शहरं
Join us  
Trending Stories
1
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
2
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
3
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
4
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
5
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
7
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
8
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
9
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
10
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
11
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
12
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
14
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
15
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
16
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
17
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
18
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
19
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
20
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च

महामार्ग चौपदरीकरणाच्या कार्यादेशापूर्वीच भूमीपूजनाची घाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 12:58 IST

१९ रोजी भूमीपूजन

जळगाव : राष्टÑीय महामार्ग क्र.५३च्या (जुना राष्ट्रीय महामार्ग क्र.६) च्या शहरातील ८ किमी लांबीच्या चौपदरीकरण कामाचे कार्यादेश संबंधित कंपनीला देणे बाकी असतानाही १९ जुलै रोजी या कामाचे भूमीपूजन केले जाणार आहे. कंपनीशी केवळ करार झालेला असताना अपघातांमुळे व शहरातील रस्त्यांच्या दूरवस्थेमुळे नागरिकांमध्ये सध्या निर्माण झालेला रोष शमविण्यासाठी भूमीपूजनाची घाई केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. या भूमीपूजनासाठी आमदार सुरेश भोळे हे आग्रही असल्याचेही सांगितले जात आहे.शहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्ग क्र.५३ (जुना राष्ट्रीय महामार्ग क्र.६)च्या ८ किमी लांबीचे चौपदरीकरण करणे व ३ चौकांमध्ये व्हेईकल अंडरपास (वाहनांसाठी भुयारी मार्ग) व १ पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग या कामासाठी ई-निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार निविदा मिळाल्यानंतर गुडगाव येथील जेसीसी या कंपनीला हे काम हे देण्याचे निश्चित करण्यात आले.केवळ करारनिविदा निश्चित झाल्यानंतर जेसीसी या कंपनीशी केवळ करार झाला आहे. मात्र कंपनीला अद्याप कार्यादेश दिलेले नाही, अशी माहिती ‘नही’च्या अधिकाºयांकडून मिळाली. या कामाचे अद्याप कार्यादेशच दिलेले नसल्याचेही सांगण्यात आले.भूमीपूजनासाठी घाईशहरातून जाणाºया या महामार्गावर दररोज अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. त्यामुळे या महामार्गासह समांतर रस्त्यासाठी वेगवेगळे आंदोलन झाले. प्रशासनावर अनेकांनी रोषही व्यक्त केला. त्यानंतर या कामांचा कित्येक दिवस डीपीआर तयार झाला नाही, तो झाला तरी निविदांमध्ये बदल झाले. गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळे घोळ असताना तसेच शहरवासीयांची नाराजी असताना एवढी तत्परता कधीही दाखविली गेली नाही. आता कार्यादेश नसताना भूमीपूजनासाठी घाई का केली जात आहे, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.१९ रोजी पालकमंत्र्यांच्याहस्ते भूमीपूजनया घाईमध्ये महामार्ग चौपदरीकरणाच्या भूमीपूजनाचा मुहूर्तही ठरविण्यात आला असून १९ जुलै रोजी दुपारी १२ वाजता पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते या कामाचे भूमीपूजन करण्यात येणार आहे. याला ‘नही’च्या अधिकाºयांसह खुद्द आमदार सुरेश भोळे यांनीही दुजोरा दिला आहे.रोष शमविण्याचा प्रयत्नचार दिवसांपूर्वी चित्रा चौकात रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघात होऊन उद्योजक अनिल बोरोले यांना जीव गमवावा लागला. त्यानंतर दुसºयाच दिवशी महामार्गाच्या खराब साईडपट्ट्यांमुळे पुन्हा अपघात झाला व उज्ज्वल सोनवणे हा तरुण ठार झाला. खराब रस्त्यामुळे हे बळी गेले असल्याने गेल्या चार दिवसांपासून शहरवासीयांमध्ये प्रचंड रोष आहे. सोबतच अमृत योजनेमुळे रस्त्यांची मोठी दूरवस्था होण्यासह जागोजागी असलेले खड्डे व पावसामुळे होणारा चिखल हेदेखील विषय दोन अपघातांनंतर ऐरणीवर आले आहेत. या संदर्भात सोशल मीडियावरही वेगवेगळ््या चर्चा होऊन याबाबत मोठा संताप व्यक्त केला जात आहे. शहरवासीयांचा हा वाढता रोष शमविण्यासाठी महामार्ग चौपदरीकरण कामाच्या भूमीपूजनाची घाई केली जात असल्याचा आरोप होत आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव