शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

उपयोगिता प्रमाणपत्र नसल्याने फडणवीस सरकारवर गैरव्यवहाराचा ठपका - एकनाथराव खडसे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 23:55 IST

पक्षांतराबाबत घुमजाव

जळगाव : देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात ६५ हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवला जात असला तरी त्या खर्चा$बाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र अद्याप सादर होणे बाकी आहे. त्यामुळे तो गैरव्यवहार म्हणता येणार नाही, असा दावा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केला आहे. फडणवीस सरकारच्या काळातच खडसे यांच्यावर वेगवेगळे आरोप झाल्याने त्यांना मंत्रीपद गमवावे लागले होते. आता मात्र फडणवीस यांच्याबाबत खुद्द खडसे यांनी सकारात्मक व्यक्त केले आहे.रविवारी मुक्ताईनगर येथे त्यांच्या निवासस्थानी एकनाथराव खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी खडसेंनी उद्धव ठाकरे सरकारने केलेली कर्जमाफी, पक्षांतराची चर्चा या विषयांवरही भूमिका मांडली.देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात ६५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याच्या आरोपावरून सध्या मोठी खळबळ उडाली आहे. या बाबत खडसे म्हणाले की, कॅगचे परीक्षण ही दरवर्षी निरंतर होणारी प्रक्रिया आहे. हा विषय काही फक्त फडणवीस सरकारपुरता मर्यादीत नाही. काँग्रेसच्या काळातही असे प्राथमिक अहवाल आले आहेत. सरकारने केलेल्या खर्चाबाबत उपयोगिता प्रमाणपत्र सादर करावी लागतात. जर फडणवीस सरकारने ६५ हजार कोटी रुपयांच्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे सादर केली तर त्यात गैरव्यवहार झाल्याचे म्हणता येणार नाही. मात्र, आजमितीला त्यांनी ही प्रमाणपत्रे सादर केलेली नसल्याने लेखापरीक्षकांनी ठपका ठेवला आहे.शेतकऱ्यांना दिलासा-महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीच्या घोषणेबाबत ते म्हणाले की, या कर्जमाफीचे निकष अद्याप स्पष्ट नसले तरी शेतकºयांना दिलासा मिळणार आहे. या बाबत काय निकष असतील, हे माहिती नसल्याने कर्जमाफीच्या मुद्यावर अधिक बोलणे योग्य ठरणार नाही, असे खडसे म्हणाले.पक्षांतराबाबत घुमजावआपल्याला त्रास देणाºयांवर कारवाई झाली नाही तर आपण लवकरच पक्षांतर करू, अशी भूमिका खडसे यांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केली होती. मात्र, रविवारी त्यांनी पक्षांतराच्या विषयावर घुमजाव केले. माझ्या पक्षांतर करण्याच्या बातम्या चुकीच्या असून आपला तसा निर्णय झाला नसल्याचे सांगत त्यांनी याबाबत अधिक बोलणे टाळले.

टॅग्स :Jalgaonजळगाव