शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्या करतोय, कंपनी विषयी नाही,भावावर बोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 13:19 IST

पाशा पटेल यांना सुनावले शेतकऱ्याने खडे बोल

ठळक मुद्देअहो शेतकºयाची बायको चांगली साडे नेसू शकत नाही

जळगाव : तुम्ही, बड्या कंपन्यांचा विषय करता त्या शेतकºयांना लुबाडतात. शेतकºयांच्या गट कंपन्या स्थापन करण्यापूर्वी हमी भावाचे बोला, कापसाचे भाव का वाढले नाहीत... शेतकºयावर आतमहत्येची वेळ का येते? कापूस प्रश्नावरून उपोषणास करणारे मंत्री महाजन यांची सध्याची भूमिका काय? असे खडे बोल डिगंबर बडगुजर (चिंचोली ता.यावल) या शेतकºयाने राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांना बुधवारी सुनावले.जिल्हा कृषि विभागातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात बुधवारी कापूस उत्पादक शेतकरी व जिनिंग कंपनी प्रतिनिधींची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यात पटेल यांची उपस्थिती होती. कापूस उत्पादक शेतकºयांनी टेबल वाजवून शेतकºयाच्या या भूमिकेला दाद दिली. अचानक झालेल्या शाब्दीक माराने पटेल हेदेखील अवाक झाले होते.पाशा पटेल यांनी मनोगत व्यक्त केले व कापूस क्षेत्रात ज्यांनी वेगळे उपक्रम राबविले अशांनी बोलावे अशी सूचना केली. त्यानंतर ही ठिणगी पडली. शेतकरी डिगंबर बडगुजर हे म्हणाले, तुम्ही एसीत बसतात व भाषणे करतात. अगोदर भाव का मिळत नाही यावर बोला... असे सुनावले. पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह तुम्हाला आणि शासकीय अधिकाºयांनाही वाटते की शेतकºयांचे भले व्हावे. मग आज शेतकºयांच्याच विषयावर बोला. शेतकरी ५० क्विंटल कापूस पिकवतो असे सांगता तरीही त्याच्यावर आत्महत्येची वेळ का येते? शेतमालाला जास्तीत जास्त भाव कसा देता येईल, यासंदर्भात तुम्ही बोला असे ते वारंवार सांगात होते. यावेळी पटेल यांनी विषयांतर करु नका... मी तुमच्या हात जोडतो, पाया पडतो. अशी विनवणी करीत हा विषय इथेच संपविण्याची सूचना केली. त्यावर शेतकरी बडगुजर हे शांत झाले. यानंतर ही बैठक दोन तास चालली.अहो शेतकºयाची बायको चांगली साडे नेसू शकत नाहीकपाशी उत्पादक शेतकरी किशोर चौधरी (असोदा) यावेळी म्हणाले, आम्ही पिढीजात कापूस उत्पादक आहोत. शेतीत आमचे रक्त सांडले पण नव तंत्रज्ञान मिळाले नाही. गरीब ते गरीबच राहिलो. अहो शेतकºयाची बायको कधी चांगली साडी नेसू शकत नाही अशी परिस्थिती आहे. आम्ही प्रयत्न करूनही नव तंत्रज्ञान मिळाले नाही. यासाठी काही तरी करा, मुक्ताईनगर येथील शेषराव पाटील हेदेखील तक्रार मांडण्यास उभे राहीले असता त्यांना बसण्यास सांगण्यात आले. बोदवड येथील निलेश पाटील यांनी कापूस संशोधन केंद्र (नागपूर) कडे काही विषय घेऊन गेले असता साधा प्रतिसाद मिळाला नाही. पश्चिम महाराष्टÑातील शेतकºयांकडे जास्त लक्ष दिले जाते अशी तक्रारही त्यांनी केली. पाळधी येथील जिनिंग व्यावसायिक सोमाणी यांनी एकरी उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान शेतकºयांना दिले जावे असे मत मांडले. तर शेवगे बुद्रुक ता. पारोळा येथील हरिश्चंद्र पाटील यांनी गट शेतीतील कपाशी न्युयार्कला आम्ही निर्यात करतो असे सांगितले.जळगाव तालुक्यातील करंज येथील शेतकरी यांनी एक गाव एक वाण ही भूमिका राबवून चांगले उत्पन्न मिळवतो असे सांगितले.शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करापाशा पटेल म्हणाले की, एकट्या शेतकºयाला मुबलक प्रमाणात चांगले उत्पादन घेणे शक्य नसल्याने मोठया प्रमाणात सामुहिक शेती, गटशेती करण्यावर भर देण्यात येत आहे. या कार्यशाळेला आमदार उन्मेश पाटील, जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर, जि.प. उपाध्यक्ष नंदकुमार महाजन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी शास्त्रज्ञ डॉ.बी.डी. जडे, उपविभागीय कृषी अधिकारी गोरक्ष लोखंडे, जिल्हा कृषी विकास अधिकारी मधुकर चौधरी आदी उपस्थित होते.आत्महत्या स्लॅबच्या घरात रहाणारा शेतकरीच करतोआपण केंद्राच्या सूचनेवरून शेतकºयाने आत्महत्या केलेल्या काही गावांना भेटी दिल्याचे पाशा पटेल म्हणाले. ज्या शेतकºयांच्या घरावर स्लॅबचे छत होते तेथेच भिंतीवर मयत शेतकºयाचा फोटो दिसला. एकाही झोपडीतील शेतकºयाने आत्महत्या केली असे आढळले नाही. याचे कारण स्पष्ट करताना ते म्हणाले, कापूस इतरांकडून घेऊन तो विक्रीस काही जण नेतात मात्र भाव न मिळाल्याने नंतर मनस्ताप होऊन तो आत्महत्या करतो असेही प्रकार आढळून आले. मात्र अशी वेळ त्यांच्यावर येऊ नये यासाठी आपण आज येथे चर्चा करणार आहोत.मी सरकारमध्ये बसून सोल्यूशन देतोय... माझा शेतकºयांप्रती असलेला कळवळा कमी झालेला नाही. विरोधी पक्षात असताना आरोप करावा लागतो. तर सरकारमध्ये आल्यावर सोल्यूशन द्यावे लागते. मी आता सरकारमध्ये बसून सोल्यूशन देण्याचे काम करत आहे. संघर्षाचे रुपांतर आता सोल्यूशनमध्ये झाले आहे. माझी शेतकºयांविषयी असलेली भावना पूवीर्चीच आहे आणि मरेपर्यंत तीच राहील, असेही पाशा पटेल म्हणाले.ं