शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

दाम्पत्याच्या खून प्रकरणात कट रचल्याचे कलम वाढविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कुसुंबा येथील पती, पत्नीच्या खून प्रकरणात सामूहिक कट रचला म्हणून १२० ब हे वाढीव ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कुसुंबा येथील पती, पत्नीच्या खून प्रकरणात सामूहिक कट रचला म्हणून १२० ब हे वाढीव कलम लावण्यात आले आहे. दरम्यान, अटकेतील तिघांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

सुधाकर रामलाल पाटील (४०, चिंचखेडा, ता. जामनेर), देविदास नामदेव पाटील (४०) व अरुणाबाई गजानन वारंगणे (३०, रा. कुसुंबा, ता. जळगाव) या तिघांनी मुरलीधर राजाराम पाटील व त्यांची पत्नी आशाबाई मुरलीधर पाटील या दाम्पत्याच्या खून केला आहे. २१ एप्रिल रोजी रात्री ही घटना घडली होती.

अरुणाबाई हिने आशाबाईकडून १२ लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्याशिवाय सुधाकर व देविदास हेदेखील कर्जबाजारी होते. त्यातून सुटका मिळण्यासाठी त्यांनी या खुनाचा कट रचला होता. त्यामुळे यात कट रचल्याचे वाढीव कलम लावण्यात आले आहे. हा गुन्हा करताना संशयितांनी ज्या दोरीचा वापर केलेला आहे ती दोरी जप्त करणे बाकी आहे, त्याशिवाय दाम्पत्याचे दोन्ही मोबाइल चोरून जंगलात फेकले आहेत. मोबाइल जप्त करावयाचे असल्याचे सांगून पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी संशयितांना ९ दिवस पोलीस कोठडीची मागणी केली. न्या. साठे यांनी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सरकारतर्फे ॲड. गिरीश बारगजे यांनी काम पाहिले.