शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

..अमृत पाणीपुरवठा योजनेला सहा महिन्यांची मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:12 IST

जळगाव : शहरात गेल्या तीन वर्षांपासून अमृत योजने अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेला राज्य शासनाने ६ महिन्यांची मुदतवाढ ...

जळगाव : शहरात गेल्या तीन वर्षांपासून अमृत योजने अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेला राज्य शासनाने ६ महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत काम थांबवू नका अशा सूचनादेखील आता राज्य शासनाने दिले आहे. पाणीपुरवठा योजनेला राज्य शासनाकडून आतापर्यंत ही तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. अमृत योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून दिवाळीपर्यंत जळगावकरांना अमृतचे पाणी मिळण्याची शक्यता आहे.

केंद्र शासनाच्या अमृत अभियानांतर्गत गेल्या तीन वर्षांपासून शहरात पाणीपुरवठा याेजनेचे काम हाती घेण्यात घेण्यात आले आहे. मार्च २०१७ मध्ये या कामाला सुरुवात झाली होती. नोव्हेंबर २०१९ पर्यंत या योजनेचे काम होणे अपेक्षित होते. मात्र ठेकेदार, मनपा प्रशासन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे हे काम लांबतच गेले. तीन वेळा मुदतवाढीनंतरही याेजनेचे काम पूर्ण हाेऊ शकलेले नाही. राज्य शासनाने काम पूर्णत्वासाठी मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली हाेती. मात्र, काेराेना काळामुळे कामाला उशीर झाल्याने राज्य शासनाने सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. यासंदर्भातील पत्र महापालिकेला नुकतेच प्राप्त झाले आहे. त्यात राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या आवश्यकतेनुसार सहा ते नऊ महिने मुदतवाढ देण्याची सूचना केली आहे. जळगाव महापालिकेसाठी सहा महिन्यांची मुदतवाढ निश्चित केली आहे. याेजनेचे काम तातडीने पूर्ण करावे. कामात काेणत्याही कारणांमुळे व्यत्यय येऊ नये, असेही म्हटले आहे.

जलवाहिनीचे काम पूर्ण, नळ संयोजनाचे कामाला सुरुवात

अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम तीन टप्प्यात पूर्ण होणार आहे. यामध्ये जलवाहिनीचे काम आतापर्यंत ९५ टक्के पूर्ण झाले आहे. तर पाण्याच्या टाक्यांचे काम देखील ७० टक्के पूर्ण झाले असून, आता पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जळगावकरांना पाणी उपलब्ध व्हावे यासाठी योजनाच्या कामाला ठेकेदाराकडून सुरुवात करण्यात आली आहे. जलवाहिनींना जाेडणीसाठी आवश्यक असलेले डीआय पाईपांचा पुरवठा न झाल्याने काम रखडले आहे. दरम्यान, मुंबई येथील बैठकीत डीआय पाईपांचा मजीप्रने पुरवठा करावा असे आदेश दिले आहेत. शहरातील निमखेडी व अयाेध्या नगरातील जलकुंभाचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर सुप्रीम काॅलनी, मेहरूण, गेंदालाल मिलमधील जलकुंभाचे काम पूर्ण झाले आहे. नित्यानंद नगरसह अन्य जलकुंभाचे काँक्रीटचे काम सुरू आहे.

वॉटर मीटरचा प्रश्न मात्र प्रलंबितच

अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असले तरी, जळगावकरांना २४ तास पाणीपुरवठा करताना वॉटर मीटर आवश्यकताच राहणार आहेत. मात्र याबाबत अजूनही मनपा प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली सुरू झालेल्या नाहीत. एका खासगी कंपनीकडून हे काम करून घेण्यात येणार होते. यासाठी मनपाच्या अंदाजपत्रकात देखील ९५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, अजूनही मनपा प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली सुरू झालेल्या नाहीत.