शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

..अमृत पाणीपुरवठा योजनेला सहा महिन्यांची मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:12 IST

जळगाव : शहरात गेल्या तीन वर्षांपासून अमृत योजने अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेला राज्य शासनाने ६ महिन्यांची मुदतवाढ ...

जळगाव : शहरात गेल्या तीन वर्षांपासून अमृत योजने अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेला राज्य शासनाने ६ महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत काम थांबवू नका अशा सूचनादेखील आता राज्य शासनाने दिले आहे. पाणीपुरवठा योजनेला राज्य शासनाकडून आतापर्यंत ही तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. अमृत योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून दिवाळीपर्यंत जळगावकरांना अमृतचे पाणी मिळण्याची शक्यता आहे.

केंद्र शासनाच्या अमृत अभियानांतर्गत गेल्या तीन वर्षांपासून शहरात पाणीपुरवठा याेजनेचे काम हाती घेण्यात घेण्यात आले आहे. मार्च २०१७ मध्ये या कामाला सुरुवात झाली होती. नोव्हेंबर २०१९ पर्यंत या योजनेचे काम होणे अपेक्षित होते. मात्र ठेकेदार, मनपा प्रशासन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे हे काम लांबतच गेले. तीन वेळा मुदतवाढीनंतरही याेजनेचे काम पूर्ण हाेऊ शकलेले नाही. राज्य शासनाने काम पूर्णत्वासाठी मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली हाेती. मात्र, काेराेना काळामुळे कामाला उशीर झाल्याने राज्य शासनाने सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. यासंदर्भातील पत्र महापालिकेला नुकतेच प्राप्त झाले आहे. त्यात राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या आवश्यकतेनुसार सहा ते नऊ महिने मुदतवाढ देण्याची सूचना केली आहे. जळगाव महापालिकेसाठी सहा महिन्यांची मुदतवाढ निश्चित केली आहे. याेजनेचे काम तातडीने पूर्ण करावे. कामात काेणत्याही कारणांमुळे व्यत्यय येऊ नये, असेही म्हटले आहे.

जलवाहिनीचे काम पूर्ण, नळ संयोजनाचे कामाला सुरुवात

अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम तीन टप्प्यात पूर्ण होणार आहे. यामध्ये जलवाहिनीचे काम आतापर्यंत ९५ टक्के पूर्ण झाले आहे. तर पाण्याच्या टाक्यांचे काम देखील ७० टक्के पूर्ण झाले असून, आता पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जळगावकरांना पाणी उपलब्ध व्हावे यासाठी योजनाच्या कामाला ठेकेदाराकडून सुरुवात करण्यात आली आहे. जलवाहिनींना जाेडणीसाठी आवश्यक असलेले डीआय पाईपांचा पुरवठा न झाल्याने काम रखडले आहे. दरम्यान, मुंबई येथील बैठकीत डीआय पाईपांचा मजीप्रने पुरवठा करावा असे आदेश दिले आहेत. शहरातील निमखेडी व अयाेध्या नगरातील जलकुंभाचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर सुप्रीम काॅलनी, मेहरूण, गेंदालाल मिलमधील जलकुंभाचे काम पूर्ण झाले आहे. नित्यानंद नगरसह अन्य जलकुंभाचे काँक्रीटचे काम सुरू आहे.

वॉटर मीटरचा प्रश्न मात्र प्रलंबितच

अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असले तरी, जळगावकरांना २४ तास पाणीपुरवठा करताना वॉटर मीटर आवश्यकताच राहणार आहेत. मात्र याबाबत अजूनही मनपा प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली सुरू झालेल्या नाहीत. एका खासगी कंपनीकडून हे काम करून घेण्यात येणार होते. यासाठी मनपाच्या अंदाजपत्रकात देखील ९५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, अजूनही मनपा प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली सुरू झालेल्या नाहीत.