शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ, पावसाळी वातावरणाने महाबळेश्वरची अनुभुती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:31 IST

जळगाव : भर हिवाळ्यातील डिसेंबर महिन्यात ढगाळ वातावरण होऊन झालेल्या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत होण्यासह खरीपातील कापसासह रब्बी पिकांनाही ...

जळगाव : भर हिवाळ्यातील डिसेंबर महिन्यात ढगाळ वातावरण होऊन झालेल्या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत होण्यासह खरीपातील कापसासह रब्बी पिकांनाही मोठा फटका बसला आहे. शनिवारी सकाळपासून असलेल्या ढगाळ वातावरण व दुपारपासून सुरू झालेल्या पावसामुळे जळगावात महाबळेश्वरची अनुभुती शहरवासीयांनी घेतली. अशा वातावरणात गारपिटचे संकट ओढावले तर रब्बी ज्वारीलादेखील मोठा फटका बसण्याची शक्यता असून ढगाळ वातावरणाने हरभऱ्यावर अळींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता बळावली आहे. दरम्यान, १६ डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरणासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यानुसार शनिवारी सकाळपासून शहर व परिसरात ढगाळ वातावरण होते. सकाळी १० ते ११ वाजेदरम्यान पावसाचा शिरकाव झाला. मात्र दुपारी तीन वाजता रिमझिम पावसाला सुरुवात झाली. संध्याकाळी सहा वाजता तर पावसाने जोर धरला व जवळपास पाऊण तास जोरदार पाऊस झाला.

अंगात स्वेटर, वर रेनकोट

ऐन थंडीच्या डिसेंबर महिन्यात असलेल्या ढगा‌ळ वातावरणामुळे थंडी काहीसी कमी झाली. मात्र शनिवारी झालेल्या पावसामुळे गारठा निर्माण झाला. त्यामुळे अनेकांनी थंडीपासून बचावासाठी स्वेटर व इतर उबदार कपडे घातले. मात्र त्यानंतर पावसामुळे त्यावर रेनकोटदेखील घालण्याची वेळ शहरवासीयांवर आली. या सर्व प्रकारामुळे अंगात स्वेटर व त्या वर रेनकोट असे चित्र शहरात पहावयास मिळाले व महाबळेश्वरची अनुभुती शहरवासीयांनी घेतली.

शहरवासीयांची तारांबळ

दुपारी अचानक पाऊस सुरू झाल्याने शहरवासीयांची चांगलीच तारांबळ उडाली. शहरात खरेदीसाठी आलेल्यांनी पावसापासून बचावासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आसरा घेतला. बाजारपेठेत बाहेर ठेवलेले साहित्य काही प्रमाणात ओले झाले. त्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. दुचाकीस्वारांनी तर घराकडे धाव घेतली. यात अनेक जण ओले झाले.

अजून तीन दिवस राहणार असेच वातावरण

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने जिल्ह्यासह इतरही भागातही ढगाळ वातावरण राहण्यासह अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज वर्तविल्यानुसार अजून तीन दिवस म्हणजेच १६ डिसेंबरपर्यंत असेच वातावरण राहण्याची शक्यता आहे.

पिकांना फटका

अगोदरच पावसाळ्यात झालेल्या अतिपावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर मात्र अतिपावसाचा रब्बी पिकांना लाभ होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. त्यानुसार मोठ्या प्रमाणात लागवड झालेल्या रब्बी पिकांना ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. यात कांदा बियाणे नष्ट होत असून हरभरा पिकावर ढगाळ वातावरणामुळे घाटे अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. सध्या गव्हाचे पिक लहान असले तरी शनिवारी झालेल्या पावसाचा त्याच्यावर परिणाम होणार नाही. मात्र जोरदार पाऊस झाल्यास हे पिकदेखील नष्ट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

रब्बी ज्वारीला लाभ, माऊ गारपिट झाल्यास संकट

सध्या होत असलेल्या पावसाचा रब्बी ज्वारीला लाभ होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र गारपिट झाल्यास त्याचा मोठा फटका बसू शकतो, असेही सांगण्यात येत आहे. गारपिटीच्या भीतीने अगोदरच चिंतेत असलेल्या बळीराजाच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे.

कापूस गेला वाया

अवकाळी पावसामुळे शेतात जो काही कापूस शिल्लक आहे, तो ओला होऊन पूर्णपणे वाया गेला आहे. अगोदरच बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कापूस उत्पादकांना फटका बसला. आता शेतात जो काही कापूस शिल्लक असेल, तो काढू या विचारात असलेल्या शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले गेले आहे.

शहरात पुन्हा चिखल

भर पावसाळ्यात शहरवासीयांना चिखलातून मार्ग काढत जाण्याची वेळ आली होती. आता तर शहरातील चिखलाच्या प्रमाणात आणखी भर पडली आहे. शनिवारी झालेल्या पावसामुळे बी.जे. मार्केट परिसर, बालगंधर्व खुले नाट्यगृह, जि.प. परिसर, गिरणा टाकी परिसर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयसमोरील परिसर, नवी पेठे या भागात काहीसी पाणी साचले होते. या सोबतच शहरात ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवले असल्याने शहरभर चिखल झाल्याचे चित्र आहे. या ठिकाणाहून वाहनधारकांना वाहने काढताना चांगलीच कसरत करावी लागली. अनेक जणांच्या दुचाकी तर घसरत होत्या.