शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनाही ज्वारी विकत घेवून खावी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:19 IST

(डमी १०३५) लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ज्वारीचे पीक पुर्णपणे वाया गेले होते. त्यामुळे यावर्षी ...

(डमी १०३५)

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ज्वारीचे पीक पुर्णपणे वाया गेले होते. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी ज्वारीकडे पाठ फिरवली असून, जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीमध्ये तब्बल २० हजार हेक्टरची घट झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामात ज्वारीची पेरणी होत असते, मात्र यावर्षी केवळ २५ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना देखील ज्वारी विकत घेवून खावी लागणार असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

गेल्या काही वर्षात बाजारात ज्वारीची मागणी वाढल्याने जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या एकूण लागवड क्षेत्रात वाढ झाली होती. मात्र, यंदाच्या खरीप हंगामात ज्वारीच्या लागवड क्षेत्रात घट झाली आहे. जून महिन्यात पाऊस वेळेवर न झाल्याने पहिल्यांदा केलेली पेरणी वाया गेली होती. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी दुबार पेरणीच्या वेळेस उडीद, मूग, बाजरीला प्राधान्य दिले आहे.

असा घटला ज्वारीचा पेरा

२०१७ - ४१ हजार हेक्टर

२०१८ - ३९ हजार हेक्टर

२०१९ - ३७ हजार हेक्टर

२०२० - ३४ हजार हेक्टर

२०२१ - २५ हजार हेक्टर

यंदा कोणत्या पीकाचा किती पेरा

ज्वारी - २४ हजार ६२०

सोयाबीन - १७ हजार २२२

उडीद - २२ हजार २००

मूग - २३ हजार ९०३

बाजरी - ६ हजार ५४५

शेतकऱ्यांना हवे पैशांचे पीक

खरीप हंगाम पुर्णपणे पावसावर अवलंबून असतो, त्यात ज्वारीसारखे पीक हे कमी किंवा जास्त पावसात खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे ज्वारी पेक्षा उडीद, मूग व सोयाबीन हे पीके फायद्याची ठरतात. त्यात उडीद व मूगाला बाजारात चांगला भाव असून, तीन महिन्यात हे पीक येते.

-जनार्दन चौधरी, शेतकरी

ज्वारीला चांगला भावदेखील भेटत नाही, त्यात ऐन काढणीच्या वेळेस पाऊस झाला तर ज्वारी काळी पडते. त्यामुळे ज्वारीला भाव मिळणे कठीण होवून जाते. त्या तुलनेत उडीद व मूग थोडे खराब झाले तरी भाव मात्र शेतकऱ्यांना परवडणाराच असतो.

- विजय पाटील, शेतकरी

का फिरवली शेतकऱ्यांनी ज्वारीकडे पाठ ?

जिल्ह्यात खरीप हंगामात ज्वारीची लागवड फारशी होत नाही. त्यात जिल्ह्यात पावसाळ्यानंतर चाऱ्याचीही चणचण भासत नाही. त्यात पावसामुळे ज्वारी खराब होण्याचीही शक्यता अधिक असते. त्यामुळे खरीप पेक्षा रब्बी हंगामात ज्वारीची लागवड अधिक होते.

-दीपक जाधव, शेतकरी