शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

उत्साह, प्रत्येक ठिकाणी वेगळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 16:55 IST

खरंच कोणत्याही गोष्टीसाठी घराबाहेर जाताना बायकांचा जो उत्साह असतो तो खरंच बघण्यासारखा आणि दखल घेण्यासारखाही असतो. अगदी पंधरा ते वीस मिनिटांच्या कामासाठी किंवा कार्यक्रमालासुद्धा बरोबर कोण येईल, काय घालायचे, कुठे भेटायचे, कसं जायचं यावर अर्धा तास फोनवर बोलण्यापासून ते तयारीला एक तास लागला तरी त्यांना चालते आणि अगदी एखाद्या लग्नाला जाताना तयारीचा जो उत्साह असतो तसाच तो जाणवतो. या उत्साहाविषयी ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘वास्तव’ या सदरात लिहिताहेत साहित्यप्रेमी कौस्तुभ परांजपे...

आजही असेच फोन वर बोलणे सुरू होते व जाण्याची तयारी आणि वेळ ठरवणे सुरू होते. या उत्साहाकडे मी कौतुकाने बघत होतो.अगं येणार आहेस ना? हं तेच म्हणत होते मी. कुठे आहे? अगं म्हणजे एकाच ठिकाणी आहे. बरं मग किती वाजता निघायचं. हो बरोबर आहे. लवकरच जाऊन येऊ. अगं मग उन्हाचं नकोसं वाटतं. रांगेतही उभं रहावं लागतं. त्यापेक्षा आपण लवकरच जाऊन येऊ. दोघेही बरोबरच येणार आहात नं. हो आम्हीपण.नाही गं अजून तयारी व्हायची आहे. बरं एक ना. काय म्हणतेय मी; ड्रेस घालणार आहेस का साडी नेसणार आहेस? कोणत्या रंगाची? बरं बरं मी मी अबोली रंगाची काढते आज. हो गं बऱ्याच दिवसांपासून नेसलेच नाहीये आणि दोघींची सारखी पण होणार नाही आणि हो त्यावर फोटो पण चांगला येतो.खरं तर रंग या विषयावर चित्रकारांपेक्षाही बायकांचीच चर्चा अधिक झाली असेल, असं वाटतं. बरं रंग कोणी तयार केले किंवा त्यांची नाव कोणी ठेवली यापेक्षाही रंगावर मनापासून आणि प्रेमाने बोलणाºया बायकांना अबोली हे नाव खरंच मनापासून आवडल असेल का? कारण नाव अबोली आणि त्यावर आपणच भरभरून बोलायचं म्हणजे? पण ठिक आहे, काय करणार, चालायचंच. पण अबोली हे नाव छानच आहे.कदाचित रंगालासुद्धा बोलता आले असते तर अबोली या रंगाने ‘तोंड दाबून बुक्यांचा मार’ हे काय असतं ते सांगितलं असतं. कारण नाव अबोली पण त्यावर चर्चा मात्र भरमसाठ आणि उत्साहाने... घरातून निघातानाही अगोदर तयारी झाल्याचा व निघत असल्याचा व तेथे भेटण्याचा फोन झालाच आणि मग मला सूचना, त्या टेबलवर घडाळ्याखाली नीट ठेवलेल्या आहेत. बरोबरच घ्या, तिथे परत फिराफीर करावी लागते. सगळं बरोबर आहे व बरोबर घेतलं आहे याची खात्री झाल्यावर आम्ही बाहेर पडलो व ठरलेल्या ठिकाणी काही मिनिटे एकमेकांची वाट पाहून भेटलो. सगळं फोनवर बोलणं झाल्यावरदेखील या बायकांचा तिथेही बोलण्याचा उत्साह चार पाच वर्षांनी भेटलेल्या सारखा तर आम्हा पुरुषांच मात्र हाय हॅलो झाल्यावर निघायचं का? यावर चर्चा. तिथे गेल्यावर दहावीच्या परीक्षेत पहिल्या पेपरच्यावेळी मुलांना शाळेत गेल्यावर वर्ग कुठे आहे ही पाहण्याची, सांगण्याची व दाखवण्याची जेवढी उत्सुकता असते तेवढीच इथेही जाणवली. त्यानंतर आमचं नांव, नंबर पाहून आम्ही व्यवस्थित आमचा हक्क बजावून बाहेर आल्यावर परत यांचा उत्साहाचा पुढील भाग सुरू. बरं बाहेर आल्यावरसुद्धा बोर्डाच्या परीक्षेत पेपर खूपच सोप्पा गेल्यावर जो आनंद विद्यार्थ्यांच्या चेहºयावर असतो, तसाच यांच्याही चेहºयावर होता.एका झाडाखाली आपल्या कपड्यांचे रंग त्या मागच्या भागावर उठावदार दिसतील अशा पद्धतीने उभे राहिल्यावर आपली शाई लावलेली बोटं दिसतील पण आपला हसरा चेहरासुद्धा तेवढाच चांगला दिसेल या पद्धतीने चांगले दोन तीन फोटो काढून ते एकमेकांना दाखवून नंतर पुढे पाठवून ते फोटो व्यवस्थित पाठवले गेले आहेत याची खात्री झाल्यावरच आमच मतदानाचं कर्तव्य पार पाडल यावर शिक्कामोर्तब झाल्यावर आम्ही घराच्या दिशेने निघालो. आता घरी गेल्यावर परत फोनवर कोण कोण जाऊन आलं किंवा जाणार आहे याची विचारपूस होईलच, पण आताचा कार्यक्रम तरी सध्या पुरता संपला आहे हे नक्की.-कौस्तुभ परांजपे, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव