शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

‘ईव्हीएम’चा बैलगाडीने प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 23:37 IST

सात्री गावात पुन्हा वाढली पातळी : मूलभूत सुविधांसाठी खडतर प्रवास

अमळनेर : तालुक्यातील सात्री हे गाव बोरी नदीला आलेल्या पुरामुळे दीड महिन्यापूर्वी वेढले गेले. मात्र तेथील ग्रामस्थांचे हाल अद्याप कायम असून रविवारी बैलगाडीने निवडणूक कर्मचारी या गावात पोहचले. मात्र तासाभरात नदीला पूर आल्याने पुन्हा गैरसोय होण्याची शक्यतात आहे.अमळनेर ते सात्री गावाचे अंतर १८ किलोमीटर आहे. येथून मारवड मार्गे डांगरी प्र. गावातून सात्रीला बोरी नदीचे पात्र ओलांडत जावे लागते. पावसाळ््यात पाण्याचा जोर जास्त वाढल्याने या गावातून रुग्णांना लाकडी खाटेवर बसवून ग्रामीण रुग्णालयात न्यावे लागत होते.५ सप्टेंबर पासून बोरी नदीला पूर आल्याने सात्री गावाचा संपर्क तुटला होता. या गावचे पुनर्वसन होणार असल्याने या गावाकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. निवडणूक कर्मचारी एक तास उशिरा गेले असते तर बैलगाडीने सुद्धा पोहचविणे अशक्य झाले असते.सहा वर्षात बोरी नदीला पूर आला नव्हता म्हणून समस्येचा विसर पडला होता. मात्र यंदा जोरदार पावसाने अद्यापही नदी वाहत आहे. त्यामुळे बस गावात जाऊ शकत नाही.पाण्यातून वाट काढत लोक ये-जा करतात. मतदान केंद्रावर कर्मचारी २० रोजी बैलगाडीने पाचले खरे, पण त्यानंतर तासाभराने नदीला पूर आल्याने पुन्हा गैरसोय होण्याची शक्यता बळावली आहे.अवघ्या एक तासात पाण्याची पातळी इतकी वाढली की बैलगाडीने जाणेसुद्धा अवघड झाले आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत पाण्याची पातळी कमी न झाल्यास कर्मचाऱ्यांना खाटेद्वारे किवा बोटीवर आणावे लागेल. काही मतदार इतरत्र स्थलांतरित झाल्याने त्यांना मतदानासाठी असुविधा होऊ नये यासाठी प्रशासन दक्ष असल्याचे सांगण्यात आले आहे.

सात्री येथे दैनंदिन कामकाजासाठी बाहेरगावी अथवा तालुक्याच्या ठिकाणी जायचे असल्यास नदीपात्रातूनच जावे लागते. दुष्काळी कालावधी वगळता नदीला पाणी असते. त्यामुळे रात्रीबेरात्री गावाबाहेर जाण्याची वेळ आल्यास ग्रामस्थांची तारांबळ उडते. शालेय, महाविद्यालयीन शिक्षणासाठी तालुक्याला जाण्यासाठी विद्यार्थ्यांना पूरस्थितीमध्ये शैक्षणिक नुकसानाला सामोरे जावे लागते. अनेक वर्षांपासून पुनर्र्वसन प्रलंबित आहे. त्याबाबत अनिश्चतता असल्याने त्वरित पूल बांधण्यात यावा, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.