शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेण्यात अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 13:31 IST

जळगाव : एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे कोरोनाची गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णाच्या ‘कॉण्टॅक्ट ट्रेसिंग’कडे म्हणजेच त्यांच्या संपर्कात आलेल्या ...

जळगाव : एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे कोरोनाची गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णाच्या ‘कॉण्टॅक्ट ट्रेसिंग’कडे म्हणजेच त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्यात प्रशासन हतबल ठरत असल्याचे चित्र जळगावात पहायला मिळत आहे. अनेक रुग्णांना त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या नागरिकांबाबत साधी विचारणाही केली जात नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.शहरापासून ते अगदी ग्रामीण भागापर्यंत कोरोनाचा रुग्ण आढळला तर त्याच्या संपर्कात असलेल्या नातेवाईक वा मित्रपरिवार तसेच कार्यालयीन सहकारी यांचा शोध घेऊन त्यांची कोरोना चाचणी पूर्वी केली जात होती. त्यासाठी आरोग्य यंत्रणेने काही कर्मचाऱ्यांची नियुक्तीही केली होती. मात्र आता कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे तेही व्यवस्थित होत नसल्याचे दिसून येत आहे.प्रशासन एकीकडे वाढती गर्दी, नागरिकांचा बेफिकीरपणा आदी सबब सांगून कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला नागरिकांना जबाबदार धरत असले तरीही प्रशासनही अनेक पातळीवर अपयशी ठरत असल्याचेच यामुळे दिसून येत आहे. रुग्ण पॉझिटीव्ह आढळल्यानंतर त्याला त्याच्या घरचा पत्ता, त्याच्या संपर्कातील नातेवाईक, मित्र तसेच अन्य नागरिकांची यादी करवून घेणे गरजेचे असताना ती व्यवस्थित केली जात नसल्याचे चित्र आहे. या रुग्णांवर केवळ उपचारापुरतेच लक्ष दिले जात आहे किंवा त्यांच्या कुटुंबियांची वा शेजाऱ्यांची थर्मल तपासणी केली जाते. यापलिकडे त्यांचा स्वॅब घेणे, आदी नियमांची कार्यवाही होतच नसल्याचे गंभीर चित्र जळगावात दिसत असून काही जागरूक नागरिक मात्र स्वत:हून शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या वसतीगृहात रॅपिड अ‍ॅण्टीजन टेस्टसाठी जातात. जिल्हा रुग्णालयात कोरोनाचे गंभीर रुग्ण उपचार घेत असतात, त्या वॉर्डमध्ये नातेवाईक फिरत असतात.समिती आली, गेली..पुढे काय?काही दिवसांपूर्वीच केंद्रीय समितीने जळगावचा दौरा केला, तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील काही नातेवाईकांना रुग्णाची स्थिती, उपचारपध्दती, सेवा याबाबत दूरध्वनीव्दारे विचारणा करण्यात आली होती. यावेळी अनेक रुग्णांनी सेवेतील त्रुटी सांगितल्या होत्या. मात्र अजूनही त्यात काही सुधारणा झाली नसल्याचे दिसून येते.कोरोनाच्या गंभीर रुग्णांबाबतीत राहणाºया त्रुटी- रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कातील नागरिकांचे हायरिस्क, लो रिस्क वर्गीकरण करून त्यांचा स्वॅब घेणे गरजेचे असते. मात्र तसे होताना दिसत नाही.-जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर केसपेपरवर आधारकार्डचाच पत्ता ग्राह्य मानला जातो. अनेकवेळा रुग्णाचा आधारकार्डवरील पत्ता एक तर सध्याचा वास्तव्याचा पत्ता दुसरा असतो. अशावेळी रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर संबंधित घर सील करणे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे आदीकडे लक्षच पुरवले जात नाही. केवळ रुग्णांवर उपचार करण्यापुरतेच आरोग्य यंत्रणा कार्यवाही करते.-सौम्य, अतिसौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना भेटण्यासही दिले जात नाही तर दुसरीकडे गंभीर रुग्णांना भेटण्यासाठी नातेवाईकांना खुलेआम प्रवेश दिला जातो. त्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढण्याचीच शक्यता जास्त राहते.कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर त्याच्या संपर्कातील नागरिकांची यादी बनवण्याचे काम नेमून दिलेल्या कर्मचाºयांकडे सोपवण्यात आले आहे आणि ही यंत्रणा शहरापासून ते अगदी ग्रामीण भागापर्यंत कार्यरत आहे. संपर्कातील नागरिकांचा शोध घेणे, त्यांचा स्वॅब घेणे, उपचाराकडे लक्ष देणे आदी कामे या यंत्रणेमार्फत केली जातात. यासाठी नेमके किती कर्मचारी नियुक्त करण्यात आले, हे लगेचच सांगता येणार नाही. परंतु, ज्या ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण आढळतो, त्या त्या ठिकाणी आरोग्य विभागाची ही यंत्रणा पोहोचतेच.-डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, जळगाव

टॅग्स :Medicalवैद्यकीयJalgaonजळगाव