शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

चार लाखांच्या मदतीचा मेसेज बनावट; आलेल्या अर्जांचे करायचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:33 IST

सुनील पाटील जळगाव : कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना सरकारकडून चार लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाईल, असा मेसेज ...

सुनील पाटील

जळगाव : कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना सरकारकडून चार लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाईल, असा मेसेज व्हायरल झाल्याने मृत्यू झालेल्यांचे वारस व नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून अर्ज करायला सुरुवात केली तर काही जणांनी चौकशी केली. हा मेसेजच बनावट असल्याचे स्पष्ट झाल्यावर या लोकांची निराशा झाली. दुसरीकडे त्यांची चांगलीच दमछाक झाली.

काही महिन्यापूर्वी केंद्र शासनाचा असा एक अध्यादेश निघाला होता, मात्र तो लगेच त्याच दिवशी मागेही घेण्यात आला. सरकारी कार्यालयांपर्यंत हा अध्यादेश पोहोचलाच नाही. सोशल मीडियावर मात्र मदतीचा मेसेज व एक अध्यादेश व्हायरल झाला होता. सोबत अर्जाचा नमुनाही होता. त्यामुळे लोकांनी त्यावर विश्वास ठेवून कोणी तहसीलदारांकडे तर कोणी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून चौकशी केली. १५ जणांनी तर आवकजावक विभागात लेखी अर्जच सादर केले. प्रशासनाने या सर्व अर्जदारांना हा बनावट मेसेज असल्याचे कळवून ते अर्ज निकाली काढले.

काय आहे बनावट मेसेज

कोविडने मृत्यू पावलेल्या वारसाच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने चार लाख रुपयांची देणगी जाहीर केली आहे. सेफअर्स किंवा डीसी कार्यालयातील नमुना या पीडीएफ फाइलमध्ये उपलब्ध आहे. ही गोष्ट सर्वांपर्यंत पोहोचवा.

आपत्ती व्यवस्थापनाकडे आले अनेक अर्ज

केंद्र व राज्य सरकार मदत करणार असल्याचा अध्यादेश निघाल्याचा मेसेज व्हायरल झाल्यानंतर ज्या कुटुंबात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, त्यांचे नातेवाईक व वारसांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे लेखी अर्ज केले तर काही जणांनी समक्ष चौकशी करून माहिती घेतली. लेखी अर्ज करणाऱ्यांची संख्या १५ च्यावर होती तर चौकशी करणारे शेकडोंच्या संख्येत होते.

या अर्जांचे करायचे काय?

प्रशासनाकडे आलेल्या अर्जांचे संबंधितांना लेखी कळवून ते निकाली काढण्यात आले आहेत. अशी कोणतीही शासनाची योजना नाही, त्यामुळे तुम्हांला कोणताही लाभ मिळणार नाही. व्हायरल झालेला मेसेज बनावट व फेक असल्याचे कळविण्यात आले. त्याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रत्येक विभागात तशी सूचनाही लावण्यात आली.

अर्ज करू नका, अशी कुठलीही योजना नाही

सोशल मीडियावर व्हायरल होणारे मेसेज फेक व बनावट असून केंद्र किंवा राज्य शासनाची अशी कोणतीही योजना नाही, त्यामुळे नागरिकांनी अर्ज करू नये. कोरोना काळात फ्रंट वर्कर म्हणून सरकारी विभागात कंत्राटी पध्दतीने ज्या कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात आले होते. त्यांचा मृत्यू झाला असेल तर त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्याची योजना होती. ती फक्त कोरोना काळातच होती.

-अमित भोईटे, नायब तहसीलदार, महसूल शाखा