शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

तापमानवाढीमुळे केळी बागा संकटात, संरक्षणासाठी शेतकऱ्यांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 19:22 IST

चोपडा तालुक्यातील धानोरा, बिडगाव आणि परिसरात वाढत्या तापमानामुळे हिरव्यागार केळी बागा संकटात सापडल्या असून त्यांच्या संरक्षणासाठी शेतकºयांची प्रचंड धडपड सुरू आहे.

ठळक मुद्देकेळी बागांभोवती साड्यांचे कुंपण बांधून बचावाचा प्रयत्नउष्णतेच्या संकटात पाणी टंचाईची भर एप्रिलमधील स्थितीमुळे मे हिटचा आतापासूनच धसका

आॅनलाईन लोकमतबिडगाव ता. चोपडा, दि.२० : आग ओकणाºया सूर्यामुळे तापमानाने कहर केला असून चोपडा तालुक्यातील धानोरा, बिडगावसह परिसरातील केळी बागांवर उष्णतेचे संकट कोसळले आहे. त्यापासून संरक्षण करण्यासाठी शेतकºयांची धडपड सुरू आहे. उष्णतेच्या झळांपासून बचाव करण्यासाठी केळी बागांभोवती साड्या बांधण्यात आल्याचे दृष्य नजरेस पडत आहे.एप्रिल महिन्यातच तापमान प्रचंड वाढलेले आहे. ‘मे हीट ’ तर अजून बाकी आहे. दिवसागणिक वाढणाºया तापमानामुळे बिडगाव परिसरात केळी बागांना जबरदस्त फटका बसण्यास सुरुवात झालेली आहे. शेतकरी केळीला रात्रीचा दिवस करत पाणी देत असले तरी वाढत्या तापमानामुळे केळीची पाने करपून जळू लागली आहेत. यामुळे शेतकºयांपुढे नवीनच अस्मानी संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी चांगलेच संकटात सापडले आहेत.चोपडा, यावल, रावेर या तालुक्यांमध्ये केळीचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यात विशेषत: सातपुडा पट्ट्यातील भागात केळी चांगली पिकत असते. तिचे भरघोस उत्पादनही घेतले जाते. चोपडा तालुक्यात सद्यस्थितीत जुनारी पिलबाग व काढणीवर आलेल्या नवती बाग यांचे क्षेत्र जवळजवळ ५ हजार हेक्टरवर आहे. वाढत चाललेल्या तापमानामुळे शेतकºयांच्या संकटात नवीन भर पडली आहे. यात केळीच्या झाडांची पाने कोरडी पडणे, घड निसटून जाणे, पाने करपणे, घडांवर प्रखर सूर्यकिरण पडणे यामुळे घड खराब होऊन काळे पडत आहेत. परिणामी या केळी घडांना व्यापारी कवडीमोल भावातही घेत नाहीत. केळीबाबत नेहमीच शेतकरी हा चिंतेत सापडला आहे. वाढत्या उष्णतेसोबतच बुरशीजन्य रोगाचाही प्रादुर्भाव काही केळी बागांवर झालेला आढळतो. शेतकरी आधीच कमी भावात होणारी केळी खरेदी, तापमानात वाढ या दोन प्रमुख कारणांमुळे संकटात आहे. आता तापमानाने चाळीशी पार केलेली आहे. एप्रिल महिना संपायचा आहे. त्यात पुढे मे हिटचा तडाखा येणार असल्यामुळे केळी पिकाला वाचवण्यासाठी शेतकºयांची धडपड जोरात सुरु आहे. यात अजून भर म्हणजे खालावत चाललेली पाण्याची पातळी होय. यामुळेही शेतकरी अधिकच चिंतेत सापडलेला दिसतो.केळी वाचवण्यासाठी धडपडवाढत्या तापमानामुळे केळीला जबर फटका बसत चालला आहे. यामुळे शेतकरी केळी वाचवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी धडपड करतांना दिसत आहेत. यात बांधावर साडी किंवा कपडा लावणे, तुरखाटी, पºहाटी यांचे झापे आडोशे म्हणून बांधणे, घडांसाठी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर, हिरवे नेट लावणे, जेणेकरुन उन्हाचा तडाखा कमी प्रमाणात बसेल. काही शेतकरी घडांवर स्प्रे सुद्धा मारत आहेत. 

टॅग्स :Chopdaचोपडा