चाकूर : गारपिटीत शेतातील पीक होत्याचे नव्हते झाले़ बँकेचे कर्ज फेडायचे कसे असा प्रश्न होता़ त्यामुळे निराश झालेल्या शेतकर्याने मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना चाकूर तालुक्यातील सावंतवाडी येथे घडली़ सावंतवाडी येथील शेतकरी बालाजी विश्वंभर सावंत (वय ४८) यांची दोन एकर शेती आहे़ चार वर्षापूर्वी त्यांनी कर्ज काढून द्राक्षबाग लावली मात्र त्यात यश आले नाही़ त्यामुळे त्यांनी पारंपरिक शेती करण्याचा निर्णय घेतला़ मागील महिन्यात गारपीटीत शेतातील उभे पिक उध्वस्त झाले़ त्याचे अनुदानही अद्याप मिळालेले नाही़ याच नैराश्यातून बालाजी सावंत यांनी मंगळवारी सकाळी शेतातील झाडास गळफास घेऊन आत्महत्त्या केली़
कर्जामुळे शेतकर्याची आत्महत्त्या
By admin | Updated: May 29, 2014 16:12 IST