शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

पाण्यासाठी शेतकरी रस्त्यावर

By admin | Updated: October 2, 2015 01:06 IST

नंदुरबार :प्रकाशा बॅरेजचे पाणी नंदुरबार तालुक्यातील लगतच्या शेतीसाठी उपलब्ध व्हावे या मागणीसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.

नंदुरबार : तापी खोरे विकास महामंडळ निर्मित प्रकाशा बॅरेजचे पाणी नंदुरबार तालुक्यातील लगतच्या शेतीसाठी उपलब्ध व्हावे या मागणीसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.

मार्केट कमिटीपासून मोर्चाला सुरुवात झाली. महिला-पुरुषांसह शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. नंदुरबार व शहादा तालुक्यातील गावांना उपसा सिंचनाद्वारे पाणी आणून नद्या-नाले, तलाव व साठवण बंधारे भरून तापीच्या पाण्याचा शेतीसाठी उपयोग व्हावा या प्रमुख मागणीसाठी मोर्चाचे आयोजन केले होते.

मोर्चात शहादा व नंदुरबार तालुक्यातील अनेक शेतकरी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. कुठल्याही राजकीय पक्षाचे नेतृत्व या वेळी नव्हते. सहभागी शेतकरी विशेषत: वयोवृद्ध व तरुणांनी हातात फलक घेऊन विविध घोषणा दिल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांना निवेदन देण्यासाठी पाच शेतक:यांचे शिष्टमंडळ गेले. जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी निवेदन स्वीकारून शासनस्तरावर शेतक:यांच्या मागणीचा पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

यासंदर्भात जिल्हाधिका:यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्याच्या मध्यभागी तापी नदीवर प्रकाशा येथे बॅरेज बांधण्यात आला आहे. त्यात पाच ते सात वर्षापासून पाणी अडविण्यात आलेले आहे. तापी नदीची भौगोलिक परिस्थिती पाहता तापी नदीचे पात्र खोल आहे. त्यामुळे तापीच्या पात्रातून कालवे काढून ते पाणी शेतशिवारात फिरवणे शक्य नाही. त्याला पर्याय हा उपसा सिंचन योजना अर्थात लिफ्ट इरिगेशन हाच आहे. बॅरेजमधील पाणी उपसा सिंचनाद्वारे शेताच्या बांधार्पयत आणण्याकरिता सदर उपसा योजना ही गुजरात पॅटर्नप्रमाणे 24 तास एक्स्प्रेस फीडर जोडून राबविण्यात यावी. जिल्ह्यातील बहुतांश भागातील शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे उपसा सिंचन योजनाद्वारे जिल्ह्यातील शेतजमिनीला पाणी मिळाल्यास शेतक:यांच्या दृष्टीने ते लाभदायकच ठरणार आहे. शिवाय शेतमजुरांनादेखील कायमस्वरूपी स्थानिक स्तरावरच रोजगार मिळणार असल्याने स्थलांतराचे प्रमाणदेखील कमी होण्यास मदत होणार आहे. याबाबत शासनाने गांभीर्याने विचार करावा. जोर्पयत लेखी स्वरूपात शासनाकडून हमी मिळत नाही तोर्पयत उपोषण सुरूच राहणार असल्याचेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदन देणा:यांच्या शिष्टमंडळात डॉ.रमेश पाटील, डॉ.वसंत पाटील, सुदामभाई चौधरी, हिरालाल चौधरी, रवींद्र पाटील आदी सहभागी झाले होते.

रणरणते ऊन लक्षात घेता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात संयोजकांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. याशिवाय नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने टँकर व फायर फायटर पाठविले होते.

शहर पोलिसांतर्फे मोर्चादरम्यान चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.