शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

भारतीय कंटेनर महामंडळाकडून माल स्वीकारण्यास मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 13:00 IST

उद्योजकांना दिलासा : ३० मेपर्यंत सुरू राहणार आयात-निर्यात

जळगाव : आयात-निर्यातीसाठी कंटेनर स्वीकारण्यास नकार देणाऱ्या भारतीय कंटेनर महामंडळाच्या भुसावळ येथील आगाराने आता उद्योजकांकडून कंटेनर स्वीकारण्यास पुन्हा मुदतवाढ दिली आहे. ३० मेपर्यंत कंटेनर पाठवावे, असे आगाराच्यावतीने उद्योजकांना कळविण्यात आले आहे. यापूर्वी १५ मेपर्यंत ही मुदत देण्यात आली होती.खान्देशातील आयात-निर्यातदारांना मोठा आधार असलेल्या भुसावळ येथील भारतीय कंटेनर महामंडळाच्या आगारातून केळी, डाळ, मसाले, फळांचा रस, निर्जलीकरण केलेला कांदा व इतर बरेच पदार्थ ३० ते ३५ देशात निर्यात केले जातात. सोबतच विदेशातून आयात होणाºया वस्तू मुंबई येथे न येता थेट जिल्ह्यात येतात. मात्र भारतीय कंटेनर महामंडळाने अचानक भुसावळ येथील हे आगार बंद करण्याचा निर्णय घेतला. रेल्वेने जागेचे भाडे वाढविल्याने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र याचा जिल्ह्यातील उद्योगांना मोठा फटका बसत आहे.दहा दिवसांपूर्वी कंटेनर स्वीकारणे पूर्णपणे बंद केले होते. या संदर्भात ‘लोकमत’ने ७ मे रोजी ‘भारतीय कंटेनर महामंडळाकडून माल स्वीकारण्यास नकार’ या मथळ््याखाली वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर महामंडळातर्फे उद्योजकांशी संपर्क साधून १५ मेपर्यंत कंटेनर पाठवावे, असे कळविण्यात आले. यामध्ये ८ मेपासून कंटेनर पाठविण्यास सुरुवात झाली. १५ मेपर्यंत कंटेनर स्वीकारले गेले. त्यानंतर आता पुन्हा महामंडळाच्या भुसावळ येथील आगाराच्यावतीने ३० मेपर्यंत कंटेनर स्वीकारण्याची तयारी दर्शविली आहे. त्यानुसार आगाराने उद्योजकांनाही कळविले.कंटेनर महामंडळाच्यावतीने ३० मेपर्यंत कंटेनर स्वीकारले जातील, असे सांगण्यात आले आहे. त्यानुसार आता तेथे कंटेनर पाठविले जातील.- प्रेम कोगटा, अध्यक्ष, जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशन, जळगाव

टॅग्स :businessव्यवसायJalgaonजळगाव