शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

ढगाळ, पावसाळी वातावरणाने महाबळेश्वरची अनुभुती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:31 IST

जळगाव : भर हिवाळ्यातील डिसेंबर महिन्यात ढगाळ वातावरण होऊन झालेल्या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत होण्यासह खरीपातील कापसासह रब्बी पिकांनाही ...

जळगाव : भर हिवाळ्यातील डिसेंबर महिन्यात ढगाळ वातावरण होऊन झालेल्या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत होण्यासह खरीपातील कापसासह रब्बी पिकांनाही मोठा फटका बसला आहे. शनिवारी सकाळपासून असलेल्या ढगाळ वातावरण व दुपारपासून सुरू झालेल्या पावसामुळे जळगावात महाबळेश्वरची अनुभुती शहरवासीयांनी घेतली. अशा वातावरणात गारपिटचे संकट ओढावले तर रब्बी ज्वारीलादेखील मोठा फटका बसण्याची शक्यता असून ढगाळ वातावरणाने हरभऱ्यावर अळींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता बळावली आहे. दरम्यान, १६ डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरणासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यानुसार शनिवारी सकाळपासून शहर व परिसरात ढगाळ वातावरण होते. सकाळी १० ते ११ वाजेदरम्यान पावसाचा शिरकाव झाला. मात्र दुपारी तीन वाजता रिमझिम पावसाला सुरुवात झाली. संध्याकाळी सहा वाजता तर पावसाने जोर धरला व जवळपास पाऊण तास जोरदार पाऊस झाला.

अंगात स्वेटर, वर रेनकोट

ऐन थंडीच्या डिसेंबर महिन्यात असलेल्या ढगा‌ळ वातावरणामुळे थंडी काहीसी कमी झाली. मात्र शनिवारी झालेल्या पावसामुळे गारठा निर्माण झाला. त्यामुळे अनेकांनी थंडीपासून बचावासाठी स्वेटर व इतर उबदार कपडे घातले. मात्र त्यानंतर पावसामुळे त्यावर रेनकोटदेखील घालण्याची वेळ शहरवासीयांवर आली. या सर्व प्रकारामुळे अंगात स्वेटर व त्या वर रेनकोट असे चित्र शहरात पहावयास मिळाले व महाबळेश्वरची अनुभुती शहरवासीयांनी घेतली.

शहरवासीयांची तारांबळ

दुपारी अचानक पाऊस सुरू झाल्याने शहरवासीयांची चांगलीच तारांबळ उडाली. शहरात खरेदीसाठी आलेल्यांनी पावसापासून बचावासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आसरा घेतला. बाजारपेठेत बाहेर ठेवलेले साहित्य काही प्रमाणात ओले झाले. त्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. दुचाकीस्वारांनी तर घराकडे धाव घेतली. यात अनेक जण ओले झाले.

अजून तीन दिवस राहणार असेच वातावरण

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने जिल्ह्यासह इतरही भागातही ढगाळ वातावरण राहण्यासह अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज वर्तविल्यानुसार अजून तीन दिवस म्हणजेच १६ डिसेंबरपर्यंत असेच वातावरण राहण्याची शक्यता आहे.

पिकांना फटका

अगोदरच पावसाळ्यात झालेल्या अतिपावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर मात्र अतिपावसाचा रब्बी पिकांना लाभ होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. त्यानुसार मोठ्या प्रमाणात लागवड झालेल्या रब्बी पिकांना ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. यात कांदा बियाणे नष्ट होत असून हरभरा पिकावर ढगाळ वातावरणामुळे घाटे अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. सध्या गव्हाचे पिक लहान असले तरी शनिवारी झालेल्या पावसाचा त्याच्यावर परिणाम होणार नाही. मात्र जोरदार पाऊस झाल्यास हे पिकदेखील नष्ट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

रब्बी ज्वारीला लाभ, माऊ गारपिट झाल्यास संकट

सध्या होत असलेल्या पावसाचा रब्बी ज्वारीला लाभ होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र गारपिट झाल्यास त्याचा मोठा फटका बसू शकतो, असेही सांगण्यात येत आहे. गारपिटीच्या भीतीने अगोदरच चिंतेत असलेल्या बळीराजाच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे.

कापूस गेला वाया

अवकाळी पावसामुळे शेतात जो काही कापूस शिल्लक आहे, तो ओला होऊन पूर्णपणे वाया गेला आहे. अगोदरच बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कापूस उत्पादकांना फटका बसला. आता शेतात जो काही कापूस शिल्लक असेल, तो काढू या विचारात असलेल्या शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले गेले आहे.

शहरात पुन्हा चिखल

भर पावसाळ्यात शहरवासीयांना चिखलातून मार्ग काढत जाण्याची वेळ आली होती. आता तर शहरातील चिखलाच्या प्रमाणात आणखी भर पडली आहे. शनिवारी झालेल्या पावसामुळे बी.जे. मार्केट परिसर, बालगंधर्व खुले नाट्यगृह, जि.प. परिसर, गिरणा टाकी परिसर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयसमोरील परिसर, नवी पेठे या भागात काहीसी पाणी साचले होते. या सोबतच शहरात ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवले असल्याने शहरभर चिखल झाल्याचे चित्र आहे. या ठिकाणाहून वाहनधारकांना वाहने काढताना चांगलीच कसरत करावी लागली. अनेक जणांच्या दुचाकी तर घसरत होत्या.