती यासारखे साहित्य प्रकाशित आहे. जामनेर येथील चंद्रकांत मोरे यांनी ‘श्री गोविंद समर्थ’ नावाने प्रसिद्ध केलेला ग्रंथ जिज्ञासूंनी अवश्य अभ्यासावा असा आहे. श्री तोताराम महाराजांचा कार्यकाळ 1813 ते 1854 असा सांगता येईल. प्रकाशा येथे तोताराम महाराजांचे मंदिर आहे. येथे नियमितपणे उत्सव होतात. गोविंद महाराज यांचे चिरंजीव तोताराम महाराज. तोताराम महाराजांना नारायण, केशव, माधव व पांडुरंग अशी मुले. पांडुरंगाला वामन बाबा नावाचा एक पुत्र झाला. वामन बाबांचे माधव व रामदास हे पुत्र, तर माधवरांचे रामकृष्ण. रामकृष्ण यांचे चिरंजीव शिवानंद होत.श्री तोताराम महाराजांनी 246 अभंग लिहिले. गोविंद महाराजांचा चरित्रग्रंथ 65 अध्यायात रचला आहे. हा ग्रंथ अभंग आणि ओवी शैलीत आहे. सुमारे नऊ हजार ओव्यात या ग्रंथाची रचना झाली आहे. अतिशय प्रासादिक शैलीतला हा ग्रंथ चरित्र वा्मय ग्रंथ परंपरेतील एक महत्त्वाचे वळण आहे. महाराजांच्या हिंदी अभंगाची संख्या तीसहून अधिक आहे. महाराजांचे अहिराणीतून अभंग लेखन आढळते.श्री गोविंद महाराजांच्या चरित्र ग्रंथातून समकालिनांचे उल्लेख आढळतात. ही यादी वाचल्यावर हे ध्यानात येते की, अजून अध्ययनाच्या किती अज्ञात वाटांचा शोध घेणे बाकी आहे. या यादीतील संतांची नावे समजून घेणे आवश्यक आहे. या यादीत एरंडोलचे रावसाहेब, यावल येथील गंगाराम बुवा, शेंदुर्णीचे गणोबा, कापूसवाडीचे महाळोजी बाबा, निंबाळकरांचे सद्गुरू योगाभ्यासी संत निर्भिक योगी अण्णासाहेब, चाळीसगावचे नथुबुवा, गरबडनाथ, तापीनाथ, तापीनाथ सूत हिरानाथ, जळगाव जामोदचे देवराज बुवा, येवला येथील जोतीबुवा, व:हाडातले तुकाराम बुवा, तापी तटावरील नाथ सांप्रदायिक वैराग्य संपन्न चंडीनाथ बुवा, नाशिकचे दाजी दीक्षित ही मंडळी गोविंद महाराजांच्या दर्शनार्थ येत असल्याचा उल्लेख येतो. श्री तोताराम महाराज यांच्या ज्ञानशाखा आजही पाळधी, जामनेर, पिंपळगाव हरेश्वर आणि प्रकाशा येथे कार्यरत आहेत. - प्रा.डॉ. विश्वास पाटील