शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

शेतकऱ्यांनाही ज्वारी विकत घेवून खावी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:19 IST

(डमी १०३५) लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ज्वारीचे पीक पुर्णपणे वाया गेले होते. त्यामुळे यावर्षी ...

(डमी १०३५)

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ज्वारीचे पीक पुर्णपणे वाया गेले होते. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी ज्वारीकडे पाठ फिरवली असून, जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीमध्ये तब्बल २० हजार हेक्टरची घट झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामात ज्वारीची पेरणी होत असते, मात्र यावर्षी केवळ २५ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना देखील ज्वारी विकत घेवून खावी लागणार असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

गेल्या काही वर्षात बाजारात ज्वारीची मागणी वाढल्याने जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या एकूण लागवड क्षेत्रात वाढ झाली होती. मात्र, यंदाच्या खरीप हंगामात ज्वारीच्या लागवड क्षेत्रात घट झाली आहे. जून महिन्यात पाऊस वेळेवर न झाल्याने पहिल्यांदा केलेली पेरणी वाया गेली होती. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी दुबार पेरणीच्या वेळेस उडीद, मूग, बाजरीला प्राधान्य दिले आहे.

असा घटला ज्वारीचा पेरा

२०१७ - ४१ हजार हेक्टर

२०१८ - ३९ हजार हेक्टर

२०१९ - ३७ हजार हेक्टर

२०२० - ३४ हजार हेक्टर

२०२१ - २५ हजार हेक्टर

यंदा कोणत्या पीकाचा किती पेरा

ज्वारी - २४ हजार ६२०

सोयाबीन - १७ हजार २२२

उडीद - २२ हजार २००

मूग - २३ हजार ९०३

बाजरी - ६ हजार ५४५

शेतकऱ्यांना हवे पैशांचे पीक

खरीप हंगाम पुर्णपणे पावसावर अवलंबून असतो, त्यात ज्वारीसारखे पीक हे कमी किंवा जास्त पावसात खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे ज्वारी पेक्षा उडीद, मूग व सोयाबीन हे पीके फायद्याची ठरतात. त्यात उडीद व मूगाला बाजारात चांगला भाव असून, तीन महिन्यात हे पीक येते.

-जनार्दन चौधरी, शेतकरी

ज्वारीला चांगला भावदेखील भेटत नाही, त्यात ऐन काढणीच्या वेळेस पाऊस झाला तर ज्वारी काळी पडते. त्यामुळे ज्वारीला भाव मिळणे कठीण होवून जाते. त्या तुलनेत उडीद व मूग थोडे खराब झाले तरी भाव मात्र शेतकऱ्यांना परवडणाराच असतो.

- विजय पाटील, शेतकरी

का फिरवली शेतकऱ्यांनी ज्वारीकडे पाठ ?

जिल्ह्यात खरीप हंगामात ज्वारीची लागवड फारशी होत नाही. त्यात जिल्ह्यात पावसाळ्यानंतर चाऱ्याचीही चणचण भासत नाही. त्यात पावसामुळे ज्वारी खराब होण्याचीही शक्यता अधिक असते. त्यामुळे खरीप पेक्षा रब्बी हंगामात ज्वारीची लागवड अधिक होते.

-दीपक जाधव, शेतकरी