शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

शेतकऱ्यांना कापूस बियाणे १ जूननंतरच मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:11 IST

गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाचा निर्णय : हंगामपूर्व कापसाची लागवड रोखण्यावर भर लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव ...

गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाचा निर्णय : हंगामपूर्व कापसाची लागवड रोखण्यावर भर

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - जिल्ह्यात आता शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी मशागतीला सुरुवात केली आहे. हवामान खात्याने या वर्षीही जिल्ह्यात चांगला पाऊस राहणार असल्याचा अंदाज वर्तवला असल्याने शेतकरी राजा खुश असून, शेतकऱ्यांनी खरिपासाठी तयारी सुरू केली आहे. मात्र, कापूस लागवडीसाठी शेतकऱ्यांना १ जूननंतरच कापूस बियाणे पुरवठा करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. हंगामपूर्व कापसाची लागवड झाल्यास, बोंडअळीचा प्रादुर्भाव होत असतो. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हंगामपूर्व कापसाची लागवड होणार नाही यासाठी कृषी विभागाने हा निर्णय घेतला असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.

गेल्यावर्षी शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव जिल्ह्यात अत्यल्प प्रमाणात आढळून आला होता. या वर्षाचा खरीप हंगामात शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून क्षेत्रीय पातळीवर आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना कृषी विभागाने सुरू केल्या आहेत. कापूस शास्त्रज्ञांच्या मतानुसार शेंदरी बोंडअळीचा जीवनक्रम खंडित न झाल्याने प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. शेंदरी बोंड अळीचा जीवनक्रम हंगामपूर्व कापूस लागवड झाल्यामुळे खंडित न झाल्याने पुनरुत्पत्तीसाठी पोषक वातावरण निर्माण होऊन हा प्रादुर्भाव वाढू शकतो. यामुळे यंदाच्या खरीप हंगामामध्ये शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांकडून हंगामपूर्व कापसाची लागवड होणार नाही, यादृष्टीने कृषी विभागाने उपाययोजना सुरू केल्या आहेत.

बियाणे उपलब्ध झाले नाही तर लागवड होणार कमी

जिल्ह्यात पंधरा ते वीस हजार हेक्टरवर हंगामपूर्व कापसाची लागवड ही होत असते. हंगामपूर्व कापसाची लागवड होऊ नये म्हणून बाजारपेठ एक कापूस लागवडीसाठी बियाणे पुरवठा १ जूननंतरच करण्याबाबत कृषी विभागाने निर्णय घेतला आहे. याबाबत जिल्हा कृषी अधीक्षक यांनी काढलेल्या आदेशानुसार बियाणे कंपनी, वितरक व किरकोळ विक्रेत्यांनी कृषी विभागाने निश्चित केलेल्या कालमर्यादेच्या आधीच बियाणे विक्री केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश कृषी विभागाकडून जाहीर करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध केले नाही तर हंगामपूर्व कापसाची लागवड होणे टाळू शकतो, यासाठी कृषी विभागाने याबाबतचा निर्णय घेतला आहे.

कापूस बियाणे पुरवठा करण्याबाबतचे आदेश

उत्पादक कंपनी ते वितरक - १० मेपासून पुढे

वितरक एक किरकोळ विक्रेता - १५ मेपासून पुढे

किरकोळ विक्रेता ते शेतकरी - १ जूनपासून पुढे

सोयाबीन बियाणांचे भाव वाढण्याची शक्यता

गेल्या वर्षी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सोयाबीनचे क्षेत्र पूर्णपणे वाया गेले होते. अशा परिस्थितीत बाजारात सोयाबीन बियाण्याची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. खरीप हंगामासाठी जिल्ह्यात सोयाबीनची देखील मोठ्या प्रमाणात लागवड होत असते. मात्र, यंदा सोयाबीन बियाणांच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवड करता घरचे सोयाबीन बियाणे राखून ठेवावे, असे आवाहन पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांना केले आहे. तसेच गेल्या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केल्यानंतर सोयाबीन हे शेतात उगवलेच नव्हते यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. हा अनुभव लक्षात घेता शेतकऱ्यांनी घरचे बियाणे वापरले तर शेतकऱ्यांना काहीअंशी फायदा होऊ शकतो, असाही दावा कृषी विभागाकडून करण्यात आला आहे.