शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

उपयोगिता प्रमाणपत्र नसल्याने फडणवीस सरकारवर गैरव्यवहाराचा ठपका - एकनाथराव खडसे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 23:55 IST

पक्षांतराबाबत घुमजाव

जळगाव : देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात ६५ हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवला जात असला तरी त्या खर्चा$बाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र अद्याप सादर होणे बाकी आहे. त्यामुळे तो गैरव्यवहार म्हणता येणार नाही, असा दावा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केला आहे. फडणवीस सरकारच्या काळातच खडसे यांच्यावर वेगवेगळे आरोप झाल्याने त्यांना मंत्रीपद गमवावे लागले होते. आता मात्र फडणवीस यांच्याबाबत खुद्द खडसे यांनी सकारात्मक व्यक्त केले आहे.रविवारी मुक्ताईनगर येथे त्यांच्या निवासस्थानी एकनाथराव खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी खडसेंनी उद्धव ठाकरे सरकारने केलेली कर्जमाफी, पक्षांतराची चर्चा या विषयांवरही भूमिका मांडली.देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात ६५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याच्या आरोपावरून सध्या मोठी खळबळ उडाली आहे. या बाबत खडसे म्हणाले की, कॅगचे परीक्षण ही दरवर्षी निरंतर होणारी प्रक्रिया आहे. हा विषय काही फक्त फडणवीस सरकारपुरता मर्यादीत नाही. काँग्रेसच्या काळातही असे प्राथमिक अहवाल आले आहेत. सरकारने केलेल्या खर्चाबाबत उपयोगिता प्रमाणपत्र सादर करावी लागतात. जर फडणवीस सरकारने ६५ हजार कोटी रुपयांच्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे सादर केली तर त्यात गैरव्यवहार झाल्याचे म्हणता येणार नाही. मात्र, आजमितीला त्यांनी ही प्रमाणपत्रे सादर केलेली नसल्याने लेखापरीक्षकांनी ठपका ठेवला आहे.शेतकऱ्यांना दिलासा-महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीच्या घोषणेबाबत ते म्हणाले की, या कर्जमाफीचे निकष अद्याप स्पष्ट नसले तरी शेतकºयांना दिलासा मिळणार आहे. या बाबत काय निकष असतील, हे माहिती नसल्याने कर्जमाफीच्या मुद्यावर अधिक बोलणे योग्य ठरणार नाही, असे खडसे म्हणाले.पक्षांतराबाबत घुमजावआपल्याला त्रास देणाºयांवर कारवाई झाली नाही तर आपण लवकरच पक्षांतर करू, अशी भूमिका खडसे यांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केली होती. मात्र, रविवारी त्यांनी पक्षांतराच्या विषयावर घुमजाव केले. माझ्या पक्षांतर करण्याच्या बातम्या चुकीच्या असून आपला तसा निर्णय झाला नसल्याचे सांगत त्यांनी याबाबत अधिक बोलणे टाळले.

टॅग्स :Jalgaonजळगाव