शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भाजीपाल्याचे भाव गडगडल्याने उभ्या पिकात शेतकऱ्यांनी घातली गुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 14:25 IST

परिसरात भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात झालेले उत्पादन आणि त्यामुळे झालेली वाताहत यामुळे मात्र शेतकऱ्यांना खूप अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

तळेगाव, ता.जामनेर :  परिसरात भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात झालेले उत्पादन आणि त्यामुळे झालेली वाताहत यामुळे मात्र शेतकऱ्यांना खूप अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काही शेतकऱ्यांनी तर उभ्या पिकात गुरे घालून पीक नष्ट केले.तळेगाव येथील शेतकरी दिवाकर अंबादास कुलकर्णी व चंद्रशेखर पद्माकर कुलकर्णी यांनी आपल्या शेतात वांगे, कोबी यासह भाजीपाला पीक लावले. लावलेल्या पिकांचा खर्चदेखील निघेनासा झाला आहे. कोबी बाजारात नेली असता लिलाव झाला नाही व वाहतूक खर्चही गेला. त्यामुळे वैतागून त्यांनी आपल्या उभ्या पिकात गावातील गाई, गवार  घालून पीक नष्ट केले. तसेच मेथी, कोथिंबीर, वांगे यासह अन्य भाजीपाला पिकांचेदेखील भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चदेखील निघत नाही. त्याचप्रमाणे परिसरात टरबूज लागवडदेखील मोठ्या प्रमाणात आहे. टरबुजाचेदेखील भाव पडले आहेत. चार रुपये किलोप्रमाणे व्यापारी माल मागत असल्याने शेतकऱ्यांपुढे खर्च कसा काढावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीJamnerजामनेर