शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

शेतकऱ्यांनाही ज्वारी विकत घेवून खावी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:19 IST

(डमी १०३५) लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ज्वारीचे पीक पुर्णपणे वाया गेले होते. त्यामुळे यावर्षी ...

(डमी १०३५)

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ज्वारीचे पीक पुर्णपणे वाया गेले होते. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी ज्वारीकडे पाठ फिरवली असून, जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीमध्ये तब्बल २० हजार हेक्टरची घट झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामात ज्वारीची पेरणी होत असते, मात्र यावर्षी केवळ २५ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना देखील ज्वारी विकत घेवून खावी लागणार असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

गेल्या काही वर्षात बाजारात ज्वारीची मागणी वाढल्याने जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या एकूण लागवड क्षेत्रात वाढ झाली होती. मात्र, यंदाच्या खरीप हंगामात ज्वारीच्या लागवड क्षेत्रात घट झाली आहे. जून महिन्यात पाऊस वेळेवर न झाल्याने पहिल्यांदा केलेली पेरणी वाया गेली होती. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी दुबार पेरणीच्या वेळेस उडीद, मूग, बाजरीला प्राधान्य दिले आहे.

असा घटला ज्वारीचा पेरा

२०१७ - ४१ हजार हेक्टर

२०१८ - ३९ हजार हेक्टर

२०१९ - ३७ हजार हेक्टर

२०२० - ३४ हजार हेक्टर

२०२१ - २५ हजार हेक्टर

यंदा कोणत्या पीकाचा किती पेरा

ज्वारी - २४ हजार ६२०

सोयाबीन - १७ हजार २२२

उडीद - २२ हजार २००

मूग - २३ हजार ९०३

बाजरी - ६ हजार ५४५

शेतकऱ्यांना हवे पैशांचे पीक

खरीप हंगाम पुर्णपणे पावसावर अवलंबून असतो, त्यात ज्वारीसारखे पीक हे कमी किंवा जास्त पावसात खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे ज्वारी पेक्षा उडीद, मूग व सोयाबीन हे पीके फायद्याची ठरतात. त्यात उडीद व मूगाला बाजारात चांगला भाव असून, तीन महिन्यात हे पीक येते.

-जनार्दन चौधरी, शेतकरी

ज्वारीला चांगला भावदेखील भेटत नाही, त्यात ऐन काढणीच्या वेळेस पाऊस झाला तर ज्वारी काळी पडते. त्यामुळे ज्वारीला भाव मिळणे कठीण होवून जाते. त्या तुलनेत उडीद व मूग थोडे खराब झाले तरी भाव मात्र शेतकऱ्यांना परवडणाराच असतो.

- विजय पाटील, शेतकरी

का फिरवली शेतकऱ्यांनी ज्वारीकडे पाठ ?

जिल्ह्यात खरीप हंगामात ज्वारीची लागवड फारशी होत नाही. त्यात जिल्ह्यात पावसाळ्यानंतर चाऱ्याचीही चणचण भासत नाही. त्यात पावसामुळे ज्वारी खराब होण्याचीही शक्यता अधिक असते. त्यामुळे खरीप पेक्षा रब्बी हंगामात ज्वारीची लागवड अधिक होते.

-दीपक जाधव, शेतकरी