शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

शेतकरी आत्महत्या करतोय, कंपनी विषयी नाही,भावावर बोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 13:19 IST

पाशा पटेल यांना सुनावले शेतकऱ्याने खडे बोल

ठळक मुद्देअहो शेतकºयाची बायको चांगली साडे नेसू शकत नाही

जळगाव : तुम्ही, बड्या कंपन्यांचा विषय करता त्या शेतकºयांना लुबाडतात. शेतकºयांच्या गट कंपन्या स्थापन करण्यापूर्वी हमी भावाचे बोला, कापसाचे भाव का वाढले नाहीत... शेतकºयावर आतमहत्येची वेळ का येते? कापूस प्रश्नावरून उपोषणास करणारे मंत्री महाजन यांची सध्याची भूमिका काय? असे खडे बोल डिगंबर बडगुजर (चिंचोली ता.यावल) या शेतकºयाने राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांना बुधवारी सुनावले.जिल्हा कृषि विभागातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात बुधवारी कापूस उत्पादक शेतकरी व जिनिंग कंपनी प्रतिनिधींची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यात पटेल यांची उपस्थिती होती. कापूस उत्पादक शेतकºयांनी टेबल वाजवून शेतकºयाच्या या भूमिकेला दाद दिली. अचानक झालेल्या शाब्दीक माराने पटेल हेदेखील अवाक झाले होते.पाशा पटेल यांनी मनोगत व्यक्त केले व कापूस क्षेत्रात ज्यांनी वेगळे उपक्रम राबविले अशांनी बोलावे अशी सूचना केली. त्यानंतर ही ठिणगी पडली. शेतकरी डिगंबर बडगुजर हे म्हणाले, तुम्ही एसीत बसतात व भाषणे करतात. अगोदर भाव का मिळत नाही यावर बोला... असे सुनावले. पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह तुम्हाला आणि शासकीय अधिकाºयांनाही वाटते की शेतकºयांचे भले व्हावे. मग आज शेतकºयांच्याच विषयावर बोला. शेतकरी ५० क्विंटल कापूस पिकवतो असे सांगता तरीही त्याच्यावर आत्महत्येची वेळ का येते? शेतमालाला जास्तीत जास्त भाव कसा देता येईल, यासंदर्भात तुम्ही बोला असे ते वारंवार सांगात होते. यावेळी पटेल यांनी विषयांतर करु नका... मी तुमच्या हात जोडतो, पाया पडतो. अशी विनवणी करीत हा विषय इथेच संपविण्याची सूचना केली. त्यावर शेतकरी बडगुजर हे शांत झाले. यानंतर ही बैठक दोन तास चालली.अहो शेतकºयाची बायको चांगली साडे नेसू शकत नाहीकपाशी उत्पादक शेतकरी किशोर चौधरी (असोदा) यावेळी म्हणाले, आम्ही पिढीजात कापूस उत्पादक आहोत. शेतीत आमचे रक्त सांडले पण नव तंत्रज्ञान मिळाले नाही. गरीब ते गरीबच राहिलो. अहो शेतकºयाची बायको कधी चांगली साडी नेसू शकत नाही अशी परिस्थिती आहे. आम्ही प्रयत्न करूनही नव तंत्रज्ञान मिळाले नाही. यासाठी काही तरी करा, मुक्ताईनगर येथील शेषराव पाटील हेदेखील तक्रार मांडण्यास उभे राहीले असता त्यांना बसण्यास सांगण्यात आले. बोदवड येथील निलेश पाटील यांनी कापूस संशोधन केंद्र (नागपूर) कडे काही विषय घेऊन गेले असता साधा प्रतिसाद मिळाला नाही. पश्चिम महाराष्टÑातील शेतकºयांकडे जास्त लक्ष दिले जाते अशी तक्रारही त्यांनी केली. पाळधी येथील जिनिंग व्यावसायिक सोमाणी यांनी एकरी उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान शेतकºयांना दिले जावे असे मत मांडले. तर शेवगे बुद्रुक ता. पारोळा येथील हरिश्चंद्र पाटील यांनी गट शेतीतील कपाशी न्युयार्कला आम्ही निर्यात करतो असे सांगितले.जळगाव तालुक्यातील करंज येथील शेतकरी यांनी एक गाव एक वाण ही भूमिका राबवून चांगले उत्पन्न मिळवतो असे सांगितले.शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करापाशा पटेल म्हणाले की, एकट्या शेतकºयाला मुबलक प्रमाणात चांगले उत्पादन घेणे शक्य नसल्याने मोठया प्रमाणात सामुहिक शेती, गटशेती करण्यावर भर देण्यात येत आहे. या कार्यशाळेला आमदार उन्मेश पाटील, जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर, जि.प. उपाध्यक्ष नंदकुमार महाजन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी शास्त्रज्ञ डॉ.बी.डी. जडे, उपविभागीय कृषी अधिकारी गोरक्ष लोखंडे, जिल्हा कृषी विकास अधिकारी मधुकर चौधरी आदी उपस्थित होते.आत्महत्या स्लॅबच्या घरात रहाणारा शेतकरीच करतोआपण केंद्राच्या सूचनेवरून शेतकºयाने आत्महत्या केलेल्या काही गावांना भेटी दिल्याचे पाशा पटेल म्हणाले. ज्या शेतकºयांच्या घरावर स्लॅबचे छत होते तेथेच भिंतीवर मयत शेतकºयाचा फोटो दिसला. एकाही झोपडीतील शेतकºयाने आत्महत्या केली असे आढळले नाही. याचे कारण स्पष्ट करताना ते म्हणाले, कापूस इतरांकडून घेऊन तो विक्रीस काही जण नेतात मात्र भाव न मिळाल्याने नंतर मनस्ताप होऊन तो आत्महत्या करतो असेही प्रकार आढळून आले. मात्र अशी वेळ त्यांच्यावर येऊ नये यासाठी आपण आज येथे चर्चा करणार आहोत.मी सरकारमध्ये बसून सोल्यूशन देतोय... माझा शेतकºयांप्रती असलेला कळवळा कमी झालेला नाही. विरोधी पक्षात असताना आरोप करावा लागतो. तर सरकारमध्ये आल्यावर सोल्यूशन द्यावे लागते. मी आता सरकारमध्ये बसून सोल्यूशन देण्याचे काम करत आहे. संघर्षाचे रुपांतर आता सोल्यूशनमध्ये झाले आहे. माझी शेतकºयांविषयी असलेली भावना पूवीर्चीच आहे आणि मरेपर्यंत तीच राहील, असेही पाशा पटेल म्हणाले.ं