शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
4
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
5
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
11
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
12
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
13
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
14
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
15
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
16
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
17
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
18
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
19
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
20
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग

‘ईव्हीएम’चा बैलगाडीने प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 23:37 IST

सात्री गावात पुन्हा वाढली पातळी : मूलभूत सुविधांसाठी खडतर प्रवास

अमळनेर : तालुक्यातील सात्री हे गाव बोरी नदीला आलेल्या पुरामुळे दीड महिन्यापूर्वी वेढले गेले. मात्र तेथील ग्रामस्थांचे हाल अद्याप कायम असून रविवारी बैलगाडीने निवडणूक कर्मचारी या गावात पोहचले. मात्र तासाभरात नदीला पूर आल्याने पुन्हा गैरसोय होण्याची शक्यतात आहे.अमळनेर ते सात्री गावाचे अंतर १८ किलोमीटर आहे. येथून मारवड मार्गे डांगरी प्र. गावातून सात्रीला बोरी नदीचे पात्र ओलांडत जावे लागते. पावसाळ््यात पाण्याचा जोर जास्त वाढल्याने या गावातून रुग्णांना लाकडी खाटेवर बसवून ग्रामीण रुग्णालयात न्यावे लागत होते.५ सप्टेंबर पासून बोरी नदीला पूर आल्याने सात्री गावाचा संपर्क तुटला होता. या गावचे पुनर्वसन होणार असल्याने या गावाकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. निवडणूक कर्मचारी एक तास उशिरा गेले असते तर बैलगाडीने सुद्धा पोहचविणे अशक्य झाले असते.सहा वर्षात बोरी नदीला पूर आला नव्हता म्हणून समस्येचा विसर पडला होता. मात्र यंदा जोरदार पावसाने अद्यापही नदी वाहत आहे. त्यामुळे बस गावात जाऊ शकत नाही.पाण्यातून वाट काढत लोक ये-जा करतात. मतदान केंद्रावर कर्मचारी २० रोजी बैलगाडीने पाचले खरे, पण त्यानंतर तासाभराने नदीला पूर आल्याने पुन्हा गैरसोय होण्याची शक्यता बळावली आहे.अवघ्या एक तासात पाण्याची पातळी इतकी वाढली की बैलगाडीने जाणेसुद्धा अवघड झाले आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत पाण्याची पातळी कमी न झाल्यास कर्मचाऱ्यांना खाटेद्वारे किवा बोटीवर आणावे लागेल. काही मतदार इतरत्र स्थलांतरित झाल्याने त्यांना मतदानासाठी असुविधा होऊ नये यासाठी प्रशासन दक्ष असल्याचे सांगण्यात आले आहे.

सात्री येथे दैनंदिन कामकाजासाठी बाहेरगावी अथवा तालुक्याच्या ठिकाणी जायचे असल्यास नदीपात्रातूनच जावे लागते. दुष्काळी कालावधी वगळता नदीला पाणी असते. त्यामुळे रात्रीबेरात्री गावाबाहेर जाण्याची वेळ आल्यास ग्रामस्थांची तारांबळ उडते. शालेय, महाविद्यालयीन शिक्षणासाठी तालुक्याला जाण्यासाठी विद्यार्थ्यांना पूरस्थितीमध्ये शैक्षणिक नुकसानाला सामोरे जावे लागते. अनेक वर्षांपासून पुनर्र्वसन प्रलंबित आहे. त्याबाबत अनिश्चतता असल्याने त्वरित पूल बांधण्यात यावा, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.