शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जामनेर तालुक्यातील पाळधी येथे महामार्ग शेतकऱ्यांनी पाडला बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 17:58 IST

जळगाव-औरंगाबाद महामार्गाचे काम करताना पाळधी, ता.जामनेर गावाजवळ पूल तयार करताना पर्यायी मार्ग तयार करण्यात आला आहे. परंतु या पर्यायी मार्गाजवळ पाण्याचा निचरा व्यवस्थित न झाल्याने रात्री झालेल्या पावसाचे पाणी थेट शेतात घुसले. यामुळे संतप्त झालेल्या शेतकºयांनी या महामार्गावरील वाहतूक बंद पाडली.

ठळक मुद्देसंताप : जळगाव-औरंगाबाद महामार्गाचे काम संथ गतीनेरस्ता कॉक्रीटीकरण शेतकऱ्यांसाठी ठरतोय डोकेदुखीठेकेदारांच्या अपुºया कामामुळे शेतात साचले पाणी

विनोद कोळीपाळधी, ता.जामनेर, जि.जळगाव : जळगाव-औरंगाबाद महामार्गाचे काम करताना पाळधी, ता.जामनेर गावाजवळ पूल तयार करताना पर्यायी मार्ग तयार करण्यात आला आहे. परंतु या पर्यायी मार्गाजवळ पाण्याचा निचरा व्यवस्थित न झाल्याने रात्री झालेल्या पावसाचे पाणी थेट शेतात घुसले. यामुळे संतप्त झालेल्या शेतकºयांनी या महामार्गावरील वाहतूक बंद पाडली.जळगाव-औरंगाबाद महामार्गावर पाळधी येथून नेरीकडे रस्ता काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. पाळधीपासून नेरीकडे एक कि.मी. अंतरावर गेल्या सात-आठ महिन्यांपासून पुलाचे संथ गतीने सुरू असलेले काम शेतकºयांसाठीसुद्धा डोकेदुखी झाली आहे. पुलाजवळ वाहनांसाठी कुमकुवत पर्यायी मार्ग बनविण्यात आला आहे. त्यात पाण्याचा व्यवस्थित निचरा होईल, अशी व्यवस्था केलेली नसल्याने शनिवारी रात्री झालेल्या जोरदार पावसाने आजूबाजूच्या दत्तू विठ्ठल माळी, रामलाल डोंगरे यांच्यासह अनेक शेतकºयाच्या शेतात पाणी साचले व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे संतप्त शेतकºयांनी हा पर्यायी रस्ता अडविला व महामार्गावरील वाहतूक बंद केली.या प्रकारची घटना मागील महिन्यात जोरदार पाऊस झाला तेव्हासुद्धा झाली होती व शेतात पाणी साचले होते. त्यावेळीदेखील या शेतकºयांनी अनेक तक्रारी केल्या व लवकरात लवकर पुलाचे बांधकाम पूर्ण करावे व पिकांचे नुकसान थांबवावे, अशी मागणी केली होतीे. परंतु ठेकेदाराने याची कोणतीही दखल घेतली नाही. उलट गेल्या १५ ते २० दिवसांपासून थोडे फार सुरू असलेले कामसुद्धा मजुरांचे थकीत वेतन न दिल्याने बंद पडलेले आहे. याबाबत वर्तमानपत्रात बºयाच बातम्या प्रसिद्ध झाल्या. परंतु त्याचा कोणताही परिणाम कामावर झाल्याचे दिसून येत नाही, असे शेतकºयांचे म्हणणे आहे. म्हणून सर्व शेतकºयांनी याठिकाणी दोन तास रस्ता वाहतूक बंद केलीे व जोपर्यंत नुकसानभरपाई मिळत नाही तोपर्यंत वाहतूक सुरू होऊ देणार नाही, असा पवित्रा शेतकºयांनी घेतला. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाJamnerजामनेर