शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

यावल तालुक्यात कर्ज व नापिकीमुळे शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 19:17 IST

यावल तालुक्यातील मनवेल येथील सुरेश भागवत पाटील या ७७ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने नापिकी व कर्जफेड होत नसल्याने आत्महत्या केली.

ठळक मुद्देमनवेल येथील घटनाशेतातच विष घेतल्याचे निष्पन्नमृतदेह पाहताच कुटुंबियांचा आक्रोश

यावल, जि.जळगाव : तालुक्यातील मनवेल येथील सुरेश भागवत पाटील या ७७ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने नापिकी व कर्जफेड होत नसल्याने आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी साडेआठला उघडकीस आली.मनवेल येथील सुरेश भागवत पाटील या शेतकºयाकडे सेंट्रल बँकेचे दोन लाख ९० हजार रुपये कर्ज आहे. त्यातच गेल्या दोन तीन वर्षापासून नापिकी होत आहे. केळीची बाग आहे, मात्र व्यापाऱ्यांकडून बाजारभावाप्रमाणे केळीला भाव मिळत नाही. व्यापारी मनमानी भावाने केळी खरेदी करतात. त्यातच सध्या मार्चअखेर असल्याने कर्जाचा बँकेचा हप्ता कसा भारावा या चिंतेत असलेल्या सुरेश भागवत पाटील यांनी आत्महत्या केली असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.शनिवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास सुरेश पाटील नेहमीप्रमाणे पिळोदा शिवारातील त्यांच्या मालकीच्या गट नंबर ४४ /१ या शेतात गेले होते. शनिवारी रात्री ते घरी परतलेच नाहीत म्हणून रविवारी सकाळी कुटुंबियांनी शेतात जावून पाहिले असता त्यांचा मृतदेह शेतात आढळून आला. त्यांच्या मृतदेहाशेजारी विषाच्या बाटल्या आढळून आल्या. त्यांचा मृतदेह पाहताच कुटुंबियांनी टाहो फोडला.यावल ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन डॉ.शुभम जगताप यांनी केले. पाटील यांच्या कुटुंबियांना धीर देण्यासाठी मनवेलचे पं.स. सदस्य दीपक पाटील, माजी पं. स. सदस्य अरूण पाटील, अनिल श्रावण पाटील, वढोदा येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप प्रभाकर सोनवणे व नातेवाईक उपस्थित होते. मयत सुरेश पाटील यांचे पुतणे नंदकिशोर पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून येथील पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल युनुस तडवी करीत आहेत.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याYawalयावल