शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

ढगाळ, पावसाळी वातावरणाने महाबळेश्वरची अनुभुती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:31 IST

जळगाव : भर हिवाळ्यातील डिसेंबर महिन्यात ढगाळ वातावरण होऊन झालेल्या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत होण्यासह खरीपातील कापसासह रब्बी पिकांनाही ...

जळगाव : भर हिवाळ्यातील डिसेंबर महिन्यात ढगाळ वातावरण होऊन झालेल्या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत होण्यासह खरीपातील कापसासह रब्बी पिकांनाही मोठा फटका बसला आहे. शनिवारी सकाळपासून असलेल्या ढगाळ वातावरण व दुपारपासून सुरू झालेल्या पावसामुळे जळगावात महाबळेश्वरची अनुभुती शहरवासीयांनी घेतली. अशा वातावरणात गारपिटचे संकट ओढावले तर रब्बी ज्वारीलादेखील मोठा फटका बसण्याची शक्यता असून ढगाळ वातावरणाने हरभऱ्यावर अळींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता बळावली आहे. दरम्यान, १६ डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरणासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यानुसार शनिवारी सकाळपासून शहर व परिसरात ढगाळ वातावरण होते. सकाळी १० ते ११ वाजेदरम्यान पावसाचा शिरकाव झाला. मात्र दुपारी तीन वाजता रिमझिम पावसाला सुरुवात झाली. संध्याकाळी सहा वाजता तर पावसाने जोर धरला व जवळपास पाऊण तास जोरदार पाऊस झाला.

अंगात स्वेटर, वर रेनकोट

ऐन थंडीच्या डिसेंबर महिन्यात असलेल्या ढगा‌ळ वातावरणामुळे थंडी काहीसी कमी झाली. मात्र शनिवारी झालेल्या पावसामुळे गारठा निर्माण झाला. त्यामुळे अनेकांनी थंडीपासून बचावासाठी स्वेटर व इतर उबदार कपडे घातले. मात्र त्यानंतर पावसामुळे त्यावर रेनकोटदेखील घालण्याची वेळ शहरवासीयांवर आली. या सर्व प्रकारामुळे अंगात स्वेटर व त्या वर रेनकोट असे चित्र शहरात पहावयास मिळाले व महाबळेश्वरची अनुभुती शहरवासीयांनी घेतली.

शहरवासीयांची तारांबळ

दुपारी अचानक पाऊस सुरू झाल्याने शहरवासीयांची चांगलीच तारांबळ उडाली. शहरात खरेदीसाठी आलेल्यांनी पावसापासून बचावासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आसरा घेतला. बाजारपेठेत बाहेर ठेवलेले साहित्य काही प्रमाणात ओले झाले. त्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. दुचाकीस्वारांनी तर घराकडे धाव घेतली. यात अनेक जण ओले झाले.

अजून तीन दिवस राहणार असेच वातावरण

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने जिल्ह्यासह इतरही भागातही ढगाळ वातावरण राहण्यासह अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज वर्तविल्यानुसार अजून तीन दिवस म्हणजेच १६ डिसेंबरपर्यंत असेच वातावरण राहण्याची शक्यता आहे.

पिकांना फटका

अगोदरच पावसाळ्यात झालेल्या अतिपावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर मात्र अतिपावसाचा रब्बी पिकांना लाभ होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. त्यानुसार मोठ्या प्रमाणात लागवड झालेल्या रब्बी पिकांना ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. यात कांदा बियाणे नष्ट होत असून हरभरा पिकावर ढगाळ वातावरणामुळे घाटे अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. सध्या गव्हाचे पिक लहान असले तरी शनिवारी झालेल्या पावसाचा त्याच्यावर परिणाम होणार नाही. मात्र जोरदार पाऊस झाल्यास हे पिकदेखील नष्ट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

रब्बी ज्वारीला लाभ, माऊ गारपिट झाल्यास संकट

सध्या होत असलेल्या पावसाचा रब्बी ज्वारीला लाभ होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र गारपिट झाल्यास त्याचा मोठा फटका बसू शकतो, असेही सांगण्यात येत आहे. गारपिटीच्या भीतीने अगोदरच चिंतेत असलेल्या बळीराजाच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे.

कापूस गेला वाया

अवकाळी पावसामुळे शेतात जो काही कापूस शिल्लक आहे, तो ओला होऊन पूर्णपणे वाया गेला आहे. अगोदरच बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कापूस उत्पादकांना फटका बसला. आता शेतात जो काही कापूस शिल्लक असेल, तो काढू या विचारात असलेल्या शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले गेले आहे.

शहरात पुन्हा चिखल

भर पावसाळ्यात शहरवासीयांना चिखलातून मार्ग काढत जाण्याची वेळ आली होती. आता तर शहरातील चिखलाच्या प्रमाणात आणखी भर पडली आहे. शनिवारी झालेल्या पावसामुळे बी.जे. मार्केट परिसर, बालगंधर्व खुले नाट्यगृह, जि.प. परिसर, गिरणा टाकी परिसर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयसमोरील परिसर, नवी पेठे या भागात काहीसी पाणी साचले होते. या सोबतच शहरात ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवले असल्याने शहरभर चिखल झाल्याचे चित्र आहे. या ठिकाणाहून वाहनधारकांना वाहने काढताना चांगलीच कसरत करावी लागली. अनेक जणांच्या दुचाकी तर घसरत होत्या.