शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शेतकरी नवरा नको गं बाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : लग्न जुळविताना आता वधू पक्षाकडून विविध अपेक्षा, अटी ठेवण्‍यात येतात. यात मुलगा हा शासकीय ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : लग्न जुळविताना आता वधू पक्षाकडून विविध अपेक्षा, अटी ठेवण्‍यात येतात. यात मुलगा हा शासकीय नोकरीला हवा, यालाच अधिकतर वधू पक्षाकडून प्राधान्य दिले जात असून, यासह एकत्रित कुटुंबाला, तसेच शेतकरी, व्यापारी वर नसावा, अशाही अपेक्षा वधू पक्षांकडून येत असतात, असे वधुवर मेळाव्यांचे आयोजन करणाऱ्या अनेक मान्यवरांनी सांगितले.

प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा प्रचंड वाढली असून, रोजगार हा यात कळीचा मुद्दा बनला आहे. त्यातच शासकीय नोकरीकडे सर्वाधिक कल वाढल्याचे चित्र आहे. शासकीय नोकरीबाबत अनेक समज समाजांमध्ये असून, पगार, सुट्ट्या, कमी काम अशा काही धारणा यात आहेत. सर्व सुविधा मिळतात, असाही समज आहे. त्यामुळे शासकीय नोकरीला प्राधान्य दिले जाते. वधू पक्षाकडूनही यालाच प्राधान्य दिले जात आहे, शिवाय ग्रामीण नव्हे, तर शहरी भागाला अधिक पसंती दिली जात आहे.

शासकीय नोकरीला अधिक मागणी

मुलगा हा शासकीय नोकरीत हवा, वेतन २० हजारांपेक्षा अधिक हवे, याला प्राधान्य दिले जाते. शेतकरी किंवा व्यापारी वर्ग नसावा, अशा अपेक्षा वधू पक्षाकडून समोर येत असल्याचे सांगण्‍यात येत आहे. डॉक्टर, इंजिनीअर यांनाही प्राधान्य दिले जात आहे.

या टाकल्या जातात अटी

एकत्रित कुटुंब नसावे, बहीण किंवा भावाची जबाबदारी नसावी, शक्यतोवर स्वतंत्र राहणारा वर असावा, ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात असावा. त्यातही पुणे, मुंबईचा वर असावा, अशा अटी वधू पक्षाकडून टाकल्या जात आहेत.

कोट

वधू पक्षाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. आम्ही गेली पंधरा वर्षे यात कार्यरत असून, यात आम्हाला हा अनुभव येत आहे. मुलगा नोकरीवरच हवा,

शहरातच हवा, त्यातही पुणे, मुंबईला हवा, ग्रामीण भागात नको, एकत्रित कुटुंब नको, अशा अटी वधू पक्षाकडून असतात.

- बाजीराव पाटील, अध्यक्ष,

आम्ही मराठा फाउंडेशन

कोट

शेतकरी वराला शक्यतोवर नकारच असतो. नोकरी हवी, उत्पन्न अधिक हवे आणि शहरच हवे, अशा अपेक्षा वधू पक्षाकडून असतात. आपले उत्पन्न

जेवढे त्यापेक्षा आपल्या जावयाचे उत्पन्न अधिकच हवे, अशी वधुपित्याची अपेक्षा असते, शिवाय मुलगी उच्चशिक्षित असल्यास, आपल्यापेक्षा

उच्चशिक्षित वर हवा, अशीही अपेक्षा असते.

- दत्तात्रय चौधरी, संचालक, खान्देश तेली समाज सेवा संस्था, जळगाव

कोट

वधू पक्षाचे शक्यतोवर शासकीय नोकरीलाच प्राधान्य असते. व्यापारी व शेतकरी वर्ग नको, असे सांगितले जाते. अगदी क्वचित वधू पक्षाच्या अपेक्षा

यापेक्षा वेगळ्या असतात. यासह मुंबई, पुणे येथील वर हवा, अशाही अपेक्षा असतात. आमच्याकडे काही स्थळे आली होती, त्यांनी आवर्जून जळगाव

जिल्ह्यातच स्थळ हवे, व्यापारी हवा, अशी अपेक्षा त्यांची होती.

- लक्ष्मीकांत चौधरी, अध्‍यक्ष, लेवा नवयुवक संघ