शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

कापूस प्रश्नावर शेतकर्‍यांची एकजूट

By admin | Updated: December 1, 2014 14:32 IST

कापसाच्याभावाबाबत चिंतेत असलेल्या उत्पादक शेतकर्‍यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेत कापसावर बोला, असा आवाज घुमविला.

मुक्ताईनगर : कापसाच्याभावाबाबत चिंतेत असलेल्या उत्पादक शेतकर्‍यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेत कापसावर बोला, असा आवाज घुमविला. मुख्यमंत्री क्षणभर थांबले आणि होय त्यावरच बोलतो, असे उद्गार काढत कापसाच्या हमी भावावर बोनस देण्याचा विचार असल्याची भूमिका जाहीर केली.

खान्देशातील एखाद्या सभेत चक्क मुख्यमंत्र्यांना शेतमालाबाबतची भूमिका स्पष्ट करण्याचा कदाचित हा पहिलाच प्रसंग असावा. असे असले तरी पश्‍चिम महाराष्ट्राप्रमाणे खान्देशातील शेतकरीही शेतमालाच्या भावाबाबत एकवटू शकतात ही बाब प्रामुख्याने समोर आली. निमित्त होते येथील संत मुक्ताई शुगर अँण्ड एनर्जी साखर कारखान्याच्या प्रथम गळीत हंगामाचा शुभारंभ व १२मेगावॅट सहवीजनिर्मिती प्रकल्प भूमिपूजनाचे.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणामुळे महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी जिल्हा व खान्देशातील मागण्या मांडल्या व मुख्यमंत्र्यांनी सभेत याबाबत घोषणा करावी, जेणेकरून याची इतिहासात नोंद होईल, असे आवाहन केले. मुक्ताईनगर येथे शेतीशास्त्र व तंत्रनिकेतन महाविद्यालय, शहादा-नंदुरबार परिसरातील सिंचन प्रकल्प, चाळीसगाव-भुसावळ औद्योगिक वसाहत आणि उद्योगाबाबतच्या मागण्या पूर्णत्वास अनुकूलता दर्शवत अन्य मागण्यांवर मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेऊ, असे आश्‍वासन दिले. भाषणाच्या शेवटच्या टप्प्यात समोर असलेल्या शेतकर्‍यांच्या कापसाबाबतची भूमिका जाहीर व्हावी याबाबत संयमाचा बांध सुटला आणि भरसभेत कापसावर बोला, असा आवाज सभामंडपात घुमला.मुख्यमंत्र्यांनी चार सेकंद आपले भाषण थांबविले.होय..त्यावरच बोलतोय, अशी सुरुवात केली आणि कापसाच्या हमी भावावर बोनस देण्याचे जाहीर केले. 
घाईघाईत सत्कार.. 
■ आमदारांच्या सत्काराच्या वेळी तो लवकर व्हावा म्हणून धावपळ झाली.आमदार महाजन, अशोक कांडेलकर, उदय वाघ यांनी आमदारांचे पटापट सत्कार आटोपले.
■ आमदार उन्मेष पाटील या एकमेव आमदारास येथे भाषणाची संधी मिळाली. उन्मेष पाटील यांनी बेलगंगा, सिंचन प्रकल्प, औद्योगिक वसाहत-पाठोपाठ शेतकर्‍यांच्या मनातील कापसाच्या भावाबाबतच्या प्रश्नाला वाचा फोडली.