शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

पाण्यासाठी शेतकरी रस्त्यावर

By admin | Updated: October 2, 2015 01:06 IST

नंदुरबार :प्रकाशा बॅरेजचे पाणी नंदुरबार तालुक्यातील लगतच्या शेतीसाठी उपलब्ध व्हावे या मागणीसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.

नंदुरबार : तापी खोरे विकास महामंडळ निर्मित प्रकाशा बॅरेजचे पाणी नंदुरबार तालुक्यातील लगतच्या शेतीसाठी उपलब्ध व्हावे या मागणीसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.

मार्केट कमिटीपासून मोर्चाला सुरुवात झाली. महिला-पुरुषांसह शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. नंदुरबार व शहादा तालुक्यातील गावांना उपसा सिंचनाद्वारे पाणी आणून नद्या-नाले, तलाव व साठवण बंधारे भरून तापीच्या पाण्याचा शेतीसाठी उपयोग व्हावा या प्रमुख मागणीसाठी मोर्चाचे आयोजन केले होते.

मोर्चात शहादा व नंदुरबार तालुक्यातील अनेक शेतकरी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. कुठल्याही राजकीय पक्षाचे नेतृत्व या वेळी नव्हते. सहभागी शेतकरी विशेषत: वयोवृद्ध व तरुणांनी हातात फलक घेऊन विविध घोषणा दिल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांना निवेदन देण्यासाठी पाच शेतक:यांचे शिष्टमंडळ गेले. जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी निवेदन स्वीकारून शासनस्तरावर शेतक:यांच्या मागणीचा पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

यासंदर्भात जिल्हाधिका:यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्याच्या मध्यभागी तापी नदीवर प्रकाशा येथे बॅरेज बांधण्यात आला आहे. त्यात पाच ते सात वर्षापासून पाणी अडविण्यात आलेले आहे. तापी नदीची भौगोलिक परिस्थिती पाहता तापी नदीचे पात्र खोल आहे. त्यामुळे तापीच्या पात्रातून कालवे काढून ते पाणी शेतशिवारात फिरवणे शक्य नाही. त्याला पर्याय हा उपसा सिंचन योजना अर्थात लिफ्ट इरिगेशन हाच आहे. बॅरेजमधील पाणी उपसा सिंचनाद्वारे शेताच्या बांधार्पयत आणण्याकरिता सदर उपसा योजना ही गुजरात पॅटर्नप्रमाणे 24 तास एक्स्प्रेस फीडर जोडून राबविण्यात यावी. जिल्ह्यातील बहुतांश भागातील शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे उपसा सिंचन योजनाद्वारे जिल्ह्यातील शेतजमिनीला पाणी मिळाल्यास शेतक:यांच्या दृष्टीने ते लाभदायकच ठरणार आहे. शिवाय शेतमजुरांनादेखील कायमस्वरूपी स्थानिक स्तरावरच रोजगार मिळणार असल्याने स्थलांतराचे प्रमाणदेखील कमी होण्यास मदत होणार आहे. याबाबत शासनाने गांभीर्याने विचार करावा. जोर्पयत लेखी स्वरूपात शासनाकडून हमी मिळत नाही तोर्पयत उपोषण सुरूच राहणार असल्याचेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदन देणा:यांच्या शिष्टमंडळात डॉ.रमेश पाटील, डॉ.वसंत पाटील, सुदामभाई चौधरी, हिरालाल चौधरी, रवींद्र पाटील आदी सहभागी झाले होते.

रणरणते ऊन लक्षात घेता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात संयोजकांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. याशिवाय नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने टँकर व फायर फायटर पाठविले होते.

शहर पोलिसांतर्फे मोर्चादरम्यान चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.