शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

कापूस प्रश्नावर शेतकर्‍यांची एकजूट

By admin | Updated: December 1, 2014 14:32 IST

कापसाच्याभावाबाबत चिंतेत असलेल्या उत्पादक शेतकर्‍यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेत कापसावर बोला, असा आवाज घुमविला.

मुक्ताईनगर : कापसाच्याभावाबाबत चिंतेत असलेल्या उत्पादक शेतकर्‍यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेत कापसावर बोला, असा आवाज घुमविला. मुख्यमंत्री क्षणभर थांबले आणि होय त्यावरच बोलतो, असे उद्गार काढत कापसाच्या हमी भावावर बोनस देण्याचा विचार असल्याची भूमिका जाहीर केली.

खान्देशातील एखाद्या सभेत चक्क मुख्यमंत्र्यांना शेतमालाबाबतची भूमिका स्पष्ट करण्याचा कदाचित हा पहिलाच प्रसंग असावा. असे असले तरी पश्‍चिम महाराष्ट्राप्रमाणे खान्देशातील शेतकरीही शेतमालाच्या भावाबाबत एकवटू शकतात ही बाब प्रामुख्याने समोर आली. निमित्त होते येथील संत मुक्ताई शुगर अँण्ड एनर्जी साखर कारखान्याच्या प्रथम गळीत हंगामाचा शुभारंभ व १२मेगावॅट सहवीजनिर्मिती प्रकल्प भूमिपूजनाचे.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणामुळे महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी जिल्हा व खान्देशातील मागण्या मांडल्या व मुख्यमंत्र्यांनी सभेत याबाबत घोषणा करावी, जेणेकरून याची इतिहासात नोंद होईल, असे आवाहन केले. मुक्ताईनगर येथे शेतीशास्त्र व तंत्रनिकेतन महाविद्यालय, शहादा-नंदुरबार परिसरातील सिंचन प्रकल्प, चाळीसगाव-भुसावळ औद्योगिक वसाहत आणि उद्योगाबाबतच्या मागण्या पूर्णत्वास अनुकूलता दर्शवत अन्य मागण्यांवर मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेऊ, असे आश्‍वासन दिले. भाषणाच्या शेवटच्या टप्प्यात समोर असलेल्या शेतकर्‍यांच्या कापसाबाबतची भूमिका जाहीर व्हावी याबाबत संयमाचा बांध सुटला आणि भरसभेत कापसावर बोला, असा आवाज सभामंडपात घुमला.मुख्यमंत्र्यांनी चार सेकंद आपले भाषण थांबविले.होय..त्यावरच बोलतोय, अशी सुरुवात केली आणि कापसाच्या हमी भावावर बोनस देण्याचे जाहीर केले. 
घाईघाईत सत्कार.. 
■ आमदारांच्या सत्काराच्या वेळी तो लवकर व्हावा म्हणून धावपळ झाली.आमदार महाजन, अशोक कांडेलकर, उदय वाघ यांनी आमदारांचे पटापट सत्कार आटोपले.
■ आमदार उन्मेष पाटील या एकमेव आमदारास येथे भाषणाची संधी मिळाली. उन्मेष पाटील यांनी बेलगंगा, सिंचन प्रकल्प, औद्योगिक वसाहत-पाठोपाठ शेतकर्‍यांच्या मनातील कापसाच्या भावाबाबतच्या प्रश्नाला वाचा फोडली.