शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शेतक:यांच्या कृषि पंचाचे वीज बिल माफ न केल्यास जळगाव व धरणगावात शिंगाडा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 12:41 IST

गुलाबराव देवकर यांची माहिती : गिरणा धरणातून लवकर आवर्तन सोडण्याची मागणी

ठळक मुद्देआता घोडा मैदान जवळ15 नोव्हेंबरजरम्यान आवर्तन आवश्यक

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 4 - रब्बी हंगामासाठी व  पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी गिरणा धरणातून धरणगाव व जळगाव  तालुक्यासाठी पाण्याचे तीन आवर्तन आरक्षित करण्यात यावे तसेच शेतक:यांचे या वर्षाचे वीज माफ करण्यात यावे, अन्यथा 19 रोजी धरणगाव व 20 रोजी जळगाव येथे वीज कंपनीच्या कार्यालयावर शिंगाडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा  माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी पत्रपरिषदेत दिला.    शुक्रवारी संध्याकाळी मजूर फेडरेशनच्या कार्यालयात गुलाबराव देवकर यांची पत्रपरिषद झाली.  या वेळी त्यांनी ही मागणी केली. या प्रसंगी वाल्मीक पाटील, मंगला पाटील, रवींद्र पाटील, मधुकर पाटील, विलास पाटील उपस्थित होते. 

15 नोव्हेंबरजरम्यान आवर्तन आवश्यकजिल्हाधिकारी व गिरणा धरणाच्या अधिका:यांना निवेदन देऊन चर्चा केली असता 22 नोव्हेंबर दरम्यान पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाल्यानंतर या बाबत निर्णय होईल, असे सांगण्यात आले. मात्र तो र्पयत खूप उशीर होईल. त्यामुळे 15 नोव्हेंबर दरम्यान पहिले आवर्तन सोडण्यात यावे तसेच पालमंत्र्यांनी या बाबत तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. या सोबतच शेत मालाला वाढीव भाव मिळावा कापूस खेरदी केंद्रांवर पुरेसी यंत्रणा उपलब्ध करावी, अशीही मागणी त्यांनी केली. 

मतदार संघात मला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे वैफल्यग्रस्त झाले असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे, अशी टीका  माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी केली. आता घोडा मैदान जवळगुलाबराव पाटील यांनी जे बोलायचे आहे ते विकासावर बोलावे. मी काय केले आहे, हे जनतेला माहित आहे. माङयावर दोन वर्षे जे संकट आले, त्यामुळे त्यांना संधी मिळाली.  अन्यथा किमान पाच पंचवार्षिक तरी त्यांना संधी मिळाली नसती. असे असले तरी आता घोडा मैदान जवळच असून जनताच हिशेब करेल, असा विश्वास देवकर यांनी व्यक्त केला.  शिवसेना व त्यांचे मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करतात. या पेक्षा त्यांनीच आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे.  राजीनामा देतो, असे अनेकदा सांगून झाले असून नुसते सांगता काय सत्ता सोडून द्या, खिशातच राजीनामा घेऊन काय फिरता, तो एकदाचा देऊन टाका, अशीही मागणी देवकर यांनी केली.