शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

केळी बाग वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 15:44 IST

‘मे’ महिन्याला सुरुवात झाली असून, ग्रामीण भागामध्ये उन्हाचे चटके बसू लागले आहेत. पाºयाने पंचेचाळीशी गाठली आहे. उष्णता वाढल्याने शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. एकीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे, तर दुसरीकडे हातातोंडाशी आलेली केळी उन्हामुळे घड निसटण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागामध्ये उन्हाच्या पाºयाने गाठली पंचेचाळीशीपरिपक्क झालेल्या केळी बागायतीवर उन्हाचा परिणामहातातोंडाशी आलेली केळी उन्हापासून वाचविण्यासाठी शेतकºयाची धडपड

उटखेडा, ता.रावेर, जि.जळगाव : ‘मे’ महिन्याला सुरुवात झाली असून, ग्रामीण भागामध्ये उन्हाचे चटके बसू लागले आहेत. पाºयाने पंचेचाळीशी गाठली आहे. उष्णता वाढल्याने शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. एकीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे, तर दुसरीकडे हातातोंडाशी आलेली केळी उन्हामुळे घड निसटण्याची वेळ आली आहे. या प्रचंड तापमानामुळे केळी बागांना पाणीटंचाईसह नुकसानीचा मोठा फटका बसत आहे.केळी बागा वाचविण्यासाठी शेतकरी जीवाचे रान करीत प्रचंड धडपड करताना दिसत आहेत. केळीचे घड परिपक्व होण्यापूर्वीच निसटण्यामुळे शेतकरी नुकसानीने संकटात सापडूनही सामना करीत आहे. केळी बागांना उन्हापासून संरक्षण मिळावे यासाठी शेतकरी बागांना समोरून व बाजूला ग्रीनशेड नेटचा आडोशासाठी वापर करताना दिसत आहेत.केळी बागांना शेतकरी संरक्षणासाठी विविधरंगी आकर्षक साड्यांचा वापर करताना दिसत आहे . सध्या मे महिन्याला सुरुवात झाली असून, उन्हाचा तडाखा व लग्न सोहळयांचा धूमधडाका सहन करावा लागत असून पाणीटंचाईमुळे केळी बागा वाचविण्यासाठी शेतकरी मोठी धडपड करीत आहे. उटखेडा, भातखेडा, कुसुंबा, मुंजलवाडी, कुंभारखेडा या परिसरातील विहिरींची पाण्याची पातळी खालावल्याने शेतकरी हाजारो रुपये खर्च करून विहिरींत आडवे व उभे बोअर करुन केळी बागा वाचविण्यासाठी पाण्यासारखा पैसा ओततांना दिसत आहे.वीज समस्येशी शेतकºयांना सामना करावा लागत आहे. एक सप्ताह दिवसा व एक सप्ताह रात्र अशी वेळ असून दिवसाला आठ तास तर रात्रीला दहा तासच वीज शेतीसाठी मिळत आहे. मे महिन्यात तापमानाचा फटका केळी बागांना नुकसानीचा ठरत आहे. त्यात उष्ण वाºयाचा वेग त्यामुळे केळी बागांचे नुकसान होताना दिसत आहे. केळी बागाच्या संरक्षणासाठी व तापमानापासून वाचविण्यासाठी ग्रीनशेड नेट, गीनी ग्रास तसेच विविध रंगी साड्यांचा वापर केळी बागांच्या समोरच्या बाजूला लावून शेतकरी धडपड करताना दिसत आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईRaverरावेर