शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

पांढऱ्या सोन्याचे भाव घसरल्याने शेतकरी चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 01:20 IST

यंदा उत्पादन कमी झाल्याने कापसाला चांगला भाव मिळेल, अशी शेतकºयांना अपेक्षा होती. मात्र बाजारपेठत कापसाचा भाग कमी होत असल्याने ग्रामीण भागातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

ठळक मुद्देघोर निराशा, बाजा भाव मिळत नसल्याने शेती व्यवसाय झाला जुगारउत्तराच्या पावसाने हजेरी लावलीच नाहीएकरी दोन क्विंटलचाही उतारा नाहीचेकने दिल्यास वेगळा भाव, नगदीचा वेगळा भाव या करारावर चालतोय व्यवहार

हरताळे, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव : यंदा उत्पादन कमी झाल्याने कापसाला चांगला भाव मिळेल, अशी शेतकºयांना अपेक्षा होती. मात्र बाजारपेठत कापसाचा भाग कमी होत असल्याने ग्रामीण भागातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.यावर्षी खरीप हंगामात मागील वर्षीचा बोध घेत पुन्हा शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात कापूस लागवड केली. प्रारंभी पावसाने चांगली सुरवात केली. मात्र शेवटी उत्तराच्या पावसाने हजेरी लावलीच नाही त्याचा फटका कापूस उत्पादक शेतकºयाला बसला. एकरी दोन क्विंटलचाही उतारा आला नाही. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी शेतकºयाच्या आशेवर पूर्ण पाणी फिरले. कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली. रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमतीमुळे तसेच अस्मानी संकट आणि बोंडअळी व लाल्याच्या हल्ल्यामुळे कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले. अंतर्गत मशागतीसह आणि कापूस वेचणीच्या वाढत्या मजुरीमुळे शेतकरी आजच्या भावात कापूस विकण्याच्या मन:स्थितीत नाही.चार-पाच क्विंटलवाल्यांनी मिळेल त्या भावात दिवाळीत गरजेपोटी विकून टाकला. तेव्हाच काहींचा हंगाम संपल्यात जमा झाले, केवळ आता शेतात कापसाच्या काळ्या उभे असल्याचे चित्र आहे. त्यातच नोटा बंदीचा फटक्यात सावरा सावर करावी लागली होती. तीच स्थिती यंदाही कापसाला भाव मिळत नसल्याची आठवण शेतकºयांना झाली आहे. कमी लागवड असतानादेखील पाहिजे तेवढा भाव मिळत नाही. शेतकरी द्विधा मनस्थितीत सापडले आहेत.काहींनी आगामी काळात भाव वाढल्यानंतर कापूस विक्री करण्यावर ठाम असले तरी कमी प्रमाणात कापूस झालेले शेतकरीच तो विकून मोकळे झाले. शासनाच्या हमी भावाचीही वाट पाहिली नाही.आता तर पूर्ण दीड महिन्यापासून भावात घसरण झाली आहे. सुरूवातीला सहा ते सात हजार प्रयत्न भाव होता. नंतर ५६०० जवळपास स्थिरावले. त्यातही चेकने दिल्यास वेगळा भाव, नगदीचा वेगळा भाव या करारावर व्यवहार चालत आहे आणि आता तर ५१००, ५२०० चे वर चढायला तयारच नसल्याने घरातच कापूस पडून आहे. सुरूवातीच्या तुलनेत भाव घसरले आहते. कापूस उत्पादक शेतकºयांना चिंता लागली आहे. त्यामुळे कापूस उत्पादक आर्थिक कोंडीत सापडले आहेत.सध्या भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. यातून शेतकºयांना सावरण्यासाठी शासनाने तत्काळ मदत केली तरच शेतकरी संकटातून बाहेर पडून सावरेल, अशी भावना व्यक्त होत आहे.

टॅग्स :cottonकापूसMuktainagarमुक्ताईनगर