शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
2
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
4
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
5
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
6
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
7
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
8
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
9
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
10
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
11
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
12
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
13
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
14
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
15
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
16
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
17
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
18
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
19
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...

..अमृत पाणीपुरवठा योजनेला सहा महिन्यांची मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:12 IST

जळगाव : शहरात गेल्या तीन वर्षांपासून अमृत योजने अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेला राज्य शासनाने ६ महिन्यांची मुदतवाढ ...

जळगाव : शहरात गेल्या तीन वर्षांपासून अमृत योजने अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेला राज्य शासनाने ६ महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत काम थांबवू नका अशा सूचनादेखील आता राज्य शासनाने दिले आहे. पाणीपुरवठा योजनेला राज्य शासनाकडून आतापर्यंत ही तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. अमृत योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून दिवाळीपर्यंत जळगावकरांना अमृतचे पाणी मिळण्याची शक्यता आहे.

केंद्र शासनाच्या अमृत अभियानांतर्गत गेल्या तीन वर्षांपासून शहरात पाणीपुरवठा याेजनेचे काम हाती घेण्यात घेण्यात आले आहे. मार्च २०१७ मध्ये या कामाला सुरुवात झाली होती. नोव्हेंबर २०१९ पर्यंत या योजनेचे काम होणे अपेक्षित होते. मात्र ठेकेदार, मनपा प्रशासन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे हे काम लांबतच गेले. तीन वेळा मुदतवाढीनंतरही याेजनेचे काम पूर्ण हाेऊ शकलेले नाही. राज्य शासनाने काम पूर्णत्वासाठी मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली हाेती. मात्र, काेराेना काळामुळे कामाला उशीर झाल्याने राज्य शासनाने सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. यासंदर्भातील पत्र महापालिकेला नुकतेच प्राप्त झाले आहे. त्यात राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या आवश्यकतेनुसार सहा ते नऊ महिने मुदतवाढ देण्याची सूचना केली आहे. जळगाव महापालिकेसाठी सहा महिन्यांची मुदतवाढ निश्चित केली आहे. याेजनेचे काम तातडीने पूर्ण करावे. कामात काेणत्याही कारणांमुळे व्यत्यय येऊ नये, असेही म्हटले आहे.

जलवाहिनीचे काम पूर्ण, नळ संयोजनाचे कामाला सुरुवात

अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम तीन टप्प्यात पूर्ण होणार आहे. यामध्ये जलवाहिनीचे काम आतापर्यंत ९५ टक्के पूर्ण झाले आहे. तर पाण्याच्या टाक्यांचे काम देखील ७० टक्के पूर्ण झाले असून, आता पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जळगावकरांना पाणी उपलब्ध व्हावे यासाठी योजनाच्या कामाला ठेकेदाराकडून सुरुवात करण्यात आली आहे. जलवाहिनींना जाेडणीसाठी आवश्यक असलेले डीआय पाईपांचा पुरवठा न झाल्याने काम रखडले आहे. दरम्यान, मुंबई येथील बैठकीत डीआय पाईपांचा मजीप्रने पुरवठा करावा असे आदेश दिले आहेत. शहरातील निमखेडी व अयाेध्या नगरातील जलकुंभाचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर सुप्रीम काॅलनी, मेहरूण, गेंदालाल मिलमधील जलकुंभाचे काम पूर्ण झाले आहे. नित्यानंद नगरसह अन्य जलकुंभाचे काँक्रीटचे काम सुरू आहे.

वॉटर मीटरचा प्रश्न मात्र प्रलंबितच

अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असले तरी, जळगावकरांना २४ तास पाणीपुरवठा करताना वॉटर मीटर आवश्यकताच राहणार आहेत. मात्र याबाबत अजूनही मनपा प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली सुरू झालेल्या नाहीत. एका खासगी कंपनीकडून हे काम करून घेण्यात येणार होते. यासाठी मनपाच्या अंदाजपत्रकात देखील ९५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, अजूनही मनपा प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली सुरू झालेल्या नाहीत.