शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ, पावसाळी वातावरणाने महाबळेश्वरची अनुभुती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:31 IST

जळगाव : भर हिवाळ्यातील डिसेंबर महिन्यात ढगाळ वातावरण होऊन झालेल्या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत होण्यासह खरीपातील कापसासह रब्बी पिकांनाही ...

जळगाव : भर हिवाळ्यातील डिसेंबर महिन्यात ढगाळ वातावरण होऊन झालेल्या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत होण्यासह खरीपातील कापसासह रब्बी पिकांनाही मोठा फटका बसला आहे. शनिवारी सकाळपासून असलेल्या ढगाळ वातावरण व दुपारपासून सुरू झालेल्या पावसामुळे जळगावात महाबळेश्वरची अनुभुती शहरवासीयांनी घेतली. अशा वातावरणात गारपिटचे संकट ओढावले तर रब्बी ज्वारीलादेखील मोठा फटका बसण्याची शक्यता असून ढगाळ वातावरणाने हरभऱ्यावर अळींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता बळावली आहे. दरम्यान, १६ डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरणासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यानुसार शनिवारी सकाळपासून शहर व परिसरात ढगाळ वातावरण होते. सकाळी १० ते ११ वाजेदरम्यान पावसाचा शिरकाव झाला. मात्र दुपारी तीन वाजता रिमझिम पावसाला सुरुवात झाली. संध्याकाळी सहा वाजता तर पावसाने जोर धरला व जवळपास पाऊण तास जोरदार पाऊस झाला.

अंगात स्वेटर, वर रेनकोट

ऐन थंडीच्या डिसेंबर महिन्यात असलेल्या ढगा‌ळ वातावरणामुळे थंडी काहीसी कमी झाली. मात्र शनिवारी झालेल्या पावसामुळे गारठा निर्माण झाला. त्यामुळे अनेकांनी थंडीपासून बचावासाठी स्वेटर व इतर उबदार कपडे घातले. मात्र त्यानंतर पावसामुळे त्यावर रेनकोटदेखील घालण्याची वेळ शहरवासीयांवर आली. या सर्व प्रकारामुळे अंगात स्वेटर व त्या वर रेनकोट असे चित्र शहरात पहावयास मिळाले व महाबळेश्वरची अनुभुती शहरवासीयांनी घेतली.

शहरवासीयांची तारांबळ

दुपारी अचानक पाऊस सुरू झाल्याने शहरवासीयांची चांगलीच तारांबळ उडाली. शहरात खरेदीसाठी आलेल्यांनी पावसापासून बचावासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आसरा घेतला. बाजारपेठेत बाहेर ठेवलेले साहित्य काही प्रमाणात ओले झाले. त्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. दुचाकीस्वारांनी तर घराकडे धाव घेतली. यात अनेक जण ओले झाले.

अजून तीन दिवस राहणार असेच वातावरण

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने जिल्ह्यासह इतरही भागातही ढगाळ वातावरण राहण्यासह अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज वर्तविल्यानुसार अजून तीन दिवस म्हणजेच १६ डिसेंबरपर्यंत असेच वातावरण राहण्याची शक्यता आहे.

पिकांना फटका

अगोदरच पावसाळ्यात झालेल्या अतिपावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर मात्र अतिपावसाचा रब्बी पिकांना लाभ होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. त्यानुसार मोठ्या प्रमाणात लागवड झालेल्या रब्बी पिकांना ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. यात कांदा बियाणे नष्ट होत असून हरभरा पिकावर ढगाळ वातावरणामुळे घाटे अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. सध्या गव्हाचे पिक लहान असले तरी शनिवारी झालेल्या पावसाचा त्याच्यावर परिणाम होणार नाही. मात्र जोरदार पाऊस झाल्यास हे पिकदेखील नष्ट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

रब्बी ज्वारीला लाभ, माऊ गारपिट झाल्यास संकट

सध्या होत असलेल्या पावसाचा रब्बी ज्वारीला लाभ होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र गारपिट झाल्यास त्याचा मोठा फटका बसू शकतो, असेही सांगण्यात येत आहे. गारपिटीच्या भीतीने अगोदरच चिंतेत असलेल्या बळीराजाच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे.

कापूस गेला वाया

अवकाळी पावसामुळे शेतात जो काही कापूस शिल्लक आहे, तो ओला होऊन पूर्णपणे वाया गेला आहे. अगोदरच बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कापूस उत्पादकांना फटका बसला. आता शेतात जो काही कापूस शिल्लक असेल, तो काढू या विचारात असलेल्या शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले गेले आहे.

शहरात पुन्हा चिखल

भर पावसाळ्यात शहरवासीयांना चिखलातून मार्ग काढत जाण्याची वेळ आली होती. आता तर शहरातील चिखलाच्या प्रमाणात आणखी भर पडली आहे. शनिवारी झालेल्या पावसामुळे बी.जे. मार्केट परिसर, बालगंधर्व खुले नाट्यगृह, जि.प. परिसर, गिरणा टाकी परिसर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयसमोरील परिसर, नवी पेठे या भागात काहीसी पाणी साचले होते. या सोबतच शहरात ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवले असल्याने शहरभर चिखल झाल्याचे चित्र आहे. या ठिकाणाहून वाहनधारकांना वाहने काढताना चांगलीच कसरत करावी लागली. अनेक जणांच्या दुचाकी तर घसरत होत्या.