शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

शेतकऱ्याच्या मालाला पुरेसा भाव मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 19:39 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकºयाच्या शेतमालाला पुरेसा भाव मिळत नसल्याची तक्रार शेतकरी बांधवांंनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष व सचिव यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देशेतकरी बांधवांची व्यथाकृषी उत्पन्न बाजार समितीत माल घेण्यास नकार

प्रमोद पाटीलकासोदा, ता.एरंडोल, जि.जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकºयाच्या शेतमालाला पुरेसा भाव मिळत नसल्याची तक्रार शेतकरी बांधवांंनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष व सचिव यांच्याकडे केली आहे.सूत्रांनुसार, खडके खुर्दचे शेतकरी विलास गुलाब पाटील हे सफेद ज्वारी घेऊन बाजार समितीत गेले. त्यांच्या मालाचा लिलाव करण्यासाठी कोणीही व्यापारी यायला तयार होत नव्हते. संबधित शेतकºयाने विनंती करूनदेखील ते माल घेण्यासाठी तयार होत नव्हते. तेव्हा शेतकºयाने बाजार समितीच्या संचालकांशी संपर्क साधला. त्यांनी कासोदा येथील व्यवस्थापकाला फोन केला. तेव्हा व्यापारी जयप्रकाश समदाणी आले. परंतु त्यांनी माझ्याकडे माणसं नाहीत व माल ठेवायला जागा नाही, अशी उत्तरे देऊन माल घेण्यास नकार दिला. त्यानंतर दिलीप मंत्री यांनी सफेद ज्वारी घेण्यास नकार देऊन ज्वारी काळी असती तर घेतली असते, असे सांगून शेतकºयाच्या मालाची खिल्ली उडवली. काळ्या ज्वारीला मार्केट आहे, असेही त्यांनी बोलून दाखविले. म्हणजे पावसाचा फटका बसलेली काळी ज्वारी त्यांना कमी भावाने मिळते व नफा जास्त मिळतो म्हणून काळी ज्वारीला पसंती दिली जाते व चांगला शेतकऱ्यांचा माल नाकारला जातो, असे सर्वच मालाच्या बाबतीत घडत असते. अशा अनेक वेळा तक्रारी करूनदेखील कासोदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, सचिव, संचालक यांनाही व्यापारी दाद देत नाही. याकडे संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, अशी शेतकरी बांधवांची व्यथा आहे.आम्ही १४०० ते १५०० रुपये प्रति क्विंटल दराने ज्वारी खरेदी करतो. एका व्यापाºयाने १६०० रुपये भाव देऊ केला होता. मालाला उठाव नाही. त्यामुळे जास्त भाव देऊ शकत नाही.-शैलेश मंत्री, व्यापारी, कासोदा, ता.एरंडोलकासोदा बाजार समितीत शेतकºयांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्या आहेत. तेथील कर्मचाºयांना हटवून याबाबत शिस्त लावणे, लिलाव प्रक्रिया सुरळीतपणे व्हावी, यासाठी त्वरित लक्ष देऊ.-सुनील पवार, अध्यक्ष बाजार समिती, धरणगाव.

टॅग्स :MarketबाजारErandolएरंडोल