शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

पांढऱ्या सोन्याचे भाव घसरल्याने शेतकरी चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 01:20 IST

यंदा उत्पादन कमी झाल्याने कापसाला चांगला भाव मिळेल, अशी शेतकºयांना अपेक्षा होती. मात्र बाजारपेठत कापसाचा भाग कमी होत असल्याने ग्रामीण भागातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

ठळक मुद्देघोर निराशा, बाजा भाव मिळत नसल्याने शेती व्यवसाय झाला जुगारउत्तराच्या पावसाने हजेरी लावलीच नाहीएकरी दोन क्विंटलचाही उतारा नाहीचेकने दिल्यास वेगळा भाव, नगदीचा वेगळा भाव या करारावर चालतोय व्यवहार

हरताळे, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव : यंदा उत्पादन कमी झाल्याने कापसाला चांगला भाव मिळेल, अशी शेतकºयांना अपेक्षा होती. मात्र बाजारपेठत कापसाचा भाग कमी होत असल्याने ग्रामीण भागातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.यावर्षी खरीप हंगामात मागील वर्षीचा बोध घेत पुन्हा शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात कापूस लागवड केली. प्रारंभी पावसाने चांगली सुरवात केली. मात्र शेवटी उत्तराच्या पावसाने हजेरी लावलीच नाही त्याचा फटका कापूस उत्पादक शेतकºयाला बसला. एकरी दोन क्विंटलचाही उतारा आला नाही. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी शेतकºयाच्या आशेवर पूर्ण पाणी फिरले. कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली. रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमतीमुळे तसेच अस्मानी संकट आणि बोंडअळी व लाल्याच्या हल्ल्यामुळे कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले. अंतर्गत मशागतीसह आणि कापूस वेचणीच्या वाढत्या मजुरीमुळे शेतकरी आजच्या भावात कापूस विकण्याच्या मन:स्थितीत नाही.चार-पाच क्विंटलवाल्यांनी मिळेल त्या भावात दिवाळीत गरजेपोटी विकून टाकला. तेव्हाच काहींचा हंगाम संपल्यात जमा झाले, केवळ आता शेतात कापसाच्या काळ्या उभे असल्याचे चित्र आहे. त्यातच नोटा बंदीचा फटक्यात सावरा सावर करावी लागली होती. तीच स्थिती यंदाही कापसाला भाव मिळत नसल्याची आठवण शेतकºयांना झाली आहे. कमी लागवड असतानादेखील पाहिजे तेवढा भाव मिळत नाही. शेतकरी द्विधा मनस्थितीत सापडले आहेत.काहींनी आगामी काळात भाव वाढल्यानंतर कापूस विक्री करण्यावर ठाम असले तरी कमी प्रमाणात कापूस झालेले शेतकरीच तो विकून मोकळे झाले. शासनाच्या हमी भावाचीही वाट पाहिली नाही.आता तर पूर्ण दीड महिन्यापासून भावात घसरण झाली आहे. सुरूवातीला सहा ते सात हजार प्रयत्न भाव होता. नंतर ५६०० जवळपास स्थिरावले. त्यातही चेकने दिल्यास वेगळा भाव, नगदीचा वेगळा भाव या करारावर व्यवहार चालत आहे आणि आता तर ५१००, ५२०० चे वर चढायला तयारच नसल्याने घरातच कापूस पडून आहे. सुरूवातीच्या तुलनेत भाव घसरले आहते. कापूस उत्पादक शेतकºयांना चिंता लागली आहे. त्यामुळे कापूस उत्पादक आर्थिक कोंडीत सापडले आहेत.सध्या भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. यातून शेतकºयांना सावरण्यासाठी शासनाने तत्काळ मदत केली तरच शेतकरी संकटातून बाहेर पडून सावरेल, अशी भावना व्यक्त होत आहे.

टॅग्स :cottonकापूसMuktainagarमुक्ताईनगर