शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

शेतकरी नवरा नको गं बाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : लग्न जुळविताना आता वधू पक्षाकडून विविध अपेक्षा, अटी ठेवण्‍यात येतात. यात मुलगा हा शासकीय ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : लग्न जुळविताना आता वधू पक्षाकडून विविध अपेक्षा, अटी ठेवण्‍यात येतात. यात मुलगा हा शासकीय नोकरीला हवा, यालाच अधिकतर वधू पक्षाकडून प्राधान्य दिले जात असून, यासह एकत्रित कुटुंबाला, तसेच शेतकरी, व्यापारी वर नसावा, अशाही अपेक्षा वधू पक्षांकडून येत असतात, असे वधुवर मेळाव्यांचे आयोजन करणाऱ्या अनेक मान्यवरांनी सांगितले.

प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा प्रचंड वाढली असून, रोजगार हा यात कळीचा मुद्दा बनला आहे. त्यातच शासकीय नोकरीकडे सर्वाधिक कल वाढल्याचे चित्र आहे. शासकीय नोकरीबाबत अनेक समज समाजांमध्ये असून, पगार, सुट्ट्या, कमी काम अशा काही धारणा यात आहेत. सर्व सुविधा मिळतात, असाही समज आहे. त्यामुळे शासकीय नोकरीला प्राधान्य दिले जाते. वधू पक्षाकडूनही यालाच प्राधान्य दिले जात आहे, शिवाय ग्रामीण नव्हे, तर शहरी भागाला अधिक पसंती दिली जात आहे.

शासकीय नोकरीला अधिक मागणी

मुलगा हा शासकीय नोकरीत हवा, वेतन २० हजारांपेक्षा अधिक हवे, याला प्राधान्य दिले जाते. शेतकरी किंवा व्यापारी वर्ग नसावा, अशा अपेक्षा वधू पक्षाकडून समोर येत असल्याचे सांगण्‍यात येत आहे. डॉक्टर, इंजिनीअर यांनाही प्राधान्य दिले जात आहे.

या टाकल्या जातात अटी

एकत्रित कुटुंब नसावे, बहीण किंवा भावाची जबाबदारी नसावी, शक्यतोवर स्वतंत्र राहणारा वर असावा, ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात असावा. त्यातही पुणे, मुंबईचा वर असावा, अशा अटी वधू पक्षाकडून टाकल्या जात आहेत.

कोट

वधू पक्षाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. आम्ही गेली पंधरा वर्षे यात कार्यरत असून, यात आम्हाला हा अनुभव येत आहे. मुलगा नोकरीवरच हवा,

शहरातच हवा, त्यातही पुणे, मुंबईला हवा, ग्रामीण भागात नको, एकत्रित कुटुंब नको, अशा अटी वधू पक्षाकडून असतात.

- बाजीराव पाटील, अध्यक्ष,

आम्ही मराठा फाउंडेशन

कोट

शेतकरी वराला शक्यतोवर नकारच असतो. नोकरी हवी, उत्पन्न अधिक हवे आणि शहरच हवे, अशा अपेक्षा वधू पक्षाकडून असतात. आपले उत्पन्न

जेवढे त्यापेक्षा आपल्या जावयाचे उत्पन्न अधिकच हवे, अशी वधुपित्याची अपेक्षा असते, शिवाय मुलगी उच्चशिक्षित असल्यास, आपल्यापेक्षा

उच्चशिक्षित वर हवा, अशीही अपेक्षा असते.

- दत्तात्रय चौधरी, संचालक, खान्देश तेली समाज सेवा संस्था, जळगाव

कोट

वधू पक्षाचे शक्यतोवर शासकीय नोकरीलाच प्राधान्य असते. व्यापारी व शेतकरी वर्ग नको, असे सांगितले जाते. अगदी क्वचित वधू पक्षाच्या अपेक्षा

यापेक्षा वेगळ्या असतात. यासह मुंबई, पुणे येथील वर हवा, अशाही अपेक्षा असतात. आमच्याकडे काही स्थळे आली होती, त्यांनी आवर्जून जळगाव

जिल्ह्यातच स्थळ हवे, व्यापारी हवा, अशी अपेक्षा त्यांची होती.

- लक्ष्मीकांत चौधरी, अध्‍यक्ष, लेवा नवयुवक संघ