शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

तापमानवाढीमुळे केळी बागा संकटात, संरक्षणासाठी शेतकऱ्यांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 19:22 IST

चोपडा तालुक्यातील धानोरा, बिडगाव आणि परिसरात वाढत्या तापमानामुळे हिरव्यागार केळी बागा संकटात सापडल्या असून त्यांच्या संरक्षणासाठी शेतकºयांची प्रचंड धडपड सुरू आहे.

ठळक मुद्देकेळी बागांभोवती साड्यांचे कुंपण बांधून बचावाचा प्रयत्नउष्णतेच्या संकटात पाणी टंचाईची भर एप्रिलमधील स्थितीमुळे मे हिटचा आतापासूनच धसका

आॅनलाईन लोकमतबिडगाव ता. चोपडा, दि.२० : आग ओकणाºया सूर्यामुळे तापमानाने कहर केला असून चोपडा तालुक्यातील धानोरा, बिडगावसह परिसरातील केळी बागांवर उष्णतेचे संकट कोसळले आहे. त्यापासून संरक्षण करण्यासाठी शेतकºयांची धडपड सुरू आहे. उष्णतेच्या झळांपासून बचाव करण्यासाठी केळी बागांभोवती साड्या बांधण्यात आल्याचे दृष्य नजरेस पडत आहे.एप्रिल महिन्यातच तापमान प्रचंड वाढलेले आहे. ‘मे हीट ’ तर अजून बाकी आहे. दिवसागणिक वाढणाºया तापमानामुळे बिडगाव परिसरात केळी बागांना जबरदस्त फटका बसण्यास सुरुवात झालेली आहे. शेतकरी केळीला रात्रीचा दिवस करत पाणी देत असले तरी वाढत्या तापमानामुळे केळीची पाने करपून जळू लागली आहेत. यामुळे शेतकºयांपुढे नवीनच अस्मानी संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी चांगलेच संकटात सापडले आहेत.चोपडा, यावल, रावेर या तालुक्यांमध्ये केळीचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यात विशेषत: सातपुडा पट्ट्यातील भागात केळी चांगली पिकत असते. तिचे भरघोस उत्पादनही घेतले जाते. चोपडा तालुक्यात सद्यस्थितीत जुनारी पिलबाग व काढणीवर आलेल्या नवती बाग यांचे क्षेत्र जवळजवळ ५ हजार हेक्टरवर आहे. वाढत चाललेल्या तापमानामुळे शेतकºयांच्या संकटात नवीन भर पडली आहे. यात केळीच्या झाडांची पाने कोरडी पडणे, घड निसटून जाणे, पाने करपणे, घडांवर प्रखर सूर्यकिरण पडणे यामुळे घड खराब होऊन काळे पडत आहेत. परिणामी या केळी घडांना व्यापारी कवडीमोल भावातही घेत नाहीत. केळीबाबत नेहमीच शेतकरी हा चिंतेत सापडला आहे. वाढत्या उष्णतेसोबतच बुरशीजन्य रोगाचाही प्रादुर्भाव काही केळी बागांवर झालेला आढळतो. शेतकरी आधीच कमी भावात होणारी केळी खरेदी, तापमानात वाढ या दोन प्रमुख कारणांमुळे संकटात आहे. आता तापमानाने चाळीशी पार केलेली आहे. एप्रिल महिना संपायचा आहे. त्यात पुढे मे हिटचा तडाखा येणार असल्यामुळे केळी पिकाला वाचवण्यासाठी शेतकºयांची धडपड जोरात सुरु आहे. यात अजून भर म्हणजे खालावत चाललेली पाण्याची पातळी होय. यामुळेही शेतकरी अधिकच चिंतेत सापडलेला दिसतो.केळी वाचवण्यासाठी धडपडवाढत्या तापमानामुळे केळीला जबर फटका बसत चालला आहे. यामुळे शेतकरी केळी वाचवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी धडपड करतांना दिसत आहेत. यात बांधावर साडी किंवा कपडा लावणे, तुरखाटी, पºहाटी यांचे झापे आडोशे म्हणून बांधणे, घडांसाठी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर, हिरवे नेट लावणे, जेणेकरुन उन्हाचा तडाखा कमी प्रमाणात बसेल. काही शेतकरी घडांवर स्प्रे सुद्धा मारत आहेत. 

टॅग्स :Chopdaचोपडा