शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
2
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
3
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
4
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
5
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
6
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
7
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
8
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
9
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
10
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
11
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
12
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
13
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
14
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
15
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
16
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
17
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...
18
ITR ची डेडलाईन ४५ दिवसांनी का वाढवली? १२ लाखांपर्यंतचा 'नो टॅक्स' आता नाही, पुढच्या वर्षी
19
“विद्यार्थी स्कूल व्हॅनला शासन मंजुरी, सुरक्षित वाहतुकीसह बेरोजगारांना रोजगार संधी”: सरनाईक
20
आयकर कायद्याचा चेहरामोहरा बदलणार? अर्थमंत्र्यांनी सादर केले नवे विधेयक, 'हे' मोठे बदल तुमच्यासाठी महत्त्वाचे!

सासरच्यांनी ‘इगो’ दुखविला अन‌् उच्चशिक्षित तरुणीने सोडले घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:10 IST

जळगाव : प्रेम प्रकरण सुरु असताना प्रियकर प्रत्येक गोष्ट ऐकायचा..लाड करायचा, प्रेमविवाहानंतर मात्र प्रियकर पतीच्या भूमिकेत आला. वागणुकीत बदल ...

जळगाव : प्रेम प्रकरण सुरु असताना प्रियकर प्रत्येक गोष्ट ऐकायचा..लाड करायचा, प्रेमविवाहानंतर मात्र प्रियकर पतीच्या भूमिकेत आला. वागणुकीत बदल झाला. त्यात सासु सासऱ्यांकडून सतत टोचून बोलणे यामुळे ‘इगो’ दुखावलेल्या या तरुणीने सहा महिन्याच्या बाळाला घेऊन घर सोडले..ही माहिती मिळताच पती व सासरच्यांच्या डोक्यात नको ते विचार घोंगावू लागले..शोध घेऊनही तरुणी सापडत नसल्याचे पोलिसांकडे धाव घेतली. तरुणी एमबीए झालेली तर तिचा पतीही सिव्हील इंजिनियर..घटनेचे गांभीर्य ओळखून यंत्रणाही कामाला लागली अन‌् दोनच दिवसात तरुणीला शोधून काढले.

या अजबगजब प्रेमविवाह झालेल्या तरुण-तरुणीच्या संसारात ‘इगो’ आडवा आला अन‌् तेथून वादाची सुरुवात झाली.

रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्याला असलेल्या मुकेश व रेखा (दोघांची काल्पनिक नावे आहेत) या दोघांचे प्रेमप्रकरण सुरु होते. त्यातून दोघांनी प्रेमविवाह करुन नव्या आयुष्याला सुरुवात केली. या संसाराच्या वेलीवर ‘खुशी’ (मुलीचे काल्पनिक नाव) जन्माला आली. सुरुवातीच्या काळात संसार सुरळीत चालला. नंतर सासु-सासरे यांच्या वागणुकीत बदल झाला. त्यांच्याकडून सतत टोमणे मारण्याचे प्रकार सुरु झाले, हे होत असताना पती हा काहीच बोलत नव्हता. पती हा पूर्वीसारखा राहिला नाही, त्याच्याही वागणुकीत बदल झाला. एकीकडे आई, दुसरीकडे बायको या द्विधा मनस्थिती सापडल्याने पतीची कोंडी झाली.

आई वडिलांच्या संस्कारावर बोलले अन‌् तेथे ‘इगो’ दुखला

घरातील वागणुकीबाबत सासु-सासरे यांच्याकडून सतत टोमणे सुरु असतानाच तुझ्या प्रसुतीचा इतका खर्च केला तरीदेखील तुझं वागणं असच आहे, तुझ्या आई, वडिलांनी संस्कार दिलेले दिसत नाही असा शब्द सासूबाईंनी उच्चारला अन‌् तेथेच रेखाचा ‘इगो’ दुखावला त्याच्या दुसऱ्याच क्षणाला १६ फेब्रुवारी रोजी रेखाने घर सोडले. कुठे तरी बाहेर गेली असेल समजून सासु-सासऱ्यांनी तिचा शोध घेतला ना पतीने..रात्र झाली, दिवस उजाळला तरी रेखा घरी आली नाही व मोबाईलही लागत नसल्याने घरात चिंतेने सर्वांनाच ग्रासले. काय झाले असेल, तिने काही बरे वाईट केले असेल का असे एक ना अनेक विचारांचे घर मनात निर्माण झाले. तीन दिवस शोध घेऊनही तपास न लागल्याने शेवटी सासु,सासरे व पतीने रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठून निरीक्षक अनिल बडगुजर यांची भेट घेवून संपूर्ण घटनाक्रम कथन केला. १९ रोजी रेखा हरविल्याची नोंद करण्यात आली.