शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
3
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
4
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
5
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
6
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
7
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
8
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
9
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
10
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
11
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
12
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
13
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
14
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
15
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
16
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
17
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
18
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
19
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
20
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?

व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक, हमीभावापेक्षा सहाशे रुपये कमी दराने विक्री करावी लागतेय दादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 21:41 IST

अमळनेरला ३४०० तर जळगावात २८०० रुपये भाव

जळगाव : कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने बाजार समितीतील लिलाव बंद आहेत. मात्र, रब्बीची दादर, बाजरीची खरेदी काही प्रमाणात सुरु आहे. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाºयांकडून शेतकºयांची पिळवणूक सुरु आहे. दादर व बाजरी तब्बल सहाशे रुपये कमी दराने खरेदी केली जात आहे. यावर बाजार समिती प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मात्र मौन पाळून आहेत.यंदा दादरची गुणवत्ता चांगली असतानाही भाव न मिळत असल्याने शेतकºयांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. खरीपातील उडीद,मूग असो वा रब्बीतील हरभरा, गहू, दादर, मक्यासह केळी व कापूस या पिकांना हमीभाव निश्चित केला असतानाही श्ेतकºयांना हमीभावाप्रमाणे भाव मिळत नाही. व्यापाºयांकडून शेतकºयांची नियमित  लुट सुरु आहे.  यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेल्यानंतर रब्बीचे उत्पादन काही प्रमाणात चांगले झाले. मात्र, आता उत्पादन चांगले होवून देखील मालाच्या गुणवत्तेनुसार भाव मिळत नसल्याने बळीराजा उध्वस्त झाला आहे. ज्यावर्षी मालाला चांगला भाव असतो त्या वर्र्षी निसर्ग पाठ दाखवतो, तर ज्यावर्षी निसर्ग चांगला बरसतो त्यावर्षी मात्र व्यापारी शेतकºयांची पिळवणूक करत असतात. अमळनेर बाजार समितीत दादरचा भाव प्रतिक्विंटल ३४०० रुपये इतका आहे. मात्र, जळगाव बाजार समितीत २८०० रुपये दराने दादर खरेदी केली जात आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी दादरचा बाजारभाव ३६०० रुपये इतका होता. मात्र, गुणवत्तेच्या नावाखाली व्यापाºयांकडूून शेतकºयांची लुट सुरु आहे. यंदा चांगल्या पावसामुळे रब्बीतील पिकांची गुणवत्ता चांगली आहे. त्यातल्या त्यात दादरची गुणवत्ता देखील चांगली आहे. मात्र, व्यापाºयांकडून दादरच्या  गुणवत्तेत अनेक दोष काढले जात आहेत. त्यातच लॉकडाऊनची परिस्थिती असल्याने नाईलाजास्तव बाजार समितीतील व्यापाºयांना माल विक्री करावा लागत आहे. शेतकरी आज देणार निवेदन बाजार समितीमध्ये शेतकºयांची सुरु असलेल्या लुटीबाबत असोदा, आव्हाणे, कानळदा येथील काही शेतकरी बाजार समिती सभापती व जिल्हा उपनिंबधक यांना निवेदन देणार आहेत.  यंदा खरीपचा हंगाम वाया गेल्यानंतर निदान रब्बीच्या हंगामातून शेतकºयांना लाभ मिळेल अशी अपेक्षा होती. ती आशाही धुळीस मिळाली आहे. लॉकडाऊनचा फायदा व्यापाºयांकडून घेतला जात असून, शेतकºयांचा सहनशिलतेचा अंत पाहिला जात आहे.-किशोर चौधरी, शेतकरी, असोदा ता. जळगाव.अमळनेर व जळगाव बाजार समितीच्या भावात फरक आहे. क्विंंटल मागे ६०० रुपयांचे नुकसान श्ेतकºयांना सहन करावे लागत आहे. शेतकºयांचा व्यथांकडे बाजार समिती प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. -अ‍ॅड.हर्षल चौधरी, शेतकरी, आव्हाणे ता. जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव