शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

शेतकरी नवरा नको गं बाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : लग्न जुळविताना आता वधू पक्षाकडून विविध अपेक्षा, अटी ठेवण्‍यात येतात. यात मुलगा हा शासकीय ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : लग्न जुळविताना आता वधू पक्षाकडून विविध अपेक्षा, अटी ठेवण्‍यात येतात. यात मुलगा हा शासकीय नोकरीला हवा, यालाच अधिकतर वधू पक्षाकडून प्राधान्य दिले जात असून, यासह एकत्रित कुटुंबाला, तसेच शेतकरी, व्यापारी वर नसावा, अशाही अपेक्षा वधू पक्षांकडून येत असतात, असे वधुवर मेळाव्यांचे आयोजन करणाऱ्या अनेक मान्यवरांनी सांगितले.

प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा प्रचंड वाढली असून, रोजगार हा यात कळीचा मुद्दा बनला आहे. त्यातच शासकीय नोकरीकडे सर्वाधिक कल वाढल्याचे चित्र आहे. शासकीय नोकरीबाबत अनेक समज समाजांमध्ये असून, पगार, सुट्ट्या, कमी काम अशा काही धारणा यात आहेत. सर्व सुविधा मिळतात, असाही समज आहे. त्यामुळे शासकीय नोकरीला प्राधान्य दिले जाते. वधू पक्षाकडूनही यालाच प्राधान्य दिले जात आहे, शिवाय ग्रामीण नव्हे, तर शहरी भागाला अधिक पसंती दिली जात आहे.

शासकीय नोकरीला अधिक मागणी

मुलगा हा शासकीय नोकरीत हवा, वेतन २० हजारांपेक्षा अधिक हवे, याला प्राधान्य दिले जाते. शेतकरी किंवा व्यापारी वर्ग नसावा, अशा अपेक्षा वधू पक्षाकडून समोर येत असल्याचे सांगण्‍यात येत आहे. डॉक्टर, इंजिनीअर यांनाही प्राधान्य दिले जात आहे.

या टाकल्या जातात अटी

एकत्रित कुटुंब नसावे, बहीण किंवा भावाची जबाबदारी नसावी, शक्यतोवर स्वतंत्र राहणारा वर असावा, ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात असावा. त्यातही पुणे, मुंबईचा वर असावा, अशा अटी वधू पक्षाकडून टाकल्या जात आहेत.

कोट

वधू पक्षाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. आम्ही गेली पंधरा वर्षे यात कार्यरत असून, यात आम्हाला हा अनुभव येत आहे. मुलगा नोकरीवरच हवा,

शहरातच हवा, त्यातही पुणे, मुंबईला हवा, ग्रामीण भागात नको, एकत्रित कुटुंब नको, अशा अटी वधू पक्षाकडून असतात.

- बाजीराव पाटील, अध्यक्ष,

आम्ही मराठा फाउंडेशन

कोट

शेतकरी वराला शक्यतोवर नकारच असतो. नोकरी हवी, उत्पन्न अधिक हवे आणि शहरच हवे, अशा अपेक्षा वधू पक्षाकडून असतात. आपले उत्पन्न

जेवढे त्यापेक्षा आपल्या जावयाचे उत्पन्न अधिकच हवे, अशी वधुपित्याची अपेक्षा असते, शिवाय मुलगी उच्चशिक्षित असल्यास, आपल्यापेक्षा

उच्चशिक्षित वर हवा, अशीही अपेक्षा असते.

- दत्तात्रय चौधरी, संचालक, खान्देश तेली समाज सेवा संस्था, जळगाव

कोट

वधू पक्षाचे शक्यतोवर शासकीय नोकरीलाच प्राधान्य असते. व्यापारी व शेतकरी वर्ग नको, असे सांगितले जाते. अगदी क्वचित वधू पक्षाच्या अपेक्षा

यापेक्षा वेगळ्या असतात. यासह मुंबई, पुणे येथील वर हवा, अशाही अपेक्षा असतात. आमच्याकडे काही स्थळे आली होती, त्यांनी आवर्जून जळगाव

जिल्ह्यातच स्थळ हवे, व्यापारी हवा, अशी अपेक्षा त्यांची होती.

- लक्ष्मीकांत चौधरी, अध्‍यक्ष, लेवा नवयुवक संघ