शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक, हमीभावापेक्षा सहाशे रुपये कमी दराने विक्री करावी लागतेय दादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 21:41 IST

अमळनेरला ३४०० तर जळगावात २८०० रुपये भाव

जळगाव : कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने बाजार समितीतील लिलाव बंद आहेत. मात्र, रब्बीची दादर, बाजरीची खरेदी काही प्रमाणात सुरु आहे. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाºयांकडून शेतकºयांची पिळवणूक सुरु आहे. दादर व बाजरी तब्बल सहाशे रुपये कमी दराने खरेदी केली जात आहे. यावर बाजार समिती प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मात्र मौन पाळून आहेत.यंदा दादरची गुणवत्ता चांगली असतानाही भाव न मिळत असल्याने शेतकºयांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. खरीपातील उडीद,मूग असो वा रब्बीतील हरभरा, गहू, दादर, मक्यासह केळी व कापूस या पिकांना हमीभाव निश्चित केला असतानाही श्ेतकºयांना हमीभावाप्रमाणे भाव मिळत नाही. व्यापाºयांकडून शेतकºयांची नियमित  लुट सुरु आहे.  यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेल्यानंतर रब्बीचे उत्पादन काही प्रमाणात चांगले झाले. मात्र, आता उत्पादन चांगले होवून देखील मालाच्या गुणवत्तेनुसार भाव मिळत नसल्याने बळीराजा उध्वस्त झाला आहे. ज्यावर्षी मालाला चांगला भाव असतो त्या वर्र्षी निसर्ग पाठ दाखवतो, तर ज्यावर्षी निसर्ग चांगला बरसतो त्यावर्षी मात्र व्यापारी शेतकºयांची पिळवणूक करत असतात. अमळनेर बाजार समितीत दादरचा भाव प्रतिक्विंटल ३४०० रुपये इतका आहे. मात्र, जळगाव बाजार समितीत २८०० रुपये दराने दादर खरेदी केली जात आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी दादरचा बाजारभाव ३६०० रुपये इतका होता. मात्र, गुणवत्तेच्या नावाखाली व्यापाºयांकडूून शेतकºयांची लुट सुरु आहे. यंदा चांगल्या पावसामुळे रब्बीतील पिकांची गुणवत्ता चांगली आहे. त्यातल्या त्यात दादरची गुणवत्ता देखील चांगली आहे. मात्र, व्यापाºयांकडून दादरच्या  गुणवत्तेत अनेक दोष काढले जात आहेत. त्यातच लॉकडाऊनची परिस्थिती असल्याने नाईलाजास्तव बाजार समितीतील व्यापाºयांना माल विक्री करावा लागत आहे. शेतकरी आज देणार निवेदन बाजार समितीमध्ये शेतकºयांची सुरु असलेल्या लुटीबाबत असोदा, आव्हाणे, कानळदा येथील काही शेतकरी बाजार समिती सभापती व जिल्हा उपनिंबधक यांना निवेदन देणार आहेत.  यंदा खरीपचा हंगाम वाया गेल्यानंतर निदान रब्बीच्या हंगामातून शेतकºयांना लाभ मिळेल अशी अपेक्षा होती. ती आशाही धुळीस मिळाली आहे. लॉकडाऊनचा फायदा व्यापाºयांकडून घेतला जात असून, शेतकºयांचा सहनशिलतेचा अंत पाहिला जात आहे.-किशोर चौधरी, शेतकरी, असोदा ता. जळगाव.अमळनेर व जळगाव बाजार समितीच्या भावात फरक आहे. क्विंंटल मागे ६०० रुपयांचे नुकसान श्ेतकºयांना सहन करावे लागत आहे. शेतकºयांचा व्यथांकडे बाजार समिती प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. -अ‍ॅड.हर्षल चौधरी, शेतकरी, आव्हाणे ता. जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव