शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

घसरणारा जीडीपी दर मार्चअखेर सहा टक्क्यांपर्यंतही पोहचणे अशक्य - सतीश मराठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 12:49 IST

पीएमसी बँकेचा अनुभव पाहता विमा संरक्षण वाढविण्यासाठी प्रयत्न

विजयकुमार सैतवाल

जळगाव : गेल्या वर्षभरापासून जीडीपी दरामध्ये सातत्याने होणारी घसरण चिंतेची बाब असून सध्या ४.७५ टक्के असलेला हा दर आर्थिक वर्षअखेर (मार्चअखेर) सहा टक्क्यांपर्यंतही पोहचतो की नाही, अशी भीती भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक व सहकार भारतीचे संरक्षक सतीश मराठे यांनी मंगळवारी जळगावात दिले. या सोबतच पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-आॅपरेटीव्ह बँकेचा (पीएमसी) अनुभव पाहता बँकामध्ये असणाऱ्या ठेवींवरील विमा संरक्षण वाढविण्यासाठी प्रयत्न असल्याचेही सुतोवाच त्यांनी केले. यामुळे नागरी सहकारी बँकांच्याही ठेवीदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.जळगाव जनता सहकारी बँक व सहकार भारती यांच्या संयुक्तविद्यमाने १० डिसेंबर रोजी जळगाव येथे सहकारी बँकांसाठी ‘सहकारी बँकांसंबंधी बदलती आव्हाने पेलण्यासाठी सद्य परिस्थितीतील जोखीम व्यवस्थापन, व्यावसायिक धोरणे, क्षमता व विकास’ या विषयांवर राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी प्रमुख मार्गदर्शक मार्गदर्शक म्हणून मराठे बोलत होते. त्या वेळी त्यांनी हे संकेत दिले.या वेळी मराठे यांच्यासह द इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटस् आॅफ इंडियाचे अध्यक्ष सी.ए. प्रफुल्ल छाजेड, सहकार भारतीचे सरचिटणीस डॉ. उदय जोशी, सहकार भारतीचे अखिल भारतीय बँकिंग प्रकोष्ठ प्रमुख संजय बिर्ला, जळगाव जनता बँकेचे अध्यक्ष प्राचार्य अनिल राव, संजय नागमोती, बँकेचे सीईओ पुंडलिक पाटील उपस्थित होते. या चर्चासत्रासाठी सहकारी बँकांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, वैधानिक लेखा परिक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी असे शेकडो प्रतिनिधी उपस्थित होते.जीडीपी जवळपास निम्म्यावरदेशातील बँकांच्या स्थितीबद्दल माहिती देत सतीश मराठे यांनी जीडीपीबाबत बोलताना सांगितले की, वर्षभरात जीडीपीचा दर घसरतच आहे. आठ टक्क्यांवरून तो सात, सहा, पाच टक्के असा घसरत गेला व आता तो पावणे पाच टक्क्यांवर आला आहे. ज्या वेळी अशा प्रकारे आर्थिक स्थिती ढासळत जाते त्या वेळी त्याचा सर्वात मोठा परिणाम बँकांसारख्या आर्थिक संस्थावर होत असतो. त्यामुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेत मोठी भूमिका असणाºया बँकांसाठी केंद्र सरकार, रिझर्व्ह बँक जे काही करता येईल, ते करीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सध्याची स्थिती पाहता मार्च अखेर अर्थात आर्थिक वर्षअखेर जीडीपीचा दर सहा टक्क्यांपर्यंतही पोहचणे कठीण असल्याचे ते म्हणाले.विमा संरक्षणाची मर्यादा वाढविण्यासाठी प्रयत्नज्या बँकांमध्ये आर्थिक गैरव्यवहार होतात, त्या बँका बंद झाल्यानंतर तेथील ठेवीदारांना काहीच मिळत नाही. त्यासाठी ठेवीदारांना त्यांच्या पूर्ण ठेवी परत मिळाव्या यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे मराठे यांनी सांगितले. देशातील ९२ टक्के बँक खात्यांना विम्याचे संरक्षण आहे, मात्र उर्वरित आठ टक्के खात्यांचा विचार केला तर त्यांचीही रक्कम मोठी आहे. त्यामुळे सर्व खात्यांना विमा संरक्षण देत ५ ते २५ लाखापर्यंतच्या मर्यादेत वाढ करण्यासाठी पाठपुरावा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या अर्थसंकल्पीय सत्रात हे धोरण मंजूर होण्याची शक्यताही मराठे यांनी व्यक्त केली. विमा संरक्षणामुळे ठेवीदारांचा बँकांवरील विश्वास वाढेल व बँकांमध्ये ठेवी वाढून स्थितीही सुधारण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.महागाई दर आणखी वाढणारमहागाईचा दरदेखील वाढणार असल्याचा इशारा मराठे यांनी या वेळी दिला. गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये महागाई दर अडीच ते तीन टक्के होता. तो यंदा चार टक्क्यांवर पोहचला आहे. यात भाव खाणाºया कांद्याचाच हिस्सा १.८७ टक्के असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सध्याची स्थिती पाहता मार्चअखेर हा दर पाच टक्क्यांवर पोहण्याची शक्यता त्यांनी वर्तविली.

टॅग्स :Jalgaonजळगाव