शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

उत्साह, प्रत्येक ठिकाणी वेगळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 16:55 IST

खरंच कोणत्याही गोष्टीसाठी घराबाहेर जाताना बायकांचा जो उत्साह असतो तो खरंच बघण्यासारखा आणि दखल घेण्यासारखाही असतो. अगदी पंधरा ते वीस मिनिटांच्या कामासाठी किंवा कार्यक्रमालासुद्धा बरोबर कोण येईल, काय घालायचे, कुठे भेटायचे, कसं जायचं यावर अर्धा तास फोनवर बोलण्यापासून ते तयारीला एक तास लागला तरी त्यांना चालते आणि अगदी एखाद्या लग्नाला जाताना तयारीचा जो उत्साह असतो तसाच तो जाणवतो. या उत्साहाविषयी ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘वास्तव’ या सदरात लिहिताहेत साहित्यप्रेमी कौस्तुभ परांजपे...

आजही असेच फोन वर बोलणे सुरू होते व जाण्याची तयारी आणि वेळ ठरवणे सुरू होते. या उत्साहाकडे मी कौतुकाने बघत होतो.अगं येणार आहेस ना? हं तेच म्हणत होते मी. कुठे आहे? अगं म्हणजे एकाच ठिकाणी आहे. बरं मग किती वाजता निघायचं. हो बरोबर आहे. लवकरच जाऊन येऊ. अगं मग उन्हाचं नकोसं वाटतं. रांगेतही उभं रहावं लागतं. त्यापेक्षा आपण लवकरच जाऊन येऊ. दोघेही बरोबरच येणार आहात नं. हो आम्हीपण.नाही गं अजून तयारी व्हायची आहे. बरं एक ना. काय म्हणतेय मी; ड्रेस घालणार आहेस का साडी नेसणार आहेस? कोणत्या रंगाची? बरं बरं मी मी अबोली रंगाची काढते आज. हो गं बऱ्याच दिवसांपासून नेसलेच नाहीये आणि दोघींची सारखी पण होणार नाही आणि हो त्यावर फोटो पण चांगला येतो.खरं तर रंग या विषयावर चित्रकारांपेक्षाही बायकांचीच चर्चा अधिक झाली असेल, असं वाटतं. बरं रंग कोणी तयार केले किंवा त्यांची नाव कोणी ठेवली यापेक्षाही रंगावर मनापासून आणि प्रेमाने बोलणाºया बायकांना अबोली हे नाव खरंच मनापासून आवडल असेल का? कारण नाव अबोली आणि त्यावर आपणच भरभरून बोलायचं म्हणजे? पण ठिक आहे, काय करणार, चालायचंच. पण अबोली हे नाव छानच आहे.कदाचित रंगालासुद्धा बोलता आले असते तर अबोली या रंगाने ‘तोंड दाबून बुक्यांचा मार’ हे काय असतं ते सांगितलं असतं. कारण नाव अबोली पण त्यावर चर्चा मात्र भरमसाठ आणि उत्साहाने... घरातून निघातानाही अगोदर तयारी झाल्याचा व निघत असल्याचा व तेथे भेटण्याचा फोन झालाच आणि मग मला सूचना, त्या टेबलवर घडाळ्याखाली नीट ठेवलेल्या आहेत. बरोबरच घ्या, तिथे परत फिराफीर करावी लागते. सगळं बरोबर आहे व बरोबर घेतलं आहे याची खात्री झाल्यावर आम्ही बाहेर पडलो व ठरलेल्या ठिकाणी काही मिनिटे एकमेकांची वाट पाहून भेटलो. सगळं फोनवर बोलणं झाल्यावरदेखील या बायकांचा तिथेही बोलण्याचा उत्साह चार पाच वर्षांनी भेटलेल्या सारखा तर आम्हा पुरुषांच मात्र हाय हॅलो झाल्यावर निघायचं का? यावर चर्चा. तिथे गेल्यावर दहावीच्या परीक्षेत पहिल्या पेपरच्यावेळी मुलांना शाळेत गेल्यावर वर्ग कुठे आहे ही पाहण्याची, सांगण्याची व दाखवण्याची जेवढी उत्सुकता असते तेवढीच इथेही जाणवली. त्यानंतर आमचं नांव, नंबर पाहून आम्ही व्यवस्थित आमचा हक्क बजावून बाहेर आल्यावर परत यांचा उत्साहाचा पुढील भाग सुरू. बरं बाहेर आल्यावरसुद्धा बोर्डाच्या परीक्षेत पेपर खूपच सोप्पा गेल्यावर जो आनंद विद्यार्थ्यांच्या चेहºयावर असतो, तसाच यांच्याही चेहºयावर होता.एका झाडाखाली आपल्या कपड्यांचे रंग त्या मागच्या भागावर उठावदार दिसतील अशा पद्धतीने उभे राहिल्यावर आपली शाई लावलेली बोटं दिसतील पण आपला हसरा चेहरासुद्धा तेवढाच चांगला दिसेल या पद्धतीने चांगले दोन तीन फोटो काढून ते एकमेकांना दाखवून नंतर पुढे पाठवून ते फोटो व्यवस्थित पाठवले गेले आहेत याची खात्री झाल्यावरच आमच मतदानाचं कर्तव्य पार पाडल यावर शिक्कामोर्तब झाल्यावर आम्ही घराच्या दिशेने निघालो. आता घरी गेल्यावर परत फोनवर कोण कोण जाऊन आलं किंवा जाणार आहे याची विचारपूस होईलच, पण आताचा कार्यक्रम तरी सध्या पुरता संपला आहे हे नक्की.-कौस्तुभ परांजपे, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव