शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शेतकरी कर्जमाफीसाठी चार रंगातील याद्या होणार प्रसिद्ध- तालुकास्तरीय समितीची भूमिका महत्वपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 22:35 IST

हिरव्या रंगाच्या यादीतील लाभार्थ्यांना मिळणार लगेच लाभ

ठळक मुद्देहिरवा, लाल, पिवळा व रंगहीन अशा चार रंगातील याद्या१०८ गावांमध्ये चावडी वाचन बाकीचावडीवाचनावर ३९६ आक्षेप

आॅनलाईन लोकमत, जळगाव, दि.१२- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा म्हणजेच कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यासाठी शासनाकडून अर्ज भरलेल्या शेतकºयांच्या बँक खात्यांची माहितीची विशेष सॉफ्टवेअरद्वारे तपासणी करून हिरवा, लाल, पिवळा व रंगहीन अशा चार रंगातील याद्या वेबसाईटवर प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. शासनाकडून कर्जमाफी दिली जाणार असली तरीही तालुकास्तरीय समितीची यात महत्वाची भूमिका राहणार आहे. दरम्यान शासनाकडून माहिती अपलोड करण्याच्या पद्धतीत सातत्याने बदल केले जात असल्यानेही विलंब होत आहे. तरीही जिल्ह्याची खातेनिहाय माहिती शुक्रवारपर्यंत पूर्णपणे अपलोड करण्याचा प्रयत्न सहकार खाते तसेच जिल्हा बँकेकडून सुरू आहे. तर व्यापारी बँकांकडून त्यांच्या खातेदारांची माहिती त्यांच्याच स्तरावर अपलोड केली जाणार असून त्याची माहिती जिल्हा उपनिबंधक यांना कळविली जाणार आहे. १०८ गावांमध्ये चावडी वाचन बाकी जिल्'ातील १२११ गावांमधील ४ लाख ५४ हजार ७४८ लाभार्र्थींसाठी ही चावडीवाचनाची प्रक्रिया केली जात आहे. त्यापैकी २०२ गावांमध्ये निवडणुकीची आचारसंहिता असल्याने ती गावे वगळून उर्वरीत १०७३ गावांमध्ये चावडीवाचन घेण्यात येत आहे. त्यापैकीही १०८ गावांमध्ये अद्याप चावडी वाचन बाकी आहे. ज्या गावांमध्ये १७ तारखेला मतदान आहे. त्यांचे चावडीवाचन आचारसंहिता संपल्यावरच होणार आहे. या याद्यांवर आक्षेप घेतले जात आहेत. त्याची सुनावणी होऊन त्यानंतर या याद्या जिल्हाधिकाºयांच्या सहीने अंतीम होऊन शासनाकडे जातील. सॉफ्टवेअरमध्ये योजनेच्या विविध अटी-शर्र्तींनुसार तपासणी होऊन पात्र शेतकºयांची यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर त्या शेतकºयांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा केली जाईल. चावडीवाचनावर ३९६ आक्षेप आतापर्यंत पूर्ण झालेल्या चावडीवाचनावर ३९६ आक्षेप, सूचना उपविभागीय समितीकडे प्राप्त झाल्या आहेत. या आक्षेपांवर सुनावणी होऊन नंतरच अंतीम यादी जाहीर होईल. हिरव्या यादीला मिळणार लाभ अपलोड झालेल्या खातेनिहाय माहिती तसेच आॅनलाईन भरलेला अर्ज यांची सांगड घालून शासनाकडील विशेष सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तात्पुरत्या पात्र शेतकºयांची यादी हिरव्या रंगात प्रसिद्ध केली जाईल. त्या यादीतील लाभार्थी शेतकºयांपैकी कुणावर चावडी वाचनात आक्षेप असतील तर त्या शेतकºयांनाची नावे राखून ठेवून उर्वरीत लाभार्थ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल. पिवळ्या रंगातील यादीत अतिरिक्त माहितीसाठी प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची नावे असतील. तर लाल रंगाच्या यादीत तात्पुरत्या अपात्र शेतकºयांची नावे असतील. रंगहीन यादीत कर्जमाफीसाठी विचाराधीन शेतकºयांची नावे असतील. तालुका समितीची भूमिका महत्वाची पोर्टलवर या याद्या उपलब्ध झाल्यावर त्यास विविध माध्यमातून जिल्हा व तालुकापातळीवर प्रसिद्धी दिली जाणार आहे. तसेच तीन दिवसांत विचाराधीन अर्जदारांची यादी वगळून उर्वरी याद्यांवर हरकती, सूचना जनतेकडून मागविल्या जाणार आहेत. तालुका समितीने या हरकती, सूचनांची चौकशी, खातरजमा करावयाची आहे. या समितीने तात्पुरत्या पात्र अर्जदारांच्या यादीतील अर्जदारांबाबतचा प्राथमिक पडताळणी अहवाल व इतर माहिती पडताळून अशा अर्जदारांना मंजुरी द्यायची आहे. ती यादी तालुका समिती पोर्टलवर अपलोड करेल. संबंधीत लाभार्र्थींनाही त्यांच्या मोबाईलवर एसएमएस द्वारे कळविण्यात येईल. त्या लाभार्थीना कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात येईल. एवढी प्रक्रिया जिल्'ात दिवाळीपूर्वी करण्याची धडपड प्रशासनाकडून सुरू आहे. त्यासाठी शासनाकडून व्हीडीओ कॉन्फरन्स घेऊन वारंवार सूचना केल्या जात आहेत. उर्वरीत रंगाच्या याद्यांबाबत तालुका समितीच खातरजमा करून निर्णय घेईल. त्यानुसार यादी पोर्टलवर अपलोड करणार आहे. तर उपविभागीय समिती ही यात अपिलीय समितीची व देखरेखीची भूमिका पार पाडणार आहे.