शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

सीसीआयचे खरेदी केंद्र सुरु होवूनही शेतकऱ्यांच्या नशिबी निराशाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 13:05 IST

८ टक्क्यांंपेक्षा कमी आर्द्रता असल्यासच हमीभाव : जिनर्सने थांबवली खरेदी

जळगाव : कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा अडचणी संपता संपत नाहीय, आधी अवकाळी पावसामुळे कापसाचे प्रचंड नुकसान झाल्यानंतर आता बाजारात हमीभाव देखील मिळत नसल्याने शेतकºयांची नशिबी निराशाच हाती आली आहे. सीसीआयचे खरेदी केंद्र सुरु झाल्याने शेतकºयांना हमीभाव मिळेल अशी अपेक्षा असताना , या केंद्रावर शेतकºयांना मोठ्या प्रमाणात निकष पाडावे लागत आहेत. त्यामुळे शेतकºयांना हमीभाव केवळ कागदावरच मिळत आहे.यंदा अवकाळी पावसामुळे कापूस उत्पादक शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच आता खरेदी केंद्र सुरु झाल्यानंतर कापसाला हमी भाव मिळत नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी मेळकुटीस आले आहेत. आधीच सीसीआय ने खरेदी केंद्र उशीराने सुरु केल्यामुळे शेतकºयांना आपला माल खासगी व्यापाºयांना हमीभावापेक्षा तब्बल एक ते दीड हजार रुपये कमी दराने विक्री करावा लागला. आता सीसीआयने खरेदी सुरु केली असली तरी तीन प्रकारच्या निकषांना शेतकºयांना सामोरे जावे लागत आहे. ज्या शेतकºयांचा कापसात ८ टक्क्यांपेक्षा कमी आर्द्रता आहे. अशा शेतकºयांनाच हमीभावाप्रमाणे ५ हजार ५०० रुपये इतका भाव मिळत आहे. ८ ते १२ टक्क्यांदरम्यान आर्द्रता असलेल्या कापसाला ५ हजार ३५० इतका भाव दिला जात आहे. तर १२ टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता असलेला कापूस सीसीआयकडून खरेदी केला जात नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे.शेतकºयांना विश्वासात घेतले जात नाहीकापसाचे निकष ठरविताना शेतकºयांना पुर्णपणे विश्वासात घेतले जात नसल्याची खंत शेतकºयांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली आहे. सीसीआयचे अधिकारी मनाप्रमाणे आर्द्रतेचे प्रमाण निश्चित करत असून, यामुळे शेतकºयांचे प्रचंड नुकसान होत आहे. १२ टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता असलेला कापूस सीसीआय खरेदी करत नाहीय, त्यामुळे ४५०० रुपये प्रतीक्विंटल दराने शेतकºयांना खासगी व्यापाºयांना कापूस विक्री करावा लागत आहे.आतापर्यंत दोन लाख गाठींची खरेदीअवकाळी पावसामुळे कापसाचे उत्पादन उशीराने होत आहे. डिसेंबर महिन्यात नेहमी संपुर्ण खान्देशात ३ ते ४ लाख गाठींची खरेदी होवून जाते. यंदा मात्र कापूस वेचणी उशीराने झाल्यामुळे ४ डिसेंबरपर्यंत संपुर्ण खान्देशात दीड लाख गाठींची खरेदी झाली असल्याची माहिती खान्देश जिनीग असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. यंदा खान्देशात कापसाची लागवड चांगली झाल्यामुळे उत्पादनात वाढ होईल अशी अपेक्षा होती. मात्र, अवकाळीमुळे उत्पादनात एक ते दीड लाख गाठींची घट होण्याची शक्यता आहे.९० टक्के जिनर्सने खरेदी थांबवलीसीसीआयकडून चांगला भाव मिळत असल्याने शेतकºयांचा भर सीसीआयच्याच केंद्रावरच आहे. ज्यांचा माल सीसीआय खरेदी करत नाही असेच शेतकरी खासगी व्यापाºयांकडे जात आहे.खासगी व्यापाºयांना देखील ५ हजार रुपयांमध्ये माल खरेदी करणे परवडत नसल्याने खासगी जिनर्सने खरेदी थांबवली आहे. निर्यात देखील थांबली असल्यामुळे स्पीनींग उद्योगात देखील मंदी आहे. त्यामुळे खासगी व्यापाºयांकडून कापूस खरेदी थांबविण्यात आल्याची माहिती जिनर्स हर्षल नारखेडे यांनी दिली.जिनर्स, सीसीआयचेही साटेलोटेसीसीआयने १२ टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता असलेला कापूस खरेदी करणे जवळपास बंद केले आहे. काही केंद्रावरच हा कापूस खरेदी केला जात आहे. ज्या ठिकाणी जास्त आर्द्रता असलेला कापूस सीसीआयच्या केंद्रावर खरेदी केला जात नाही, अशा ठिकाणी शेतकºयांना नाईलाजास्तव ४३०० ते ४५०० रुपये क्विंटल दराने खासगी व्यापारी किंवा जिनर्सला माल विक्री करावा लागत आहे. मात्र, जिनर्स व व्यापाºयांनी काही ठिकाणी सीसीआयशी लागेबांधे करत शेतकºयांकडून कमी भावात घेतलेला माल ५ हजार रुपये क्विंटल दराने सीसीआयला विक्री केला जात असल्याचे काही शेतकºयांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे अवकाळी पावसामुळे आधीच अडचणीत असलेला शेतकरी शासन व व्यापाºयांची मिलीभगत व नियमांमुळे त्रस्त झाला आहे.शेतकºयांना दरवर्षी शासन हमीभाव निश्चित करते. प्रत्यक्षात मात्र शेतकºयांना हमीभाव मिळतच नाही. अनेक अटी व शर्ती लावल्यामुळे सीसीआय हमीभावात माल खरेदी करत नाही. यंदा पाऊस जास्त असल्याने कापसात १० टक्के ओलावा तर राहणारच आहे. मात्र, सीसीआय किंवा शासनाकडून शेतकºयांना कोणतीही सवलत दिली जात नाही.-भास्कर खंडू पाटील, आडगाव, ता.चोपडाकापूस उत्पादक शेतकºयांना आधीच अवकाळी पावसाने अडचणीत आणले आहे. शासनाकडून अद्यापपर्यंत कोणतीही मदत मिळालेली नाही. त्यातच कापसाला हमीभावाएवढी रक्कम देखील मिळत नसल्याने शेतकºयांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खरीप हंगाम देखील वाया गेल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.-दिलीप पंढरीनाथ चौधरी, आव्हाणे, ता.जळगाव

टॅग्स :Jalgaonजळगाव