शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

भारतीय कंटेनर महामंडळाकडून माल स्वीकारण्यास मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 13:00 IST

उद्योजकांना दिलासा : ३० मेपर्यंत सुरू राहणार आयात-निर्यात

जळगाव : आयात-निर्यातीसाठी कंटेनर स्वीकारण्यास नकार देणाऱ्या भारतीय कंटेनर महामंडळाच्या भुसावळ येथील आगाराने आता उद्योजकांकडून कंटेनर स्वीकारण्यास पुन्हा मुदतवाढ दिली आहे. ३० मेपर्यंत कंटेनर पाठवावे, असे आगाराच्यावतीने उद्योजकांना कळविण्यात आले आहे. यापूर्वी १५ मेपर्यंत ही मुदत देण्यात आली होती.खान्देशातील आयात-निर्यातदारांना मोठा आधार असलेल्या भुसावळ येथील भारतीय कंटेनर महामंडळाच्या आगारातून केळी, डाळ, मसाले, फळांचा रस, निर्जलीकरण केलेला कांदा व इतर बरेच पदार्थ ३० ते ३५ देशात निर्यात केले जातात. सोबतच विदेशातून आयात होणाºया वस्तू मुंबई येथे न येता थेट जिल्ह्यात येतात. मात्र भारतीय कंटेनर महामंडळाने अचानक भुसावळ येथील हे आगार बंद करण्याचा निर्णय घेतला. रेल्वेने जागेचे भाडे वाढविल्याने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र याचा जिल्ह्यातील उद्योगांना मोठा फटका बसत आहे.दहा दिवसांपूर्वी कंटेनर स्वीकारणे पूर्णपणे बंद केले होते. या संदर्भात ‘लोकमत’ने ७ मे रोजी ‘भारतीय कंटेनर महामंडळाकडून माल स्वीकारण्यास नकार’ या मथळ््याखाली वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर महामंडळातर्फे उद्योजकांशी संपर्क साधून १५ मेपर्यंत कंटेनर पाठवावे, असे कळविण्यात आले. यामध्ये ८ मेपासून कंटेनर पाठविण्यास सुरुवात झाली. १५ मेपर्यंत कंटेनर स्वीकारले गेले. त्यानंतर आता पुन्हा महामंडळाच्या भुसावळ येथील आगाराच्यावतीने ३० मेपर्यंत कंटेनर स्वीकारण्याची तयारी दर्शविली आहे. त्यानुसार आगाराने उद्योजकांनाही कळविले.कंटेनर महामंडळाच्यावतीने ३० मेपर्यंत कंटेनर स्वीकारले जातील, असे सांगण्यात आले आहे. त्यानुसार आता तेथे कंटेनर पाठविले जातील.- प्रेम कोगटा, अध्यक्ष, जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशन, जळगाव

टॅग्स :businessव्यवसायJalgaonजळगाव