शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

उत्साह, प्रत्येक ठिकाणी वेगळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 16:55 IST

खरंच कोणत्याही गोष्टीसाठी घराबाहेर जाताना बायकांचा जो उत्साह असतो तो खरंच बघण्यासारखा आणि दखल घेण्यासारखाही असतो. अगदी पंधरा ते वीस मिनिटांच्या कामासाठी किंवा कार्यक्रमालासुद्धा बरोबर कोण येईल, काय घालायचे, कुठे भेटायचे, कसं जायचं यावर अर्धा तास फोनवर बोलण्यापासून ते तयारीला एक तास लागला तरी त्यांना चालते आणि अगदी एखाद्या लग्नाला जाताना तयारीचा जो उत्साह असतो तसाच तो जाणवतो. या उत्साहाविषयी ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘वास्तव’ या सदरात लिहिताहेत साहित्यप्रेमी कौस्तुभ परांजपे...

आजही असेच फोन वर बोलणे सुरू होते व जाण्याची तयारी आणि वेळ ठरवणे सुरू होते. या उत्साहाकडे मी कौतुकाने बघत होतो.अगं येणार आहेस ना? हं तेच म्हणत होते मी. कुठे आहे? अगं म्हणजे एकाच ठिकाणी आहे. बरं मग किती वाजता निघायचं. हो बरोबर आहे. लवकरच जाऊन येऊ. अगं मग उन्हाचं नकोसं वाटतं. रांगेतही उभं रहावं लागतं. त्यापेक्षा आपण लवकरच जाऊन येऊ. दोघेही बरोबरच येणार आहात नं. हो आम्हीपण.नाही गं अजून तयारी व्हायची आहे. बरं एक ना. काय म्हणतेय मी; ड्रेस घालणार आहेस का साडी नेसणार आहेस? कोणत्या रंगाची? बरं बरं मी मी अबोली रंगाची काढते आज. हो गं बऱ्याच दिवसांपासून नेसलेच नाहीये आणि दोघींची सारखी पण होणार नाही आणि हो त्यावर फोटो पण चांगला येतो.खरं तर रंग या विषयावर चित्रकारांपेक्षाही बायकांचीच चर्चा अधिक झाली असेल, असं वाटतं. बरं रंग कोणी तयार केले किंवा त्यांची नाव कोणी ठेवली यापेक्षाही रंगावर मनापासून आणि प्रेमाने बोलणाºया बायकांना अबोली हे नाव खरंच मनापासून आवडल असेल का? कारण नाव अबोली आणि त्यावर आपणच भरभरून बोलायचं म्हणजे? पण ठिक आहे, काय करणार, चालायचंच. पण अबोली हे नाव छानच आहे.कदाचित रंगालासुद्धा बोलता आले असते तर अबोली या रंगाने ‘तोंड दाबून बुक्यांचा मार’ हे काय असतं ते सांगितलं असतं. कारण नाव अबोली पण त्यावर चर्चा मात्र भरमसाठ आणि उत्साहाने... घरातून निघातानाही अगोदर तयारी झाल्याचा व निघत असल्याचा व तेथे भेटण्याचा फोन झालाच आणि मग मला सूचना, त्या टेबलवर घडाळ्याखाली नीट ठेवलेल्या आहेत. बरोबरच घ्या, तिथे परत फिराफीर करावी लागते. सगळं बरोबर आहे व बरोबर घेतलं आहे याची खात्री झाल्यावर आम्ही बाहेर पडलो व ठरलेल्या ठिकाणी काही मिनिटे एकमेकांची वाट पाहून भेटलो. सगळं फोनवर बोलणं झाल्यावरदेखील या बायकांचा तिथेही बोलण्याचा उत्साह चार पाच वर्षांनी भेटलेल्या सारखा तर आम्हा पुरुषांच मात्र हाय हॅलो झाल्यावर निघायचं का? यावर चर्चा. तिथे गेल्यावर दहावीच्या परीक्षेत पहिल्या पेपरच्यावेळी मुलांना शाळेत गेल्यावर वर्ग कुठे आहे ही पाहण्याची, सांगण्याची व दाखवण्याची जेवढी उत्सुकता असते तेवढीच इथेही जाणवली. त्यानंतर आमचं नांव, नंबर पाहून आम्ही व्यवस्थित आमचा हक्क बजावून बाहेर आल्यावर परत यांचा उत्साहाचा पुढील भाग सुरू. बरं बाहेर आल्यावरसुद्धा बोर्डाच्या परीक्षेत पेपर खूपच सोप्पा गेल्यावर जो आनंद विद्यार्थ्यांच्या चेहºयावर असतो, तसाच यांच्याही चेहºयावर होता.एका झाडाखाली आपल्या कपड्यांचे रंग त्या मागच्या भागावर उठावदार दिसतील अशा पद्धतीने उभे राहिल्यावर आपली शाई लावलेली बोटं दिसतील पण आपला हसरा चेहरासुद्धा तेवढाच चांगला दिसेल या पद्धतीने चांगले दोन तीन फोटो काढून ते एकमेकांना दाखवून नंतर पुढे पाठवून ते फोटो व्यवस्थित पाठवले गेले आहेत याची खात्री झाल्यावरच आमच मतदानाचं कर्तव्य पार पाडल यावर शिक्कामोर्तब झाल्यावर आम्ही घराच्या दिशेने निघालो. आता घरी गेल्यावर परत फोनवर कोण कोण जाऊन आलं किंवा जाणार आहे याची विचारपूस होईलच, पण आताचा कार्यक्रम तरी सध्या पुरता संपला आहे हे नक्की.-कौस्तुभ परांजपे, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव