शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
2
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
3
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
4
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
5
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
6
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
7
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
8
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
9
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
10
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
11
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
12
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
13
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
14
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
15
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
16
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
18
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
19
बेडग-कर्नाटक मार्गावर हत्याराचा धाक दाखवून सात लाख लूटले, गाडीची केली तोडफोड
20
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह

शेतक:यांच्या कृषि पंचाचे वीज बिल माफ न केल्यास जळगाव व धरणगावात शिंगाडा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 12:41 IST

गुलाबराव देवकर यांची माहिती : गिरणा धरणातून लवकर आवर्तन सोडण्याची मागणी

ठळक मुद्देआता घोडा मैदान जवळ15 नोव्हेंबरजरम्यान आवर्तन आवश्यक

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 4 - रब्बी हंगामासाठी व  पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी गिरणा धरणातून धरणगाव व जळगाव  तालुक्यासाठी पाण्याचे तीन आवर्तन आरक्षित करण्यात यावे तसेच शेतक:यांचे या वर्षाचे वीज माफ करण्यात यावे, अन्यथा 19 रोजी धरणगाव व 20 रोजी जळगाव येथे वीज कंपनीच्या कार्यालयावर शिंगाडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा  माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी पत्रपरिषदेत दिला.    शुक्रवारी संध्याकाळी मजूर फेडरेशनच्या कार्यालयात गुलाबराव देवकर यांची पत्रपरिषद झाली.  या वेळी त्यांनी ही मागणी केली. या प्रसंगी वाल्मीक पाटील, मंगला पाटील, रवींद्र पाटील, मधुकर पाटील, विलास पाटील उपस्थित होते. 

15 नोव्हेंबरजरम्यान आवर्तन आवश्यकजिल्हाधिकारी व गिरणा धरणाच्या अधिका:यांना निवेदन देऊन चर्चा केली असता 22 नोव्हेंबर दरम्यान पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाल्यानंतर या बाबत निर्णय होईल, असे सांगण्यात आले. मात्र तो र्पयत खूप उशीर होईल. त्यामुळे 15 नोव्हेंबर दरम्यान पहिले आवर्तन सोडण्यात यावे तसेच पालमंत्र्यांनी या बाबत तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. या सोबतच शेत मालाला वाढीव भाव मिळावा कापूस खेरदी केंद्रांवर पुरेसी यंत्रणा उपलब्ध करावी, अशीही मागणी त्यांनी केली. 

मतदार संघात मला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे वैफल्यग्रस्त झाले असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे, अशी टीका  माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी केली. आता घोडा मैदान जवळगुलाबराव पाटील यांनी जे बोलायचे आहे ते विकासावर बोलावे. मी काय केले आहे, हे जनतेला माहित आहे. माङयावर दोन वर्षे जे संकट आले, त्यामुळे त्यांना संधी मिळाली.  अन्यथा किमान पाच पंचवार्षिक तरी त्यांना संधी मिळाली नसती. असे असले तरी आता घोडा मैदान जवळच असून जनताच हिशेब करेल, असा विश्वास देवकर यांनी व्यक्त केला.  शिवसेना व त्यांचे मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करतात. या पेक्षा त्यांनीच आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे.  राजीनामा देतो, असे अनेकदा सांगून झाले असून नुसते सांगता काय सत्ता सोडून द्या, खिशातच राजीनामा घेऊन काय फिरता, तो एकदाचा देऊन टाका, अशीही मागणी देवकर यांनी केली.