शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
2
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
3
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
4
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
5
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
6
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
7
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
8
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
9
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
10
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
11
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
12
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
13
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
14
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
15
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
16
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
17
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
18
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
19
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
20
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?

गव्हाचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीत

By admin | Updated: March 6, 2017 00:27 IST

कापडणे : कापडणे व परिसरात सध्या गहू काढणीचा हंगाम सुरू आहे.

कापडणे : कापडणे व परिसरात सध्या गहू काढणीचा हंगाम सुरू आहे. मात्र, नवीन उत्पादित गव्हाला खूपच कमी भाव मिळत असल्यामुळे  येथील शेतकरी गहू  बाजारपेठेत विक्रीसाठी न नेता  साठवणूक करण्याला प्राधान्य देत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्यावर्षी पाऊस कमी झाला. परिणामी, येथील शेतकºयांना  चांगला रब्बी हंगाम घेता आला नाही. दरवर्षी पाण्याची स्थिती चांगली असल्यामुळे शेतकरी दहा ते पंधरा एकर जमिनीवर गहू या पिकाची पेरणी करीत होते. मात्र, यंदा पाणीटंचाईमुळे  केवळ एक ते दोन एकरावर गव्हाची लागवड शेतकºयांनी केली आहे.   रब्बी हंगामातील  गव्हाचे पीक हे तीन ते साडेतीन महिन्यांच्या कालावधीचे असल्याने नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात गव्हाची पेरणी करतांना जी विहीर तीन ते चार तास पाण्याचा उपसा करायची ती विहीर फेब्रुवारी- मार्च महिन्यात थेट अर्ध्या तासावर आली आहे. विहीरी व कूपनलिकांना पुरेसे पाणी नसल्याने गव्हाला अपेक्षित असलेले पाणीही देता आलेले नाही. त्यामुळे कापडणे परिसरातील बहुतांशी सर्वच शेतकºयांचे गहू बारीक झाला आहे. त्यामुळे उत्पादनात कमालीची घट आली आहे. पाणी मुबलक राहिल्यास एकरी १२ ते १५ क्विंटल गव्हाचे उत्पादन मिळते. मात्र, यंदा रब्बी हंगामात तशी परिस्थिती नसल्याने दर वर्षाच्या तुलनेने यंदा सरासरी पन्नास टक्के उत्पादनात घट झाली आहे. सध्या मोठ्या हार्वेस्टर मशीनच्या साहाय्याने एकरी १२०० रुपये देऊन गव्हाचे तयार उत्पादित पीक काढले जात आहे. मात्र, यामुळे चारा हाती लागत नसल्याने, काही शेतकरी एक एकरला एक हजार रुपये याप्रमाणे साध्या लहान यंत्राद्वारे उभ्या गव्हाची मशीनद्वारे कापणी करत असून थ्रेशर मशीनने २०० रुपये पोत्याप्रमाणे मळणी काढणीचे काम सुरू आहे. तुटपुंजा भावपाणीटंचाई असल्याने खूपच कमी क्षेत्रफळात  गव्हाची लागवड असून, उत्पादनात निम्यापेक्षा जास्त घट आल्यानेदेखील गव्हाला खूपच कमी भाव मिळत असल्याने शेतकºयांची पिळवणूक करण्याची खेळी खेळली जात असल्याची प्रतिक्रिया शेतकºयांमधून व्यक्त होत आहे. गव्हाची बाजारपेठेत आवक नसताना व शेतकºयाकडे माल नसताना गव्हाला २२०० ते २३०० रुपये  भाव क्विंटलला मागील आठवड्यात होता. मात्र, आता शेतकºयांचा माल बाजारपेठेत येऊ लागल्यावर एक क्विंटल गव्हाला केवळ १,५०० ते १,६०० रुपये एवढा कमी भाव मिळत आहे. आता तर गहू काढणीला सुरुवात झाली आहे. अशी बाजार भावाची गंभीर परिस्थिती आहे.  अजून  आठवड्याभरानंतर सर्वच शेतकरी गहू काढणीला सुरुवात करतील, तेव्हा बाजारात आवक वाढल्याने पुन्हा १२०० ते १३०० रुपये इतका कमी भाव मिळण्याची शक्यता शेतकºयांकडून वर्तवली जात आहे.दररोज गव्हाचे भाव घसरत असल्याने शेतकरी मात्र गव्हाला बाजारपेठेत कमी भावात गहू न विकता त्याला साफ व स्वच्छ करून  गोदामात पोते भरून साठवणूक करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु तरीदेखील शेतकरी द्विधा मन:स्थितीत सैरावैरा झालेला दिसत आहे. गहू जर स्वस्त व कमी भावात विकला तर खूपच जास्त तोटा सहन करावा लागणार आहे. दुसरीकडे जर साठवणूक केली तर झालेल्या कर्जाच्या पैशांची परतफेड कशी करायची या विवंचनेत शेतकरी दिसत आहेत. म्हणून आपापल्या सोयीनुसार काही शेतकरी कमी भावात गव्हाची विक्री करीत आहेत तर काही साठवणूक करण्याचा प्रयत्न करीत आहेत. गहू  घेण्यासाठी शेती मशागत बियाणे, खते, निंदणी, खुरपणी, काढणी, कापणी, मळणी, बाजारपेठेत माल नेण्यासाठी वाहतुकीचा खर्च, हमाली आदींचा खर्च जास्त असल्याने १,६०० ते १,७०० इतक्या कमी भावात हे पीक घेणे परवडत नाही. खर्चाच्या तुलनेने २,५०० रुपये क्विंटलच्या पुढे गव्हाला भाव असणे अपेक्षित आहे. -अरुण पुंडलिक पाटील, शेतकरी