शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेण्यात अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 13:31 IST

जळगाव : एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे कोरोनाची गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णाच्या ‘कॉण्टॅक्ट ट्रेसिंग’कडे म्हणजेच त्यांच्या संपर्कात आलेल्या ...

जळगाव : एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे कोरोनाची गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णाच्या ‘कॉण्टॅक्ट ट्रेसिंग’कडे म्हणजेच त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्यात प्रशासन हतबल ठरत असल्याचे चित्र जळगावात पहायला मिळत आहे. अनेक रुग्णांना त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या नागरिकांबाबत साधी विचारणाही केली जात नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.शहरापासून ते अगदी ग्रामीण भागापर्यंत कोरोनाचा रुग्ण आढळला तर त्याच्या संपर्कात असलेल्या नातेवाईक वा मित्रपरिवार तसेच कार्यालयीन सहकारी यांचा शोध घेऊन त्यांची कोरोना चाचणी पूर्वी केली जात होती. त्यासाठी आरोग्य यंत्रणेने काही कर्मचाऱ्यांची नियुक्तीही केली होती. मात्र आता कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे तेही व्यवस्थित होत नसल्याचे दिसून येत आहे.प्रशासन एकीकडे वाढती गर्दी, नागरिकांचा बेफिकीरपणा आदी सबब सांगून कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला नागरिकांना जबाबदार धरत असले तरीही प्रशासनही अनेक पातळीवर अपयशी ठरत असल्याचेच यामुळे दिसून येत आहे. रुग्ण पॉझिटीव्ह आढळल्यानंतर त्याला त्याच्या घरचा पत्ता, त्याच्या संपर्कातील नातेवाईक, मित्र तसेच अन्य नागरिकांची यादी करवून घेणे गरजेचे असताना ती व्यवस्थित केली जात नसल्याचे चित्र आहे. या रुग्णांवर केवळ उपचारापुरतेच लक्ष दिले जात आहे किंवा त्यांच्या कुटुंबियांची वा शेजाऱ्यांची थर्मल तपासणी केली जाते. यापलिकडे त्यांचा स्वॅब घेणे, आदी नियमांची कार्यवाही होतच नसल्याचे गंभीर चित्र जळगावात दिसत असून काही जागरूक नागरिक मात्र स्वत:हून शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या वसतीगृहात रॅपिड अ‍ॅण्टीजन टेस्टसाठी जातात. जिल्हा रुग्णालयात कोरोनाचे गंभीर रुग्ण उपचार घेत असतात, त्या वॉर्डमध्ये नातेवाईक फिरत असतात.समिती आली, गेली..पुढे काय?काही दिवसांपूर्वीच केंद्रीय समितीने जळगावचा दौरा केला, तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील काही नातेवाईकांना रुग्णाची स्थिती, उपचारपध्दती, सेवा याबाबत दूरध्वनीव्दारे विचारणा करण्यात आली होती. यावेळी अनेक रुग्णांनी सेवेतील त्रुटी सांगितल्या होत्या. मात्र अजूनही त्यात काही सुधारणा झाली नसल्याचे दिसून येते.कोरोनाच्या गंभीर रुग्णांबाबतीत राहणाºया त्रुटी- रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कातील नागरिकांचे हायरिस्क, लो रिस्क वर्गीकरण करून त्यांचा स्वॅब घेणे गरजेचे असते. मात्र तसे होताना दिसत नाही.-जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर केसपेपरवर आधारकार्डचाच पत्ता ग्राह्य मानला जातो. अनेकवेळा रुग्णाचा आधारकार्डवरील पत्ता एक तर सध्याचा वास्तव्याचा पत्ता दुसरा असतो. अशावेळी रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर संबंधित घर सील करणे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे आदीकडे लक्षच पुरवले जात नाही. केवळ रुग्णांवर उपचार करण्यापुरतेच आरोग्य यंत्रणा कार्यवाही करते.-सौम्य, अतिसौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना भेटण्यासही दिले जात नाही तर दुसरीकडे गंभीर रुग्णांना भेटण्यासाठी नातेवाईकांना खुलेआम प्रवेश दिला जातो. त्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढण्याचीच शक्यता जास्त राहते.कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर त्याच्या संपर्कातील नागरिकांची यादी बनवण्याचे काम नेमून दिलेल्या कर्मचाºयांकडे सोपवण्यात आले आहे आणि ही यंत्रणा शहरापासून ते अगदी ग्रामीण भागापर्यंत कार्यरत आहे. संपर्कातील नागरिकांचा शोध घेणे, त्यांचा स्वॅब घेणे, उपचाराकडे लक्ष देणे आदी कामे या यंत्रणेमार्फत केली जातात. यासाठी नेमके किती कर्मचारी नियुक्त करण्यात आले, हे लगेचच सांगता येणार नाही. परंतु, ज्या ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण आढळतो, त्या त्या ठिकाणी आरोग्य विभागाची ही यंत्रणा पोहोचतेच.-डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, जळगाव

टॅग्स :Medicalवैद्यकीयJalgaonजळगाव