शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

..अमृत पाणीपुरवठा योजनेला सहा महिन्यांची मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:12 IST

जळगाव : शहरात गेल्या तीन वर्षांपासून अमृत योजने अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेला राज्य शासनाने ६ महिन्यांची मुदतवाढ ...

जळगाव : शहरात गेल्या तीन वर्षांपासून अमृत योजने अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेला राज्य शासनाने ६ महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत काम थांबवू नका अशा सूचनादेखील आता राज्य शासनाने दिले आहे. पाणीपुरवठा योजनेला राज्य शासनाकडून आतापर्यंत ही तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. अमृत योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून दिवाळीपर्यंत जळगावकरांना अमृतचे पाणी मिळण्याची शक्यता आहे.

केंद्र शासनाच्या अमृत अभियानांतर्गत गेल्या तीन वर्षांपासून शहरात पाणीपुरवठा याेजनेचे काम हाती घेण्यात घेण्यात आले आहे. मार्च २०१७ मध्ये या कामाला सुरुवात झाली होती. नोव्हेंबर २०१९ पर्यंत या योजनेचे काम होणे अपेक्षित होते. मात्र ठेकेदार, मनपा प्रशासन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे हे काम लांबतच गेले. तीन वेळा मुदतवाढीनंतरही याेजनेचे काम पूर्ण हाेऊ शकलेले नाही. राज्य शासनाने काम पूर्णत्वासाठी मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली हाेती. मात्र, काेराेना काळामुळे कामाला उशीर झाल्याने राज्य शासनाने सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. यासंदर्भातील पत्र महापालिकेला नुकतेच प्राप्त झाले आहे. त्यात राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या आवश्यकतेनुसार सहा ते नऊ महिने मुदतवाढ देण्याची सूचना केली आहे. जळगाव महापालिकेसाठी सहा महिन्यांची मुदतवाढ निश्चित केली आहे. याेजनेचे काम तातडीने पूर्ण करावे. कामात काेणत्याही कारणांमुळे व्यत्यय येऊ नये, असेही म्हटले आहे.

जलवाहिनीचे काम पूर्ण, नळ संयोजनाचे कामाला सुरुवात

अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम तीन टप्प्यात पूर्ण होणार आहे. यामध्ये जलवाहिनीचे काम आतापर्यंत ९५ टक्के पूर्ण झाले आहे. तर पाण्याच्या टाक्यांचे काम देखील ७० टक्के पूर्ण झाले असून, आता पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जळगावकरांना पाणी उपलब्ध व्हावे यासाठी योजनाच्या कामाला ठेकेदाराकडून सुरुवात करण्यात आली आहे. जलवाहिनींना जाेडणीसाठी आवश्यक असलेले डीआय पाईपांचा पुरवठा न झाल्याने काम रखडले आहे. दरम्यान, मुंबई येथील बैठकीत डीआय पाईपांचा मजीप्रने पुरवठा करावा असे आदेश दिले आहेत. शहरातील निमखेडी व अयाेध्या नगरातील जलकुंभाचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर सुप्रीम काॅलनी, मेहरूण, गेंदालाल मिलमधील जलकुंभाचे काम पूर्ण झाले आहे. नित्यानंद नगरसह अन्य जलकुंभाचे काँक्रीटचे काम सुरू आहे.

वॉटर मीटरचा प्रश्न मात्र प्रलंबितच

अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असले तरी, जळगावकरांना २४ तास पाणीपुरवठा करताना वॉटर मीटर आवश्यकताच राहणार आहेत. मात्र याबाबत अजूनही मनपा प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली सुरू झालेल्या नाहीत. एका खासगी कंपनीकडून हे काम करून घेण्यात येणार होते. यासाठी मनपाच्या अंदाजपत्रकात देखील ९५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, अजूनही मनपा प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली सुरू झालेल्या नाहीत.